Total Pageviews

Saturday 14 March 2020

स्वराज्याचे पांडव भाग १

स्वराज्याचे पांडव

भाग १  

ह्या परिस्थितीची कल्पना करा
- स्वराज्याला मोगलांच्या अवाढव्य सेनेनी घेरलंय
- स्वराज्याच्या छत्रपतींना फितुरीने कैद करून, छळ होऊन हौतात्म्य
- स्वराज्याचे सरनोबत छत्रपतींना वाचवण्याच्या प्रयत्नात मारले जातात
- अकस्मात घडलेल्या घटनांमुळे स्वराज्याच्या फौजेत नेतृत्वा अभावी आलेला विस्कळीतपणा
- स्वराज्याच्या राजधानीला गनिमाचा विळखा
- नवअभिषिक्त छत्रपती गनिमा पासून बचाव करत पर्यायी सुरक्षित जागेकडे पळतीवर

१६८९ सालच्या मार्च महिन्यात , संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर , अगदी हाच कठीण प्रसंग महाराष्ट्र वर ओढवला होता


अशा परिस्थितीत अक्ख्या स्वराज्य आणि रयतेला गोंधळ, भीती आणि गनिमाच्या क्रूरतेचा विळखा पडण्याची शक्यता होती. स्वराज्याचे सगळे किल्ले आणि दौलत गनिमाच्या हातात सहज पडतील अशी परिस्थिती उद्भवली होती. तसे झाले असते तर शिवाजी महाराजांची विचारसरणी आणि त्यांनी सुरु केलेली ही क्रांती इथेच संपुष्टात आली असती. स्वराज्यासाठी हा अतिधोक्याचा प्रहर होता.

पण इतिहास साक्ष आहे कि स्वराज्य संपुष्टात तर आले नाहीच परंतु उलटून मोगल साम्राज्याला असा प्रतिकार केला कि १८व्या शतकात मराठा साम्राज्य शिखरा वर पोचले आणि मोगल राजवट केवळ नाममात्र तेवढी राहिली. ह्या अवघड समयी हजारो मराठी शिवाजी-भक्त आपल्या स्वराज्यासाठी असामान्य कर्तृत्व दाखवून लढले आणि त्यांच्या शौर्यामुळे हे शिवस्वराज्य टिकून राहिले. ह्या अगणित मर्द गड्यांपैकी ५ लोकं असे आहेत ज्यांना स्वराज्याचे पांडव म्हणता येईल - रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य), शंकराजी नारायण गंडेकर(सचिव), परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंत प्रतिनिधी) , संताजी घोरपडे (सरनोबत) आणि धनाजी जाधव.

सांभार :आदित्य गोखले

 https://adityagokhale.wixsite.com/kingdomofsahyadrim


No comments:

Post a Comment