Total Pageviews

Saturday, 22 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७२

इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे

इ.स.१७३० मध्यें सातारकर व करवीरकर यांच्या दरम्यान वारणातीरीं जी लढाई झाली तींत व्यंकटराव घोरपडे हे करवीरकरांकडून लढत होते. सभोवतीं संभाजींचें राज्य आपण दूर एकटे पडल्यामुळें अपली काय जीं खेडीं आहेत तीं तात्काळ हातचीं जाऊन नाश होईल, या भयानें ते त्यांच्या फौजेंत हजर झाले असावे. या लढाईत करवीरकरांचा पराभव होऊन भगवंतराव अमात्य व्यंकटराव घोरपडे वगैरे करवीरकरांकडील प्रमुख असाम्या कैद झाल्या. शेवटीं बाजीराव पेशव्यांनीं दहा हजार रूपये दंड भरून आपल्या मेहुण्याची सुटका करून घेतली.

यापुढें शाहूनें आपल्याजवळ रहाण्याविषयीं व्यंकटरावास आज्त्रा केल्यावरून साता-यास ते राहिले. पूर्वी त्यांचें पथक पांचशें स्वारांचें असतां आतां सातशें स्वारांचे झालें. त्या पथकास शाहूकडून सरंजामास यावेळीं आणखी कडलास, पापरी व बेडग हे गांव मिळाले व वाडा बांधण्याकरितां सातारा येथें जागा मिळाली. त्या पेठेचें अद्यापि व्यंकटपुरा हें नांव प्रसिध्द आहे.

व्यंकटरावांचे पुत्र नारायणरावतात्या यांचें लग्न याच वेळीं झालें. त्यांच्या स्त्रीचें नांव लक्ष्मीबाई. पूर्वी व्यंकटराव लहान होते तोंच त्यांच्या वडिलांनीं देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस वडिलांनी देशमुखीचा मामला त्यांच्या हवालीं करून व त्यांस त्र्यंबक हरि पटवर्धन हे दिवाण नेमून देऊन त्यांजकडून त्या वतनाचा करभार करविला. तसेंच आतां नारायणराव वयांत येण्याच्या पूर्वीच व्यंकटरावांनीं तीच देशमुखी त्यांच्याहि हवालीं केली व त्र्यंबक हरि यांसच त्यांचे दिवाण नेमून दिले. (१७३३).

सन १७३९ त व्यंकटरावांनीं इचलकरंजीचें ठाणें वसवण्याची सुरूवात केली. गांवकुसवापैकीं अमुक उंचीचा व रूंदीचा भाग रयतेपैकीं प्रत्येक कुळानें बांधून द्यावा, याप्रमाणें ठराव करून त्यांनीं गावक-यांकडून सक्तीनें गांव कुसूं घालविलें.

वसईची मोहिम चालू असतां व्यंकटरावांनीं गोव्यावर स्वारी करून तेथें फिरंग्यांचा पुरा मोड केला व ते परत देशीं आले (१७३९). त्या वेळीं शाहूमहाराज मिरजेच्या किल्ल्यास वेढा घालून बसले होते. त्यांच्या लष्करांत व्यंकटराव चांरशे स्वारानिशीं येऊन दाखल झाले. त्यावेळी इंग्रजांकडून गॉर्डन नांवाचा वकील शाहूमहाराजांकडे आला होता. यानें त्या वेळची अशी एक बातमी लिहून ठेविली आहे कीं “गोवेकर पोर्च्यगीज लोकांनीं सहा लक्ष रूपये देण्याचें कबूल करून मराठयांशीं (व्यंकटरावांशीं) समेट करून घेतला. त्यांपैकीं त्यांनीं पस्तीस हजार रूपये रोख व एक लक्ष पस्तीस हजार रूपये किमतीचीं ताटें तबकें वगैरे चांदी दिली. सर्व रकमेचा फडशा होईपर्यंत मराठी फौज गोंव्याच्या आसपास रहावयाची आहे व गोवेकरांनीं तिच्या खर्चाकरितां दरमहा दोन हजार रूपये देण्याचें कबूल केलें आहे.” गोव्यावरच्या स्वा-यांत व्यंकटरावांनीं जितका मुलूख जिंकिला होता तितका सर्व शाहूमहाराजांनीं त्यांजकडे जहागीर म्हणून वहिवाटीस ठेविला. त्या मुलखाच्या आसपास कोल्हापूरकरांचे कांहीं टापू असल्यामुळें त्यांशीं नेहमीं तंटें होतील या भयानें ते टापूहि व्यंकटराबांनीं संभाजीपासून कमविशीनें घेतले होते. गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर करवीरकर संभाजी यांनीं व्यंकटरावांस सुळकूड, टाकळी व दोन्ही शिर्दवाडें मिळून चार गांव इनाम दिले.

मिरज प्रांतीं मोंगलांचा अंमल होता तेथपर्यंत (१७४०) तिकडचा देशमुखीचा अंमल व्यंकटरावांस कधींच सुरळींतपणें मिळाला नाहीं. मोंगलाई मुलुखांत महाराजांची देणगी जरी असली तरी तिजवर मोंगल अधिकारी मोंगलबाब म्हणून एक कर घेत असत. पन्हाळा प्रांतीं शाहूमहाराजांनीं व्यंक
टरावांस देशमुखी दिली होती त्याबद्दल जिजाबाईचा कार भार सुरू झाल्यावर करवीर दरबारानें व्यंकटरावांजवळ इनाम तिजाई मागितली परंतु ती त्यांनीं देण्याचें साफ नाकारिलें. त्यामुळें यापुढें करवीरकर व व्यंकटराव यांच्या नेहमीं कटकटी होत. एकदां तर इचलकरंजीवर करवीरकरांनीं चाल केली होती परंतु त्या वेळीं त्यांचा पराभव झाला (१७४२).

गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर व्यंकटराव कांहीं दिवस साता-यास होते. त्यानंतर आणखीही एकदोन मोहिमांत ते नानानाहेब पेशव्यांच्या फौजेबरोबर चाकरी करीत होते. पुढें १८४३ पासून त्यांच्या शरीरावर क्षयरोगाचा पगडा दिवसेंदिवस हळू हळू बसत चालला या आजारांत एके जागीं राहून त्यांच्या प्रकृतीस बरें वाटेना, म्हणून ते इचलकरंजी, नांदणी, टाकळी, उत्तूर या ठिकाणीं रहात असत. त्या काळीं देवधर्मांवर व भुतांखेतांवर लोकांचा विश्वास फार असे. सदलगें येथें कोणी प्रसिध्द देवरूषी होता त्याजकडून कांहीं दैवी उपाय करविण्याकरितां ते सन १७४५ त कुटुंबसुध्दां जाऊन राहिले होते. तेथेंच त्यांचें देहावसान झालें.

व्यंकटराव हे शूर व कर्तृत्ववान् पुरूष होते. करवीर व सातारा या दोन्ही दरबारांत त्यांचे वजन चांगलें असे. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासांत त्यांनीं शाहूमहाराजांची स्वतंत्र सरदारी मिळविली ही गोष्ट महत्वाची आहे. ही सरदारी मोठया योग्यतेची होती. त्यांचा ‘ममलकत मदार’ हा किताब शाहूनें मान्य केल्याचें सरंजामजाबत्यावरून स्पष्ट होतें.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७१
इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे
व्यंकटराव नारायण हा नारोपंताचा पुत्र. नारोपंत मरण पावले तेव्हा त्यांचें कुटुंब बहिरेवाडी येथें रहात होतें. पंताच्या मृत्यूचें वर्तमान पिराजी घोरपडे यांस कळतांच ते बहिरेवाडीस आले. पंतांची स्त्री लक्ष्मीबाई व पुत्र व्यंकटराव यांची भेट झाल्यावर ते फार कष्टी होऊन बोलले कीं, “आमचे वडिलांनीं नारोपंतास पुत्राप्रमाणें मानून त्यांचें कल्याण केलें; तें स्मरून नारोपंतांनीं आमचे वडील वारले तेव्हां आम्ही नेणतीं मुलें होतों, तरी आमच्या दौलतीसाठीं बहुत खस्त खाल्ली. त्यांनीं भाऊपणाचें उत्तम सार्थक केलें. त्यांचे तुम्ही पुत्र आहां ते आमचेच आहां. आमचे देशमुखी सरदेशमुखीचें वतन मिरजप्रांतीं आहे तें आमचे वडिलांनीं व आम्हीं नारोपंतांकडे वहिवाटीस दिलें होतें. तेच वतन आम्ही तुम्हाकडे चालू ठेवितों.” असें म्हणून पिराजी परत गेला.
नारोपंतांच्या हृयातींत सेनापतीकडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरें, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी व शिपूर इतकीं खेडीं त्यास इनाम मिळालेंली होतीं. शिवाय तर्फ आजरें येथील एकतर्फी खेडयांची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखीची वहिवाट सेनापतींकडून पंताकडे चालत होती. हें सारें उत्पन्न सालिना तीस चाळीस हजारांचे होतें. शिवाय करवीर राजमंडळांपैकीं सचिवाचें पद त्यांस मिळाले होतें (१७११) त्याचा सरंजाम ते उपभोगीत होते; व सेनापतीच्या संस्थानाचा कारभार त्यांजकडे असल्यामुळें त्यासंबंधींहि त्यांची प्राप्ति बरीच असावी. पण पंत वारल्यावर संभाजीनें सचिवाचें पद व्यंकटरावास दिलें नाहीं व सेनापतींनींहि त्यांच्या हातीं कारभार ठेविला नाहीं. कारण कीं नारोपंतांचे पुरस्कर्ते रामचंद्रपंत अमात्य हे यापूर्वीच वारले होते व व्यंकटरावांचें नीट बनत नव्हतें. अशा वेळीं व्यंकटराव यांची नजर शाहूचा आश्रय संपादण्याकडे लागली. पेशव्यांच्या द्वारें तिकडे त्यांचा वशिलाहि चांगला होता. पेशव्यांनीं त्या वेळेपासून त्यांची सोय, उत्पन्न व अधिकार वाढविण्याचा हळू हळू उपक्रम सुरू केला.
पेशव्यांच्या विनंतीस अनुसरून शाहूनें व्यंकटरावास सन १७२२ त शिरढोण हा गाव व पुढच्या वर्षी मनेराजुरी दणी, आरग व म्हापण हे गांव इनाम दिले. त्याच्या पुढच्या वर्षी उत्तूर हा गांव इनाम दिला. या सालीं (१७२४) व्यंकटराव यांच्या नांवें निराळा सरंजामजाबता करून दिला. मागलें (१७०३) सरंजामजाबत्यांत व्यंकटरावांनीं कापशीकरांच्या हाताखालीं चाकरी करावी असें ठरलें होतें. परंतु आतांच्या जाबत्यामुळें त्यांचा कापशीकर व करवीरकर यांशीं अजीबात संबंध तुटला व ते शाहू महाराजांचे स्वतंत्र सरदार झाले.
व्यंकटराव व अनूबाई हीं दोघेंहि आतां वयांत आलीं होतींक्त पेशव्यांनीं (१७२२) व्यंकटरावास रहाण्यांकरितां पुण्यांत वाडा बांधून दिला. आणि तेथच्या संसाराच्या सोईकरितां त्यास वडगांव (चाकण) हा सबंध गांव, पर्वतीनजीकचा बाग व हडपसर येथील बाग इनाम दिला.
याप्रमाणें पुण्यांत रहाण्याची सोय झाल्यामुळें व्यंकटराव वर्षांतून कांहीं दिवस तेथें रहात असत. त्यांस दोन अपत्यें झालीं. पहिली कन्या वेणूताई व दुसरा पुत्र नारायणराव ही वेणूताई ही पुढें पेशवाईंतले प्रसिध्द सरदार त्रिंबकराव मामा पेठे यांस दिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७०
इचलकरंजी, सं स्था न. व्यंकटराव घोरपडे
नारोपंताच्या मागाहून त्यांचे चिरंजीव व्यंकटराव घोरपडे यांनांहि संताजीराव घोरपडे यांच्या वंशजांनीं, मिरजेची देशमुखी सरदेशमुखी वगैरे सर्व हक्क देऊं केले. पण व्यंकटराव एवढयावर संतुष्ट राहिले नाहीत. पोर्तुगीज लोकाशी मराठयांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत व्यंकटरावांनी चांगले नांव मिळविले व पुष्कळ मुलूख काबीज केला, त्यामुळें शाहू महाराज खूष होऊन त्यांनी व्यंकटरावांना 'स्वतंत्र' सरदारी दिली. व्यंकटरावानीच इचलकरंजीचा किल्ला आपल्या कारकीर्दीत बांधला व तें आपल्या राजधानीचें गांव ठरविले.
व्यंकटरावानंतर त्यांचे चिरंजीव नारायणराव यांची कारकीर्द झाली. या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थानची अतिशय भरभराट झाली. नानासाहेब पेशव्यांनी व भाऊसाहेबांनी दक्षिणेंत ज्या मुलुखगिऱ्या केल्या त्या सर्व प्रसंगी, नारायणराव हे जातीनें हजर होते, त्यांत त्यांनी चांगला पराक्रम गाजविल्यामुळे धारवाडची सुभेदारी त्यांनां मिळाली. हे १७७० साली वारले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ६९
इचलकरंजी, सं स्था न.- मूळ संस्थापक नारो महादेव
हें संस्थान उ. अ. १६० ४१ आणि १६० ५०' व पू. रे. ७४० ३१' आणि ७४० ५०'
यांमध्ये वसलेले आहे. हे कोल्हापूरच्या राजाच्या ताब्यांतील एक मांडलिक संस्थान आहे. या संस्थानची राजधानी इचलकरंजी हें गांव असून या राजधानीच्या नांवापासूनच 'इचलकरंजी' हें नांव संस्थानाला प्राप्त झाले आहे. संस्थानचें क्षेत्रफळ २४० चौ. मैल. लोकसंख्या सुमारे ६०००० व उत्पन्न सवातीन लाखांचे आहे.
इतिहास - इचलकरंजी संस्थानचा मूळ संस्थापक नारो महादेव हा होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जी कित्येक कोंकणस्थांची घराणी, आपले नशीब काढण्याकरितां घाटांवर आली,त्यांतच रत्नागिरी जिल्ह्यांतील वरवडेकर जोशांच्या घराण्याचा समावेश होता. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हें सावंतवाडी संस्थानांतील म्हापण गांवच्या कुलकर्णीपणाचें काम करीत होते. नारोपंत हे अवघे चार पांच वर्षाचे असतांना, महादजीपंत निर्वतले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई ही आपल्या मुलाला घेऊन उदरनिर्वाह करण्याकरितां घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिध्द मराठा सेनापती संताजी घोरपडे याचें हें रहाण्याचें ठिकाण होते. या ठिकाणी असतांना नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजीच्या नजरेस पडल्यामुळे संताजीने त्यास आपल्या दिमतीस ठेवले व लिहिणे वाचणे, घोडयावर बसणे, निशाण मारणे इत्यादि त्या काळची सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली.
राजारामाच्या कारकीर्दीत संताजीरांव हे सेनापती असल्याने त्यांना नेहमी स्वारीवर असणे भाग पडे. संताजीरावांनी राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचे स्वातंत्र्य राखण्यासाठी जे असाधारण पराक्रम केले, ज्या अचाट मसलती केल्या त्यांत नारोपंतांनी बहुमोल मदत केली. नारोपंतांवर संताजीची बहाल मर्जी होती व नारोपंताचीहि संताजीवर अतिशय भक्ति असे; ती इतकी की, नारोपंतांनी आपले मूळचें जोशी हें आडनाव बदललें व आपल्या धन्याचे-संताजीचें –घोरपडे हें आडनांव धारण केले. अद्यापिहि, नारोपंताचे वंशज 'घोरपडे' हेंच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या पुढे लावतात.
संताजीराव घोरपडे यांनी नारोपंत यास मिरजप्रांताच्या देशमुखीसरदेशमुखीची वहिवाट दिली होती; व इचलकरंजी व अजरें हे गांव इनाम दिले होते. पुढे संताजीराव घोरपुडे १६९८ साली वारले. त्यानंतर दहा पंधरा वर्षे निरनिराळया मसलतीत नारोपंत यांनी आपले लक्ष घालून चांगलेच नांव कमावले. नारोपंतांचा मुलगा व्यंकटराव याला बाळाजी विश्वनाथ यांनी आपली मुलगी अनुबाई दिली; त्यामुळे खुद्द पेशव्यांच्या घराण्याशी नारोपंताच्या घराण्याचा शरीरसंबंध जडला, व त्यामुळे नारोपंतांनी स्थापलेल्या इचलकरंजी संस्थानाला चांगले भाग्याचे दिवस प्राप्त झाले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६८



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ६८
राजस्थानातील मुसंडी
मराठयांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा सांगणा-या ‘झंझावात’ या इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील राजस्थानातील मराठय़ांच्या कामगिरीवर लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग -
राजस्थानातील कोटा आणि बुंदी ही दोन छोटी राज्ये हाडा राजपुतांच्या ताब्यात होती. नसर्गिकरीत्या या दोन्ही राज्यांना मोठे संरक्षण लाभलेले आहे. उत्तरेला चमेली म्हणजे चंबळ, पूर्वेला पार्वती नदी, मुकुंद-याची डोंगररांग ही दक्षिणेला, तर आरवली पर्वताच्या रांगा या पश्चिमेला असल्याने ही दोन्ही राज्ये तशी संरक्षित होती. मुकुंद-याची खिंड हा जाण्या-येण्याचा मोठा मार्ग होता.
मराठय़ांचा एकूण उत्कर्ष आणि ताकद पाहिल्यावर कोटय़ाच्या राजाने मराठी फौजेची मदत घेण्यास सुरुवात केली. राव किशोरसिंह हाडा याने १६८३ पासूनच ही मदत घेतली होती. मराठी फौजांना उत्तरेत जाण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधी होती. किशोरसिंहानंतर त्याचा मुलगा रामसिंह हा वजीर झुल्पिकारखान याच्या मदतीने गादीवर आला आणि द्रष्टवन कर्नाटक मोहिमांवर मुघलांतर्फे सामील झाला. मुघलांच्या कैदेत असलेल्या शाहूराजांशी याच वेळी त्याचा संबंध आला असावा.
रामसिंहाने त्याच्या वडिलांचे मराठय़ांसोबत चांगले वागण्याचे धोरण कायम ठेवले. त्याने काही मराठी ब्राह्मणांना जहागि-याही दिल्या. सनगोढ, मांगरोळ, अटोनी, इजारा येथे या जहागि-या होत्या. निळोजी प्रधान यांचा कोटय़ाला १६९७ मध्ये सत्कारही करण्यात आला. हा रामसिंह जजाऊच्या लढाईत १७७० मध्ये मारला गेला. त्याचा मुलगा राव भीमसिंह हा कोटय़ाच्या गादीवर आला. कोटय़ाच्या दक्षिण प्रांतात राजाविरुद्ध उठाव झाल्याने राजाने चंद्र पंडित आणि हिंदुराव यांना मदतीस बोलावून त्यांच्या करवी उठावाचा बंदोबस्त केला. या दोघांना मोठय़ा भेटी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
फरुखसियर १७१३ मध्ये दिल्लीचा बादशाह म्हणून गादीवर आल्यावर कोटय़ाच्या राजाने त्याचा सन्मान केला. पण बुंदीच्या राजाने मात्र काहीच केले नाही. कालांतराने भीमसिंहाने दाखवलेल्या हुशारीबद्दल त्याचा ‘महाराव’ असा किताब देऊन सत्कार करण्यात आला. १७१९ मध्ये त्याला बुंदी घेण्याची परवानगीही देण्यात आली. भीमसिंह १७२० मध्ये बु-हानपूरजवळ निजामाच्या विरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडला.
‘महाराव अर्जुनसिंह’ हा भीमसिंहाचा मुलगा कोटय़ाच्या गादीवर आला. दिल्लीत यावेळी उलथापालथ चालू असल्याने जयपूरच्या सवाई जयसिंहाने सर्व राजपुतांना एकत्र येण्याचे आवाहन केले. अनेक राजपूत राजे या योजनेच्या विरुद्ध होते. शिवाय जयसिंहाने दिल्लीला मुहम्मदशाहाच्या मदतीला आपली फौज पाठवली तरी त्या फौजेचे नेतृत्व करण्यास तो स्वत: गेला नव्हता. अर्जुनसिंहानेही तसेच केले होते. पण तो अचानक १७२३ मध्ये मृत्युमुखी पडला. यावेळी कोटय़ाचा १६७ मराठय़ांशी उत्तम संबंध होता.
मराठय़ांनी तोपर्यंत माळव्यात आपले पाय उत्तम रोवले होते. १७२६च्या पूर्वार्धात मराठी फौज मेवाड, कोटा आणि बुंदीत उतरली. मराठय़ांच्या हल्ल्यात त्यांना फार लूट हाती लागली नाही. सवाई जयसिंहाने आता इतर राजपुतांना मराठय़ांविरुद्ध एकत्र येण्यासाठी परत आवाहन केले. त्याने जोधपूरपासून सगळीकडे भराभर पत्रे पाठवली. त्यावेळी कोटय़ाचा महाराव दुर्जनसालाने जयसिंहाला संपूर्ण पाठिंबा दिला. जयसिंहाने आपला एक वकील साता-याला पाठवला. १७३० पर्यंत जयसिंहाने मराठय़ांशी सलोखा साधला.
१७३३ मध्ये नाहरगढाचा किल्लेदार नाहरसिंह याने कोटय़ाच्या राजाचे अधिपत्य अमान्य करून स्वत:ला सार्वभौम म्हणून घोषित केले. त्याने इस्लाम स्वीकारून स्वत:ला नाहरखान म्हणवले. दुर्जनसालाने शाहूराजांकडे दूत पाठवून नाहरखानाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शाहूराजांनी त्यांचे तीन सरदार नारो विठ्ठल, कृष्णाजी आणि उदाजी पवार यांना कोटय़ास जाण्यास सांगितले. त्याच वेळी पिलाजी जाधवराव पार्वती आणि अत्रू या नद्या उतरून आला. तेथे असूजी नावाचा एक मराठा जहांगीरदार होता.
दुर्जनसालाने पिलाजीस १.५० लाख रुपये देतो, असे सांगून नाहरखानावर पाठवले. पिलाजीने नाहरखानाचे मूळ उखडून काढले. नाहरगढ ताब्यात घेऊन पिलाजीने तो दुर्जनसालास दिला. त्याने पिलाजीस दीड लाख रुपये दिले. मराठयांशी महारावाचे संबंध चांगले राहिले. पुढे जयसिंह आणि अभयसिंहाच्या राजकारणाला कंटाळून दुर्जनसाल हा मुघल खानदौरानला मिळाला. त्यावेळी मराठय़ांनी मुघलांचा मोठा पराभव केला. मराठय़ांचे नंतर कोटय़ावर वर्चस्व राहिलेच.

Friday, 14 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ६७
सरदार मानाजी पायगुडे - झेंडा ‘अटके’पार!
झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्रश्नण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये
पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. ‘अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा!
अरुण पायगुडे
Taken From,
लोकसत्ता पुणे वृत्तान्त, सोमवार, १० ऑगस्ट २००९. Credits to original author Mr Arun Paigude.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ६६

सरदार कृष्णाजी गायकवाड

शिवरायांची पत्नी राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू सरदार कृष्णाजी बंकी गायकवाड , कवी पारामंद यांच्या परमानंद काव्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जी नावे आहेत त्यामध्ये कृष्णाजी बांकी गायकवाड हे अग्रभागी होते
अफजल खान चालून आला त्यावेळी माणकोजी दहातोंडे , सुभानजी इंगळे ,जिवाजी देवकाते पिलाजी बेलदरे व संताजी बोबडे हे सरदार भेटायला गेले सोबत कृष्णाजी गायकवाड होते , शिवाजी राजांनी विचारले कि बेत कसा आखावा तेव्हा कृष्णाजी गायकवाड बोलले "आतून बारीक चिलखती झगा घाला बाहेरून मुसेजरी वापरा डाव्या हातात बिचवा आणि उजवीकडे छुपी वाग नखे पंजात लपवा कारण खान कापटी आहे दगाबाज आहे …….'' आणि झाले तसेच झाले खानाने कपाट केले महाराजांवर वार केला महाराजांनी खानच्या पोटात बिचवा फेकला वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला . महाराज जिंकले पण त्याच्या मागे गनिमी कावा होता तो सरदार कृष्णाजी बांकी गायकवाड यांचा हे इतिहास विसरला ……।
पण शिवराय विसरले नव्हते

म्हणून

अफजल खानच्या वधाच्या नंतर शिवाजी राजांच्या राजदरबारात अज्ञान दासाकडून पोवाडा सादर झाला त्यामधल्या ओळी

राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥

बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥

भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥

मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥

डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।

पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥