Total Pageviews

Wednesday 31 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १६०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६०
अनूबाई घोरपडे-
बा ल प ण व सं सा र -
बाळाजी विश्वनाथ पेशव्याची सर्वांत धाकटी कन्या. हिचा इ. स. १७१३ सालीं इचलकरंजी घराण्यांतील व्यंकटराव नारायण घोरपडे याशीं वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी सातारा मुक्कामीं विवाह झाला. व्यंकटराव व अनूबाईयांच्या विवाहसंबंधानें अशी एक गंमतीची आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, यालग्नांत वरपक्षाकडील सेनापतीच्या घरच्या बायकांनीं ' वधूपक्षा कडच्याबायकांनी बुरखा घेतल्याशिवाय आमच्या मांडवांत पाऊलसुद्धा टाकूं नये ' असाहट्ट धरून तो वधूपक्षाकडील बायकांच्या इच्छेविरुद्ध शेवटास नेला होता.अनूबाई व व्यंकटराव या उभयतांना वर्षातून बरेच दिवस पुण्यांत आपल्याजवळ राहतां यावें म्हणून पेशव्यांनीं इ. स. १७२२ सालीं व्यंकटरावास राहण्याकरितां पुण्यास वाडा बांधून दिला व तेथील संसाराच्या सोईकरितां मौजेवडगांव तर्फ चाकण हा सबंध गांव, पर्वतानजीकचा बाग व हडपसर येथील बाग त्यासइनाम करून दिला. अनूबाईस तिचीं वेणूताई व नारायणराव (जन्म इ. स. १७२३-२४)हीं दोनहि अपत्यें पूर्व वयांतच झालीं. ही वेणूताईच पुढें पेशवाईंतलेप्रसिद्ध सरदार त्रिंबकराव मामा पेठे यास दिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५९


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५९
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

मराठीतील ख्यातनाम कवी माधव ज्युलियन यांनी पुढील शब्दांत अहिल्याबाईंचा गौरव केला आहे.
“रहस्य दावी इतिहासाची कथा अहिल्याराणीची,
कांचनगंगा वाहवुनी, जी उभवी यशाचा धवलगिरी,
होळकर कुलप्रभा, कोण हो तत्स्मृतीला न धरील शिरी”
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी म्हटले होते की,
“राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी,
अजुनि नर्मदा जळी, लहरती तिच्या यशाची गाणी.”
यावरुन अहिल्याबाई या थोर मुत्सद्दी, धोरणी राजकारणी, द्रष्ट्या प्रशासक, समाजहितैषि, अखिल भारतीय स्तरावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा लौकिक आणि दरारा प्रस्थापित करणाऱ्या महान राज्यकर्त्या होत्या, हे स्पष्ट होते. या लोकमातेचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. ‘पुण्यश्लोक’ असे सार्थ बिरुद 1907 सालापासून त्यांच्या नावामागे लावले जाऊ लागले असले तरी सर्वश्रेष्ठ प्रशासक ही अहिल्याबाईंची मोहोर आज आपल्या देशाला अधिक प्रेरणादायी आहे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५८
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

इंग्रज कवयित्री जोना बेली यांनी सन 1849मध्ये अहिल्याबाईंचा गौरव करताना म्हटले होते-
“For Thirty years her reign of peace,
The land in blessing did increase,
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young,
Yea, even children children at their mother’s feet,
Are tought such homely rhyming to repeat,
Kind was her heart and tright her fame,
And Ahlya was her honoured name.”
अबराय मॅके हा प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकार म्हणतो की, “त्यांचे वर्णन वर्डस्वर्थच्या पुढील शब्दांत करता येईल.
“A Perfect Woman, nobly planned to warm,
To comfort and command,
And yet a spirit still and bright
With something of an angel light.”

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५७
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

समकालीन व त्यानंतरच्या काळात देशविदेशांतील अनेक कवी, साहित्यकारांनी अहिल्याबाईंचा गुणगौरव केल्याचे दिसते.
शाहीर प्रभाकर म्हणतात,
“धन्य धन्य अहिल्याबाई।
गेली कीर्ती करूनिया, भूमंडळाचे ठायी॥
महाराज अहिल्याबाई, पुण्यप्राणी।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी॥
संसार चालवी दीनदुबळ्यांची आई।
जेविल्या सर्व, मगच आपण अन्न खाई॥
बांधिले घाट-मठ-पार। कुठे वनात पाणी गार॥”
हिंदी कवी श्रीधर चौबे यांनी सन 1789मध्ये लिहिले होते की,
“यावतचंद्रदिवाकर गंगाजल बहाई।
धनी धन्य अहिल्यामाई।
ध्रुव कैसो, अटल राज रहे।
प्रजा परिजन सुहाई॥”

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५६
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

ग्रंथप्रेमी :
अहिल्याबाई स्वतः ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी त्याकाळात स्वतःचे फार मोठे दर्जेदार ग्रंथालय उभे केले होते. त्यात शेकडो ग्रंथ आणि पोथ्या जमवल्या होत्या. विशेष म्हणजे दररोज रयतेसोबत स्वतः बसून त्या जाणकारांकडून सामूहिक ग्रंथवाचन करून घेत.
अहिल्याबाई मुत्सद्दी होत्या. अष्टावधानी होत्या. त्यांनी आपले वकील भारतभर नेमले होते. त्यामुळे प्रत्येक राज्यातल्या बातम्या त्यांना तात्काळ कळत असत आणि त्यानुसार त्या आपल्या राजकारणाची दिशा ठरवत असत.
त्यांच्या दानधर्माची कीर्ती देशभर पसरली होती. त्यांनी हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथ पुरी ते द्वारकेपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया उभारल्या.
बाईंनी खांद्यावर पेललेली होळकरशाही हा मराठा साम्राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. सन 1780 साली त्यांचे भारतातील स्थान इतके वरचे होते की, दिल्लीचे पातशहा त्यांना वचकून असल्याचे अस्सल पत्रांवरुन दिसते.
पाश्चात्य इतिहासकार लॉरेन्स याने अहिल्याबाईंची तुलना अकबराशी केली असून, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरिन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यापेक्षा त्या अनेक सद्गुणांनी श्रेष्ठ होत्या, असे म्हटले आहे.
अहिल्याबाई उत्तम हिंदी बोलत आणि लिहीत. एका पत्रात त्या म्हणतात, “अठाका समाचार भला छे। राज का सदा भला चाहिजे। कोई तरह की दिक्कत होने पावे नहीं।”
पेशव्यांनीही होळकरांच्या कारभाराची स्तुती केल्याचे आढळते. “मातब्बर सरदार मोठे दाबाचे होते. शिंद्यांची तो सरदारी मोडीस आली. होळकर तिकडे होते, तेणे करून राज्यात वचक होता.” हे पेशव्यांचे प्रमाणपत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५५
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग
प्रजाहितदक्षतेची उदाहरणे :
महेश्वरच्या रयतेकडून राघोबादादा पेशव्यांनी एकदा आठ बैल नेले. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या रयतेला प्रत्येकी आठ रुपये या प्रमाणे 64 रुपये स्वतःच्या तिजोरीतून भरपाई दिली.
कल्लू हवालदार या शिपायाची मोठी रक्कम भिकनगावी चोरी गेली होती. इतक्या छोट्या गोष्टीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले आणि कल्लू हवालदाराला न्याय मिळवून दिला.
चांदवडच्या मामलेदाराने रयतेला त्रास दिल्याची अहिल्याबाईंकडे तक्रार आली. त्यांनी मामलेदाराला कडक शब्दांत ताकीद दिली. “कै. सुभेदार रयतेचे उत्तम संगोपन करीत होते. रयतेला तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास देता कामा नये. त्यांची मने सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देणे. फिरून जर बोभाट कानावर आला तर, परिणाम फार वाईट होतील, हे समजावे.” यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रसंगी फटकारण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट व्हावी. राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई यशस्वी होत्या. पेशव्यांच्या दरबारात त्यांना सर्वोच्च मान होता. बाईंचा सगळ्या कारभाऱ्यांवर वचक होता. प्रशासनावर घट्ट मांड होती.
मकाजी गीते हे मराठ्यांचे मेवाडमधील वसुली अधिकारी होते. तेथील जनता त्यांना वसूल द्यायला तयार नव्हती. जनतेने लेखी मागणी केली की, “दख्खन्यांमध्ये आम्ही फक्त मातोश्री अहिल्याबाईंच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आल्यास आम्ही तुमचा भरवसा धरू.”

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५४
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

अहिल्याबाई- द्रष्ट्या प्रशासक :
अहिल्याबाईंची प्रतिज्ञा होती की, “माझे कार्य माझ्या प्रजेला सुखी करणे हे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे येथे मी जे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब परमेश्वर मला विचारणार आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या साऱ्या मला पार पाडावयाच्या आहेत.”
अहिल्याबाईंचा प्रत्येक लहानसहान व्यवहारही प्रजेचे हित बघून होत होता. त्याचे शेकडो कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. आपला प्रदेश मक्त्याने देताना त्या पुढीलप्रमाणे अटी घालत असत. 1) रयत राजी राखणे 2) राज्य समृद्ध करणे 3) नेमणुकी व खर्चाच्या मर्यादेतच खर्च करणे 4) लष्कराने पायमल्ली केल्यास कठोर दंड केला जाईल. 5) अफरातफर झाल्यास कडक शिक्षा केली जाईल.
अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडे करीत. प्रश्न सोडवित. पडीक जमिनी लागवडीखाली आणीत. शेतात विहीरी खोदून देत. सरकारी हिशोब स्वतः तपासून एकेक खाते सोलून बघत. अहिल्याबाईंनी प्रत्येक विभागाची आणि शाखेची नव्याने रचना केली. शेतसारा आणि करवसुलीची पद्धत बदलली. नवी घडी बसविली. नवे कायदे केले. त्या शेतकऱ्यांना वार्षिक 12 टक्के दराने शेतीसाठी कर्ज देत. व्यापार, वाहतूक, उद्योग वाढीला प्रोत्साहन देत. त्यामुळे महेश्वर हे विणकरांचे अखिल भारतीय केंद्र बनले. व्यापार आणि उद्योगाचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५३
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
भाग

महाराष्ट्राने आधुनिक काळात देशाला अनेक उत्तम प्रशासक दिले आहेत. ही परंपरा आपण इतिहासातून घेतलेली आहे. इंग्रज इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकर या संपूर्ण भारतातील 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या, असे सार्थ वर्णन केले आहे.
होळकर घराणे मूळचे फलटणजवळच्या होळ गावचे, म्हणून ते होळकर. या घराण्यातील आद्य व थोर योद्धे मल्हारराव होळकर यांचा जन्म सन 1693च्या मार्चमध्ये झाला. मराठा राज्यामध्ये त्यांचा विशेष दरारा होता. मल्हारराव हे धूर्त व मुत्सद्दी राजकारणी होते. ‘भाऊसाहेबांची बखर’ या ग्रंथात त्यांच्या चरित्रातील एक मार्मिक प्रसंग वर्णिलेला आहे. पेशव्यांनी शिंद्यांना तातडीचा खलिता पाठवला, ज्यात होळकरांना सोबतीला घेऊन रोहिल्यांना खतम करण्याचा आदेश दिला होता. शिंदे मल्हाररावांना भेटले आणि त्यांनी तातडीने युद्धभूमीवर येण्यासाठी विनंती केली. मल्हारराव त्यांना म्हणाले, शिंदे, तुम्हाला राजकारण कळत नाही. रोहिले मेले तर, पुण्याचे पेशवे तुम्हा-आम्हांस धोतरे बडवावयास व भांडी घासावयास ठेवतील. लक्षात ठेवा, शत्रू जिवंत आहे, तोवरच धन्याला तुमची-आमची किंमत आहे.
सन 1723मध्ये मल्हाररावांना खंडेराव हा मुलगा झाला. चौंडी गावचे माणकोजी शिंदे यांचे पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे खंडेरावांशी लग्न झाले आणि त्या मल्हाररावांच्या सून बनल्या. 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाई विधवा झाल्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी सूनेलाच मुलगा मानले. त्या मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. अहिल्याबाईंना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन मुले होती. मल्हारराव आणि अहिल्याबाई, हे नाते सासरा-सुनेचे असले तरी ते तिहेरी होते. 1) गुरू-शिष्य, 2) बाप-लेक, 3) स्वामी-सेवक.
लढवय्ये मल्हारराव 20 मे 1766 रोजी मृत्यू पावले. त्यानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. त्यानंतर पुढे सुमारे 30 वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. इंदूर ही मल्हाररावांची राजधानी होती. अहिल्याबाईंनी मात्र ती तेथून नर्मदाकाठच्या महेश्वरला हलविली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५२
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत. अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले. आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५१
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५०
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते. सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले. बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींना चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४९
कराडचे सरदार डुबल घराणे भाग
स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. सातारा आणि सांगली जिल्हय़ात वास्तव्यास असणाऱया या घराण्याचा सुमारे 400 वर्षांहून अधिक कालखंडाचा इतिहास
स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्त्वाने मराठेशाहीत आगळा ठसा उमटवला. या घराण्यांमध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. या घराण्याच्या शाखा कराड, धुळगाव, बांबवडे, चरेगाव, नरवाड येथे आहेत. या घराण्याला 400 वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे.साळोखे-डुबल घराणे हे गुजरातच्या चालुक्यांचेवंशज आहेत. शिवपूर्वकालात हे घराणे महाराष्ट्रात आले असावे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४८
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
विशेष नोंदी
१५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय. एन. एस आंग्रे असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू होता. दक्षिण मुंबईतील ओल्ड बाँबे कॅसल येथील नौदलाच्या आवारात कान्होजी आंग्र्यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
एप्रिल १९९९ मध्ये भारतीय टपाल खात्याने कान्होजी आंग्रेंवर एक तीन रूपयांचे तिकीट जारी केले. त्यात कान्होजी आंग्र्यांच्या काळातील एका जंगी जहाजाचे चित्र आहे.
खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्तिलायजर्सच्या निवासी कॉलनीचे नामकरण सरखेल कान्होजी आंग्रे नगर असे करण्यात आले आहे.
२००७ च्या “पायरेट्स ओफ द कॅरीबियन – अ‍ॅट द वर्ल्ड्‌स एन्ड” या इंग्रजी चित्रपटात “श्री संभाजी आंग्रिया” हे नऊ कुप्रसिद्ध सागरी चाच्यांपैकी एक दाखवले आहेत. कान्होजी आंग्रेवरूनच हे नाव त्यांनी उचलले असेल यात शंकाच नाही..[
ललित साहित्यातील उल्लेख
कान्होजी आंग्रे(कादंबरी) लेखिका देसाई मृणालिनी
कान्होजी आंग्रे (कादंबरी-भाषांतर) लेखक: पु. ल. देशपांडे Publisher: सन पब्लिकेशन्स
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजी कादंबरी
सेना सरखेल कान्होजी आंग्रे (चरित्र) लेखक:नाईक कृष्णकांत विद्यार्थी प्रकाशन,
Photo: सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ८ विशेष नोंदी १५ सप्टेंबर

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४७
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
वारसा

कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावग. दुर्दैवाने कान्होजींच्या मृत्यूंनंतर त्यांच्याएवढा शूर आणि यशस्वी दर्यावर्दी भारतात निर्माण झाला नाही आणि ब्रिटिशांनी हळूहळू पूर्ण भारताचा कब्जा घेतला
वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.
त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती. आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४६
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
मृत्यू

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी ह्यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली, पण त्यांना कान्होजींची सर आली नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आंअले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४५
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
प्रमुख लढाया
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४४
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
मोहिमा
कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले.साचा:अपूर्णवाक्य( नेमके कोण इंग्लंडला परतले ?) त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४३
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )

नाविक तळ
१६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४२
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्‍याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन,मुंबई पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्‍या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४१
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
कान्होजी आंग्रे
जन्म इ.स. १६६९ हर्णे, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू जुलै ४, इ.स. १७२९ कुलाबा किल्ला, अलिबाग, महाराष्ट्र, भारत.
टोपणनावे सरखेल
पदवी हुद्दा आरमार प्रमुख
कार्यकाळ १६९८ - १७२९
सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते
कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला
परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. १६ व्या शतकात कुंजली मरक्कर यांनीही परकीय सत्तेविरुद्ध असाच पराक्रम गाजवला होता
इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४०
मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी
१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवलेले अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून हे समुद्रकाठचे उत्तम विश्रांती स्थळ आहे. अली नावाच्या धनिकाच्या बागांमुळे अलिबाग नाव पडले.
या स्थानी बऱ्याच समुद्री लढाया गाजल्या. १७०६ मध्ये वरसोली येथे कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांचे युद्ध झाले. १७२२ मध्ये कुलाबा किल्ल्याच्या युद्धात इंग्रज आणि पोर्तुगीजांचा पराभव झाला. १७३० मध्ये चौल येथील युद्धात साखोजींनी ब्रिटीशांचा पराभव केला. कान्होजी आंग्रे यांनी स्वतःचे "अलीबागी रुपैय्या' असे चांदीच्या नाण्यांचे चलनही प्रचलित केले होते.
कुलाबा जलदुर्ग, चुंबकीय वेधशाळा, गणपती, मारुती व महादेवाची भव्य मंदिरे, मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी,

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९.४ 
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६
संजय सोनावणे
या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.
पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९.३ 
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १५
संजय सोनावणे
शत्रू सैन्याचा एक विभाग, मुख्य फळी पासून अलग होऊन पुढे सरकत असल्याचे गारद्यांच्या लक्षात आले. शत्रूचा बेत आपल्या डाव्या बगलेवर चालून यायचा असल्याचे गारदी अंमलदारांनी हेरून, डाव्या बाजूने चालून येणाऱ्या शत्रू सैन्याला रोखण्यासाठी त्यांनी, त्या बाजूला दोन पलटणी तैनात केल्या.
रोहिला फौज आक्रमणासाठी सिद्ध होताच सरदारांच्या आज्ञेने इशारतीची निशाणे फडकली, वाद्ये वाजू लागली व पाठोपाठ रोहिल्यांची फौज गारद्यांच्या दिशेने पुढे सरकू लागली. गारदी पलटणींवर प्रथम रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी हल्ला केला असावा कि पायदळाने ? पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, आरंभी रोहिल्यांचे घोडदळ, गारदी पलटणींवर चालून गेले. याचा परिणाम म्हणजे, शेकडो स्वार जखमी मरण पावले तर कित्येक जखमी झाले.
शत्रूसैन्य एका विशिष्ट अंतरावर येताच गारद्यांनी गोळीबारास आरंभ केला. तत्कालीन बंदुकांची रेंज काय असावी ? माझ्या मते ती काही मीटर्स पर्यंत मर्यादित असावी, पण नेमकी किती हा प्रश्न शिल्लक राहतोच ! अमेरिकेच्या यादवी युद्धांत ज्या बंदुका वापरण्यात आल्या, त्यांची रेंज ३०० यार्ड, अर्थात सुमारे पावणे तीनशे मीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. जर हि रेंज गृहीत धरली तर, स. १७५- ६० च्या काळातील बंदुकांची रेंज १०० - १५० मीटर्स इतकी तरी असावी असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी हे मान्य करतो कि, या आकडेवारीस याहून अधिक सबळ पुरावा, निदान या क्षणी माझ्याकडे नाही. तसेच याशिवाय इतरत्र कोठून माहिती मिळत नसल्याने, मला हीच आकडेवारी गृहीत धरून चालणे भाग आहे.
गारद्यांच्या गोळीबारामुळे रोहिला घोडेस्वार हतबल झाले. रोहिल्यांकडे किती प्रमाणात पायदळ होते याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, घोडदळाच्या मानाने ते फारचं कमी असावे हे निश्चित ! या रोहिला सैनिकांची शस्त्रे सामान्यतः तलवार, भाले, जंबिये, कट्यारी, सुरे इ. होती. त्याशिवाय काही जणांकडे बंदुका देखील होत्या. परंतु, नजीब वगळता इतर कोणत्याही रोहिला सरदाराकडे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख आढळत नाही ! रोहिला घोडेस्वार, गारद्यांची फळी फोडण्यास अपयशी ठरत आहेत हे पाहून बहुतेक, रोहिला सरदारांनी आपल्या घोडदळास मागे बोलावले असावे व पायदळ विभागाला गारद्यांवर चालून जाण्याचा आदेश दिला असावा. किंवा असेही असू शकते कि, रोहिल्यांचे घोडदळ जेव्हा गारद्यांवर चालून गेले, त्याचवेळी त्यांचे पायदळ देखील पाठोपाठ पुढे सरकले असावे. रोहिला स्वार, गारद्यांच्या गोळीबारामुळे अथवा सरदारांच्या आदेशाने बाजूला सटकले असावे किंवा मागे निघून गेले असावेत. घोडदळ बाजूला सरकताच / मागे हटताच रोहिला पायदळ गारदी पलटणींवर तुटून पडले असावे. गारदी सैन्यावर, रोहिल्यांनी कशा प्रकारे हल्ले केले असावेत याविषयी कसलाच अंदाज किंवा तर्क करता येत नाही अथवा केल्यास, अमुक एक प्रकारे हल्ला झाला असावा असेही ठासून सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे व ती म्हणजे, गारद्यांची फळी फोडण्याचे कार्य रोहिला पायदळाने केले ! रोहिल्यांच्या पायदळाने, गारद्यांची फळी फोडून हातघाईची लढाई आरंभली. गारद्यांनी देखील शक्य तितक्या ताकदीने शत्रूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, दुपारी एकच्या आसपास गारदी - रोहिला सैन्याची हि भयंकर झुंज संपुष्टात आली. प्रचंड प्रमाणात नुकसान सोसून रोहिले मागे हटले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९.२
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १४
संजय सोनावणे
मराठी घोडेस्वार जेव्हा रोहिल्यांच्या मोर्च्यावर चालून गेले तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी रोहिला घोडेस्वार पुढे सरसावले. आरंभी रोहिला स्वारांनी नेटाने झुंज दिली खरी पण लवकरचं त्यांना माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली. अशा स्थितीत रोहिल्यांचे पायदळ, आपल्या स्वारांच्या मदतीला धावून आले. रोहिला स्वारांना नवीन कुमक आल्यामुळे त्यांचा जोर वाढला. तुलनेने मराठी सैन्याची संख्या कमी असल्याने त्यांना माघार घेणे क्रमप्राप्त होते. मुळात, या मराठी सैन्याची संख्या साधारणतः पाच - सहा हजारांच्या आसपास असावी. समशेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर या हल्ल्यात सहभागी होते कि नव्हते याची माहिती मिळत नाही. हे जर अशा हल्ल्यात सहभागी असतील तर मराठी सैन्याची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास जाते. परंतु यांचा सहभाग असल्याबद्दल निश्चित माहिती मिळत नसल्याने हे यावेळी गोलात उभे होते असेच गृहीत धरावे लागते. असो, सुमारे पाच - सहा हजार मराठी स्वारांनी, अठरा ते वीस हजार रोहिल्यांवर चाल करून आरंभी जरी थोडेफार यश मिळवले असले तरी, शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना माघार घेणे एकप्रकारे भाग पडले. रोहिला पायदळ सैन्याने, मराठी स्वारांवर बंदुकींचा मारा केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असे जे सांगितले जाते त्यात फारसे तथ्य नाही. याचे कारण म्हणजे, रोहिल्यांपैकी फक्त नजीबाकडे अशा तऱ्हेचे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख मिळतो. इतर रोहिला सरदारांकडे अशा धर्तीची बंदुकधारी पलटणे असल्याचा उल्लेख आढळत नाही. अर्थात, ज्या रोहिला पायदळ सैनिकांकडे बंदुका होत्या त्यांनी, मराठी स्वारांवर गोळीबार केलाच नसेल असे म्हणता येत नाही पण, रोहिल्यांच्या गोळीबारामुळे मराठी घोडेस्वार मागे फिरले असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! त्याचप्रमाणे, मराठी घोडेस्वार माघार घेऊन आपल्या गोलाकडे निघाले तेव्हा रोहिला सैन्याने त्याचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चाल केली असे म्हणता येत नाही ! वस्तुस्थिती लक्षात न घेता आपल्या इतिहासकारांनी या घटनेचे बरेच अतिरंजित वर्णन केले आहे. समजा, काही क्षण असे गृहीत धरू कि, मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलात परत निघाले असताना रोहिला सैन्य त्यांच्या पाठी लागले व गारदी पलटणींवर तुटून पडले. आता अशा प्रकारचे वर्णन लिहिण्यास फक्त कल्पनाशक्तीची गरज आहे, पण असे काही वास्तवात घडू शकते का ? पाच ते सहा हजार मराठी स्वारांशी आरंभी आठ - दहा हजार रोहिला घोडेस्वार लढत होते. नंतर जवळपास तीन - चार हजार पायदळ शिपाई त्यांच्या मदतीस आल्याने मराठी घोडदळ मागे फिरले. याचा अर्थ असा कि, रोहिल्यांचे पायदळ व घोडदळ एकमेकांत मिसळून गेले असल्याने एकाचवेळी, मराठी स्वारांवर शत्रूच्या घोडेस्वाराशी व पायदळ सैनिकाशी झुंज देण्याचा प्रसंग ओढवला. अशा स्थितीत माघार घेण्याशिवाय त्यांच्यासमोर इतर पर्याय नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलाच्या दिशेने परत जात आहेत हे पाहिल्यावर, लगेचचं रोहिल्यांचे घोडेस्वार आणि पायदळ, सरमिसळ झालेल्या स्थितीत, एकप्रकारे धावत त्यांच्या पाठी लागून गेले असे म्हणायचे तर रोहिला शिपाई आपल्या स्वारांच्या बरोबरीने धावत गेले असे गृहीत धरावे लागेल. त्याशिवाय, ज्या सैनिकांना आपल्या स्वारांच्या सोबत धावायला जमले नाही अथवा जे धावता - धावता तोल जाऊन किंवा ठेच लागून पडले त्यांना मागच्या बाजूने येणाऱ्या पायदळ सैनिकांनी / स्वारांनी तुडवले असेही मग गृहीत धरावे लागेल. याचा अर्थ असा होतो कि, अशा घाई - गडबडीच्या स्थितीत रोहिल्यांचे सर्वसाधारण हजार - दोन हजार शिपाई तरी निकामी झाले असावेत. आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्यावेळचे रोहिला सरदार किंवा त्यांचे अधिकारी काय मूर्ख होते ? आपल्या सैन्याला असे स्वतःच्या लष्कराच्या व जनावरांच्या पायाखाली तुडवून मारण्याची त्यांना हौस होती ? लढायांची काल्पनिक वर्णने देताना कमीतकमी वस्तुस्थितीची जाणीव ठेवण्याचे भान, निदान इतिहास लेखकांनी तरी बाळगण्याची गरज आहे ! वस्तुतः, मराठी सैन्याचा निर्णायक पराभव झाला नसून त्यांनी फक्त माघार घेतली होती. त्यांचे मुख्य लष्कर अजून कायम होते. मराठी स्वारांच्या माघारीला पळाचे स्वरूप आले नव्हते. या कारणांमुळे रोहिला सैन्य, मराठी स्वारांचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चालून गेले नाही. उलट, मराठी लष्कर मागे फिरताच, रोहिल्यांनी प्रथम आपल्या सैन्याची शिस्त बांधली. पायदळ - घोडदळ जे एकत्र झाले होते, ते वेगवेगळे होऊन उभे राहू लागले. दरम्यान रोहिला सरदार व अफगाण सरदार अमीरबेग, बरकुरदारखान यांच्यात चढाई विषयी चर्चा किंवा सल्ला मसलत घडून आली. त्यानुसार रोहिल्यांनी, गारदी पलटणींवर समोरून हल्ला करायचा तर अफगाण सरदारांनी, गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून जायचे असे ठरवण्यात आले. अमीरबेग व बरकुरदार सोबत साधारणतः चार - पाच हजार स्वार असावेत. या सैन्याजवळ तोफखाना बहुतेक नसावा, आणि असल्यास त्या तोफा फारतर लहान व वजनाला हलक्या अशा असाव्यात. त्यामुळेचं या सैन्याला अल्पावधीत, गारद्यांच्या डाव्या अंगावर चालून जाता आले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.१ 


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १३
संजय सोनावणे
विंचूरकर, पवार प्रभूती सरदार रोहिल्यांवर चालून गेले. मराठी घोडेस्वार वेगाने धावून येत असल्याचे पाहिल्यावर रोहिले देखील मोर्च्यातून बाहेर पडले. रोहिल्यांच्या फौजेत स्वार किती होते व पायदळ किती होते याची निश्चित आकडेवारी मिळत नाही पण, त्यांच्या सैन्यात घोडेस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांच्याकडे पायदळ होते पण त्याचे प्रमाण एकूण सैन्याच्या मानाने किती होते हे सांगता येत नाही. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, रोहिला पायदळ हे बंदुकधारी असल्याचे जे सांगितले जाते ते अर्धसत्य आहे ! सर्वचं रोहिला शिपायांकडे बंदुका होत्याचं असे नाही.
मराठी घोडदळ जेव्हा रोहिल्यांवर चालून गेले तेव्हा त्यांचा मुकाबला प्रथम कोणी केला असावा ? रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी कि पायदळ शिपायांनी ? तेव्हाची हल्ल्याची किंवा बचावाची पद्धत कशी असावी ? शत्रूवर चालून जाताना आक्रमक सैन्य, विशेषतः घोडदळ हे एकमेकांना काहीसे बिलगून, फळी धरून जात असे. पायदळ सैन्य असेल तर काही एक अंतरापर्यंत ते शिस्तीने चालत जात असे व त्यानंतर पुढे धावून जाताना मात्र सैन्याची शिस्त बिगडून ते काहीसे विस्कळीत होत असे. बचाव करणारे सैन्य, जर घोडेस्वार असतील तर, मोर्च्याच्या बाहेर येऊन काही एक अंतरावर फळी धरून उभे राहात किंवा ते देखील शत्रूवर चालून जात. परंतु बचावाची जबाबदारी जर पायदळावर असेल व घोडदळ त्यांच्यावर चालून येत असेल तर पायदळ सैनिक आपले भाले रोखून घोडेस्वारांचा मुकाबला करत. भाल्यांची लांबी सामान्यतः सात - आठ फूट असे. त्यामुळे भालाईत सैनिक आपल्या भाल्याच्या लांबीचा फायदा घेऊन स्वार अथवा घोड्यास लक्ष्य करत असे. एकदा स्वार घोड्यावरून खाली आला कि तो सावरेपर्यंत त्याचा निकाल लावता येई अथवा सरळ स्वारास लक्ष्य करता येत असे. त्यावेळी लढाईची देखील एक विशिष्ट पद्धत असे. आक्रमण करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या सैन्याच्या लागोपाठ अशा रांगा असत. जोवर पुढील रांगेतील सैनिक / स्वार मृत वा जखमी होऊन खाली पडत नसे तोवर मागच्या रांगेत उभे असलेल्या सैनिकाला पुढे जाता येत नसे. आघाडीच्या फळीतील सैन्य लढत असे तेव्हा मागील रांगांतील शिपाई आरोळ्या ठोकून आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवीत असत. आघाडीवर ज्या ठिकाणी सैन्य लढत असे त्या ठिकाणी हातातील शस्त्रांचा पुरेपूर वापर करण्याइतपत फारशी मोकळी जागा उपलब्ध नसे. त्यामुळे कित्येकदा तलवार, भाले बाजूला राहून कट्यारी, सुरे यांचा वापर केला जात असे किंवा मग सरळ गुद्दागुद्दी सुरु होत असे. लढाईत माघारीचा जेव्हा प्रसंग येई, तेव्हा मागचे सैनिक प्रथम पळत असत व पाठोपाठ आघाडीचे सैनिक येत असत. सैन्याची माघार कधी शिस्तबद्ध अशी असे तर कधी बेशिस्तपणे ! सैन्याने कच खाऊन माघार घेतल्यास त्याला पळाचे स्वरूप येत असे. कित्येकदा सैनिक हातातील शस्त्रे टाकून पळ काढत असत. सारांश, तत्कालीन युद्धपद्धतीचे स्वरूप काहीसे असे होते

Wednesday 17 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १२
संजय सोनावणे
मराठी घोडदळ जेव्हा रोहिला सैन्यावर चालून गेले त्यावेळी गारद्यांनी आपला तोफखाना बंद केला. गारद्यांच्या बंदुकधारी पलटणी, रोहिल्यांवर गोळीबार करण्यासाठी बाहेर कधी पडल्या असाव्यात ? मराठी सरदार रोहिल्यांचा पराभव करून त्यांना पळवून लावतील अथवा माघार घेऊन परत येतील या दोन्ही शक्यतांचा विचार करून इब्राहिमने आपले बंदुकधारी पायदळ गोलाच्या बाहेर आणले. हीच शक्यता अधिक ग्राह्य अशी वाटते. कारण, गारदी पलटणी जर अशा गोलाच्या बाहेर आधीच येऊन तयारीने उभ्या राहिल्या नसत्या तर मराठी स्वारांचा पाठलाग करत आलेले रोहिले थेट गोलात शिरले असते व त्या ठिकाणी रोहिल्यांचा सामना करणे गारद्यांना अवघड असे गेले असते. त्यावेळी बंदुकधारी पलटणींची गोळीबाराची पद्धत कशी असावी ? एक पलटण खाली गुडघ्यावर बसलेली असे तर दुसरी तिच्या मागे उभी असे. एका पलटणीने गोळीबार केला कि, लगेच दुसरी पलटण बंदुकीच्या फैरी झाडत असे. तोवर पहिल्या तुकडीने आपल्या बंदुका ठासून भरलेल्या असत. अशा प्रकारे शत्रूवर गोळ्यांचा अविरत वर्षाव करता येई. या ठिकाणी आणखी एका मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे व तो म्हणजे तत्कालीन बंदुकांना संगिनी / Bayonet लावण्याची पद्धत होती का ? याविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही. बंदुकींना संगीन जोडण्यास नेमका आरंभ कधी झाला असावा ? हिंदुस्थानात या प्रकारच्या बंदुका कधी वापरात आल्या असाव्यात याची नेमकी व विश्वसनीय माहिती मिळत नसल्याने पानिपत प्रसंगी गारदी सैन्याकडे अशा प्रकारच्या बंदुका होत्या कि नव्हत्या याविषयी काहीही लिहिणे चुकीचे ठरेल.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३८
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ११
संजय सोनावणे
गारद्यांच्या तोफांमुळे रोहिला सैन्याची भयंकर हानी होऊ लागली तेव्हा रोहिला सरदारांनी हळूहळू पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सहेतुक असा होता. जर शत्रूच्या तोफा तुमच्या लष्कराची नासाडी करत असतील तर दोन प्रकारे तुम्हाला स्वतःच्या फौजेचा बचाव करता येतो. शत्रूच्या तोफांच्या पल्ल्याबाहेर जाऊन, म्हणजे मागे जाऊन उभे राहाणे किंवा तसेच पुढे चालत जाणे. पुढे निघून गेल्यास शत्रूच्या पल्लेदार तोफांचे गोळे आपोआप तुमच्या सैन्याच्या पिछाडीच्या मागे जाऊन पडतात. या दरम्यान काही प्रमाणात तुमच्या सैन्याचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकवटलेल्या सैन्याला विखरून उभे केले तर हि हानी काही प्रमाणात कमी होऊ शकते. १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण - रोहिल्यांनी याच पद्धतीचा वापर करून मराठ्यांचा तोफखाना एकप्रकारे निष्प्रभ केला.
रोहिल्यांची फौज जसजशी पुढे सरकू लागली तसतसे गारद्यांच्या तोफांचे गोळे, आरंभी त्या सैन्याच्या मध्यभागी व नंतर पिछाडीला पडू लागले. आपल्या तोफांचे गोळे फुकट जात आहेत हे लक्षात आल्यावर गारद्यांनी आपल्या पल्लेदार तोफा बंद केल्या. गारद्यांच्या पल्लेदार तोफांचा मारा निष्प्रभ करण्यासाठी रोहिला सैन्य जेव्हा पुढे सरकत होते तेव्हा, ते आपल्या गोलाला भिडण्यापूर्वीचं त्याचा संहार करावा या हेतूने मराठी सरदार गोलातून बाहेर पडले असावेत. हि शक्यता जर गृहीत धरली तर विंचूरकर, गायकवाड, पवार यांनी लष्कराचा गोल अजाणतेपणी किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने अथवा गोलाची रचना समजून न घेता फोडला असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो साफ चुकीचा ठरतो.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३७
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १०
संजय सोनावणे
अब्दालीने आपल्या लष्कराची रचना करताना मुद्दाम डाव्या व उजव्या फळीच्या मागे आपली पथके उभी केली होती. सर्व लष्कर रवाना झाल्यावर तो स्वतः, डाव्या व उजव्या फळीच्या मागे उभ्या असलेल्या सैन्य पथकांना जवळपास समांतर येईल अशा पद्धतीने राखीव फौज, तोफखाना घेऊन उभा राहिला. अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा उल्लेख शेजवलकर करतात. परंतु काशीराज, नुरुद्दीन, शिवप्रसाद किंवा महंमद शाम्लू यांनी आपापल्या लेखांत असा उल्लेख केलेला आढळून येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा, पानिपत युद्धाच्या वेळी अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा जो उल्लेख केला जातो तो साफ चुकीचा आहे. जर अब्दालीकडे दुर्बीण आहे असे जर गृहीत धरले तर भाऊकडे पण दुर्बीण होती असेच म्हणावे लागेल. अशा तऱ्हेच्या वस्तू इकडे बनत नसल्या तरी त्या मुद्दामहून मागवल्या जात होत्या हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु भाऊकडे, पानिपत प्रसंगी दुर्बीण असल्याचा उल्लेख मिळत नसल्याने त्याच्याकडे ती नसावी असे मानले जाते. मग हाच न्याय अब्दालीला का लावला जात नाही ? केवळ, पानिपतचे युध्द अब्दाली जिंकला म्हणून त्याचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी या दुर्बिणीच्या भाकड कथा सांगितल्या जातात, असेच म्हणावे लागेल !

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३६
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ९
संजय सोनावणे
गारदी सैन्याची चाल ज्या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणाहून सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर दक्षिणेच्या बाजूला शत्रूसैन्याची निशाणे दिसू लागली. शत्रू सैन्याची निशाणे दृष्टीस पडल्यावर गारदी पथकांनी पूर्वेचा रोख सोडून दक्षिणेकडे, म्हणजे उजवीकडे आपला मोहरा वळवला. गारद्यांची चाल थांबताच, पाठोपाठ येणारे मराठी सैन्य देखील जागच्याजागी थांबले. गारद्यांनी आपल्या तोफांचे मोर्चे शत्रू सैन्याच्या रोखाने, दक्षिणेकडे तोंड करून उभारले. दरम्यान, याच सुमारास कधीतरी अफगाण वजीर शहावलीखान हा आपल्या लष्करासह हुजुरातीच्या अंगावर धावून आला.
गारदी - रोहिला सैन्याची लढाई :- सकाळी दहाच्या आसपास गारद्यांचा तोफखाना सुरु झाल्यावर गारद्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले विंचूरकर, गायकवाड, पवार हे सरदार गोलातून बाहेर पडून रोहिल्यांवर चालून गेले. यांच्यासोबत उभे असलेले माणकेश्वर व समशेर बहाद्दर हे दोघे या वेळी गोलात उभे होते कि तेसुद्धा इतर सरदारांसोबत गोलातून बाहेर पडले याची माहिती मिळत नाही. गारद्यांच्या उजव्या अंगाला उभ्या असलेल्या मराठी सरदारांना गोलातून बाहेर पडण्याची गरज का भासली असावी ? ते गोलातून कधी बाहेर पडले असावेत ?
आपणांस गारदी सैन्याचा मुकाबला करावा लागेल अशी रोहिला सरदारांना, आरंभी तरी अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या अपेक्षेनुसार गारदी सैन्य एकतर दिल्लीकडे जाणाऱ्या राजरस्त्याने चालून येईल किंवा शहावलीच्या दिशेने जाईल. आपणांस फारतर मराठ्यांच्या घोडदळाशी सामना करावा लागेल अशी त्यांची कल्पना होती. परंतु, जेव्हा ते गारदी सैन्यापासून दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर पोहोचले तेव्हा त्यांना थोडा आश्चर्याचा धक्का बसला. दूर अंतरावर गारद्यांची निशाणे दिसल्यावर ते काहीसे हादरले. बहुतेक आहे त्याच ठिकाणी ते काही काळ उभे राहिले. सोबत ज्या काही लांब पल्ल्याच्या तोफा उपलब्ध होत्या त्यांचे मोर्चे उभारून ते लांबूनचं युद्ध करण्यास सिद्ध झाले. काही वेळाने दोन्ही बाजूंकडून तोफांचा मारा होऊ लागला. गारदी तोपची प्रशिक्षित असल्याने, त्यांच्या तोफांचा मारा बराचसा अचूक असा होता. त्याउलट, रोहिल्यांच्या तोफांचे गोळे गारदी सैन्यावर पडत होतेचं असे नाही. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले अमीरबेग व बरकुरदारखान यावेळी पुढे सरकले होते कि नाही याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, याच सुमारास केव्हातरी हाजी जमालखान हा काही हजार अफगाण स्वारांसह व बहुतेक जड तोफांसह, रोहिल्यांच्या मागे सुमारे एक - दीड किलोमीटर्सच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३५
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ८
संजय सोनावणे
पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ? माझ्या मते, भाऊ व त्याचे सरदार यांनी असे बदल केले होते. शत्रू सैन्याने जर आपल्या गोलावर हल्ला केला तर, आपल्या जवळ पुरेसे बंदुकधारी पायदळ नसल्याने त्याला आपण गोलाजवळ येण्यापासून रोखू शकत नाही हे मराठी सरदार जाणून होते. आपल्या सैन्यात घोडदळ अधिक संख्येत असल्यामुळे, आपण गोलाच्या बाहेर पडून शत्रूवर चालून जायचे व त्याचा पराभव करून परत गोलात येऊन उभे राहायचे असे त्यांनी ठरवले होते. गोलाच्या रचनेमुळे सर्व सैन्य एकवटून चालणार असल्याने, प्रसंगी कोणत्याही मोर्च्यावर अल्पावधीत कुमक पाठविणे शक्य होणार होते. सारांश, शेजवलकर यांनी मराठी सरदारांनी गोल फोडल्याचे जे विधान केले आहे ते साफ चुकीचे आहे हे स्पष्ट होते. प्रसंग पडल्यास मराठी सरदार गोलातून बाहेर पडणार हे एकप्रकारे पूर्वनियोजित होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरातसुद्धा गोलातून बाहेर पडून अफगाण सैन्यावर चालून गेली होती. त्यावरून भाऊने गोल फोडला असे म्हणायचे का ? तात्पर्य, मराठी सरदारांनी गोल फोडला म्हणून पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला असे जे अलीकडे सांगितले जाते ते साफ चुकीचे आहे. विंचूरकर, पवार हे सरदार जरी गोलातून बाहेर पडले असले तरी परत ते आपल्या जागी येऊन उभे राहिले होते हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे, ते गोलातून बाहेर का पडले असावेत हे पाहाणे देखील गरजेचे आहे.
( या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि, प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या प्रसंगी जमिनीचे चढ - उतार कसे होते किंवा कोणत्या फौजा चढावर होत्या अथवा उतारावर होत्या / सपाटीवर होत्या याची माहिती उपलब्ध नसल्याने व अशी माहिती आता उपलब्ध होणे जवळपास अशक्य असल्याने याविषयी अंदाजे किंवा तर्काने देखील लिहिणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. )

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३४
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ७
संजय सोनावणे
मराठी सरदारांनी गोल फोडला असे शेजवलकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. शेजवलकरांच्या विधानाचा आधारे सरदारांनी गोल फोडल्याचे वर्णन, विश्वास पाटलांनी आपल्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी रंगविले आहे. परंतु, या ठिकाणी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे कि, मराठी सरदारांनी गोल फोडला होता का ? माझ्या मते, विंचूरकर प्रभूती सरदारांनी गोल फोडला नाही. पहिली गोष्ट अशी कि, या लोकांनी गोल फोडला असे कैफियतकार अजिबात लिहित नाही. भाऊचा बखरकार हा सरदारांचा पक्ष घेऊन लेखन करणारा आहे व भाऊचा विरोधक आहे तर कैफियतकार हा भाऊचा पक्षपाती आहे असे सर्वसामान्यतः मानले जाते. जर हे खरे असेल तर कैफियतकाराने पवार, विंचूरकर इ. सरदारांनी गोल फोडला असे स्पष्टपणे का लिहिले नसावे हा प्रश्न निर्माण होतोचं.
माझ्या मते गोलाच्या लढाईचे स्वरूप, व्यवस्थितरित्या स्पष्ट न झाल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला असावा. त्यासाठी प्रथम गोलाची लढाई म्हणजे काय हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. गोलाच्या लढाईचा प्रसार हा युरोपियन लोकांनी हिंदुस्थानात केला. त्यांच्या सैन्याची रचना जर लक्षात घेतली तर अशा तऱ्हेची लढाई हि बचावात्मक प्रसंगी, त्यांना अतिशय उपयुक्त अशीच होती. त्यांचे सैन्य मुख्यतः बंदुकधारी पायदळ पलटणींचे असे. त्यामानाने घोडदळाचे प्रमाण, तुलनेने अल्प असेच होते. या सैन्याची मुख्य शस्त्रे तोफा - बंदुका हि असून, यांच्या सहाय्याने शत्रूशी प्रत्यक्ष न भिडता दुरूनचं त्याचा संहार करणे त्यांना सोयीचे होते. अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास या सैन्याचा पोकळ गोल बांधून व सभोवती तोफा पेरून, लढाई देत वाट चालत जायचे त्यांना यामुळे शक्य होत असे. यांच्याकडे बंदुका व तोफा असल्याने, या सैन्याच्या पोकळ गोलावर शत्रू चालून जरी आला तरी त्याच्याशी प्रत्यक्ष हातघाईचे झुंज न देता दुरूनचं तोफा - बंदुकांच्या सहाय्याने त्याची राळ उडविणे किंवा त्याची नासाडी करणे त्यांना सोयीचे जात असे. युरोपियन लोक व्यापारी कंपन्या स्थापन करून हिंदुस्थानात आले. पुढे प्रसंगानुसार त्यांना आपल्या सैन्याची उभारणी करावी लागली. स्वदेशातून इकडे सैनिक आणण्यापेक्षा इथल्याच लोकांना, आपल्या पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन, कमी खर्चात इकडेचं फौज उभारणे आपल्या फायद्याचे आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इथल्या लोकांना हाताशी धरून आपले सैन्यदल उभारले. या सैन्यदलांवरील वरिष्ठ अधिकारी हे युरोपियन असले तरी हाताखालील अंमलदार मात्र एतद्देशीय असत. या अंमलदारांना युरोपियन लोक जे लष्करी शिक्षण देत ते युरोपियन पद्धतीचे म्हणजे कवायती सैन्याच्या लढाईचेचं असे. याचा परिणाम म्हणजे, हे अंमलदार युरोपियन लढाईची पद्धती शिकले पण त्याचा इथल्या परिस्थितीत कितपत उपयोग आहे किंवा त्याचा वापर परिस्थितीनुसार कसा करायचा हे त्यांना समजू शकले नाही. गोलाची रचना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्य लष्करात तोफखाना व बंदुकधारी पायदळाची मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. जर ते नसेल तर तलवार - भाल्यांनी लढणारे लोक शत्रू सैन्याला, आपल्या गोलानजीक येण्यापासून कसे रोखणार ? तोफा जरी सोबत असल्या तरी नुसत्या तोफांचा या कमी फारसा उपयोग होत नाही. तोफांचा मारा चुकवता येऊ शकतो. तसेच अल्पावधीत तोफांच्या जागा बदलणे देखील अवघड पडते. याचा अर्थ असा होतो कि,गोलाची रचना हि एतद्देशीय फौजांसाठी उपयुक्त अशी नव्हतीच ! याच गोलाची रचना करून निजामाने, उदगीर मोहिमेत मार खाल्ला होता. त्याच्या लष्कराच्या गोलावर हल्ला करताना, जिकडे गारदी पलटणी नव्हत्या तिकडेच मराठ्यांनी जोरदार हल्ले चढवले होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गारदी सरदारांना गोलाच्या रचनेची उपयुक्तता माहिती होती पण ज्या ठिकाणी बंदुकधारी पलटणी अल्प असून घोडदळ अधिक प्रमाणात आहे, त्या ठिकाणी हि गोलाची रचना कशी वापरायची हे त्यांना बहुतेक माहिती नसावे किंवा याचा त्यांनी विचार देखील केलेला नव्हता.
क्रमश:...

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३३
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ६
संजय सोनावणे
काशीराज पानिपत युद्धाच्या वेळी आघाडीवर असला तरी तो सुजासोबत, शिंदे - होळकरांच्या समोर उभा होता. त्यामुळे त्याला, शहावलीच्या पलीकडे उभ्या असलेल्या रोहिल्यांच्या हालचालींची फारशी माहिती असणे शक्य नाही. नजीबचा चरित्र लेखक यावेळी नजीबसोबत रणभूमीवर हजर होताच असे म्हणता येत नाही. एकूण, भाऊ कैफियतीचा लेखक, नुरुद्दीन व काशीराज हे त्रिकुट, युद्धाला प्रारंभ झाला त्या ठिकाणी हजर नव्हते हे सिद्ध होते. परंतु, तरीही या तिघांनी पानिपतच्या लढाईला आरंभ गारद्यांच्या बाजूला झाल्याचा उल्लेख केलेला आहे. यामागील कारण काय असावे ते माहिती नाही, पण या तिघांचे या विशिष्ट मुद्द्याविषयी झालेले एकमत पाहता, त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवण्याशिवाय इतर पर्याय नाही. अर्थात, जोवर अधिक विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही तोवर या तिघांच्या लेखनावर थोडाफार विश्वास ठेवावाचं लागेल !
भाऊची कैफियत, काशीराज व नुरुद्दीन यांची माहिती गृहीत धरून असे म्हणता येईल कि, पानिपतच्या लढाईला आरंभ प्रथम गारद्यांच्या बाजूला झाला. साधारणतः नऊ - साडेनऊच्या दरम्यान गारदी - रोहिला फौजा समोरासमोर आल्या असाव्यात. आपल्या उजव्या बाजूने शत्रू सैन्य चालून येत आहे हे लक्षात येतांच, यमुनेच्या दिशेने निघालेली गारदी फौज जागीच थांबली. पानिपत लढाईच्या वेळी गारदी पथके नेमकी कुठे असावीत ? कैफियतकाराच्या मते, पानिपत सोडून दीड कोस म्हणजे साडेचार - पावणेपाच किलोमीटर्स अंतर पार करून मराठी लष्कर पुढे निघून आले त्यावेळी शत्रू सैन्य त्यांच्या दृष्टीस पडले. कैफियतकार कोण होता हा मुद्दा बाजूला ठेऊन, तो हुजुरातीच्या सोबत होता हे लक्षात घेतल्यास, दीड कोसांचे अंतर पार केल्याचा जो उल्लेख त्याने केला आहे तो हुजुरातीला अनुलक्षून आहे हे उघड आहे. याचा अर्थ असा होतो कि, सध्याचे जे पानिपतचे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या आसपास हुजुरातीची फौज येऊन उभी राहिली असावी. हुजुरात जर स्मारकाच्या आसपास उभी होती असे गृहीत धरले तर गारदी फौज तेथून एक - दीड किलोमीटर्स पुढे उभी असणार हे उघड आहे. पानिपतपासून सुमारे पाच - सहा किलोमीटर्स अंतर चालून आल्यावर गारद्यांना आपल्या उजव्या बाजूला शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागल्यावर त्यांची चाल थांबली. शत्रू सैन्य सुमारे एक - दीड किलोमीटर्स पेक्षाही लांब अंतरावर उभे असावे. गारदी पथके ज्या ठिकाणी उभी होती, ती जागा उंचवट्यावर होती कि सपाटीला होती ते समजणे आता अशक्य आहे. उंचवट्यावर जर ते उभे असतील तर त्यांना लांबून, दक्षिणेच्या बाजूने येणाऱ्या शत्रूसैन्याच्या रांगा दृष्टीस पडल्या असण्याची शक्यता आहे. असे असेल तर त्यांनी तातडीने आपल्या तोफांचे मोर्चे दक्षिणेच्या बाजूला तोंड करून उभारले असावेत. जर ते सपाटीला असतील तर दुरून दिसणारी शत्रू सैन्याची निशाणे पाहून ते जागीच थांबले असावेत पण मग त्यांनी तोफांचे मोर्चे उभारण्याची घाई केली असावी कि नसावी ? कारण, फक्त निशाणांवरून समोरून येणारी शत्रूच्या सैन्याची एखादी लहानशी तुकडी आहे कि मोठी फौज आहे हे समजून येत नाही. पण अधिक माहिती उपलब्ध नसल्याने या मुद्द्यावर जास्त चर्चा करणे चुकीचे आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो कि, भाऊच्या कैफियतीनुसार प्रथम विंचूरकर, यशवंतराव पवार, माणिकराव कापरे हे सरदार पुढे सरकले. रोहिल्यांशी त्यांचा संघर्ष झाला व एकप्रकारे पराभूत होऊन हे लोक परत गोलात येऊन उभे राहिले. याविषयी विरुद्धपक्षीय बखरींमध्ये कसलाच उल्लेख मिळत नाही.