Total Pageviews

Sunday 2 December 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २००

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २००
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानाच्या वधानंतर शिवरायांनी खानाच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करुन त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.तर अफझलखानाच्या वधानंतर खानाचा मुलगा व इतर सरदारांना पळून जाण्यास मदत करणार्‍या खंडोजी खोपडेला महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची प्रतापगडावर शिक्षा दिली.
पन्हाळगडची लढाई
इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.
छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.
महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.
पावनखिंडीतील विजयी स्मारक

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९९
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

अफझलखानांस घाबरून मसूरचे जगदाळे, उत्रोळीचे खोपडे आदि खानाला मिळाले तर कान्होजी जेधे (संदर्भ:जेधे शकावली)सारखे मावळातील बहूसंख्य इमानी वतनदार महाराजांना सामील झाले.आपल्या जीवाचे बरेवाईट होईल हे जाणून जिजाऊंच्या ताब्यात राज्यकारभार देऊन आपल्या सहकार्‍यांना भावी काळासाठी त्यांनी सूचना दिल्या.
खानाला आपण फार घाबरतो आणि आपल्याकडून खूप अपराध झाल्यामुळे आपण खानास भेटावयास जाण्याऐवजी खानानेच आपल्या भेटीस प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे, असा आग्रह शिवरायांनी केला.शिवरायांच्या नम्रतेच्या निरोपामुळे व स्वत:च्या सामर्थ्याची घमेंडीमुळे अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी यावयास तयार झाला.
भेटीच्या वेळी दोन्हीकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि यावेळी सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.१० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवराय भेटीसाठी खानाला सामोरे गेले असता धिप्पाड खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांचे मस्तक काखेत दाबून दुसर्‍या हाताने कट्यारीचा वार शिवरायांच्या शरीरावर केला.शिवरायांनी अंगरख्याच्या आत घातलेल्या चिलखतावर हा वार बसला.खानाचा दगा लक्षात येताच शिवरायांनी उजव्या हातातील वाघनख्यांनी वार करून खानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली.
खान'दगा दगा'असे ओरडत आतडी सावरीत बाहेर आला असता,खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार शिवरायांचा अंगरक्षक जिवा महालाने वरच्यावर अडवून सय्यद बंडाला ठार केले.पालखीत बसून पळून जाणार्‍या खानाचे मुंडके संभाजी कावजी याने उडविले.महाराज गडावर जाताच तोफेचा आवाज करण्यात आला आणि खानाच्या बेसावध सैन्यावर दाट जंगलात लपून बसलेल्या मावळयांनी तुटून पडून त्यांची दाणादाण उडविली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९८
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

चंद्रराव मोरेचा बंदोबस्त
जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा चाकर होता,त्याच्या त्रासाने जावळी खोर्‍यातील जनता त्रस्त झाली होती.मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी काबिज केली,शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी मंगळवार १५ जाने १६५६ (संदर्भ:जेधे शकावली).यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.कैदेतील मोरे आदिलशाहीशी गुप्तरुपाने पत्रव्यवहार करताना सापडल्यामुळे महाराजांनी त्याला ठार केले.रायरीवरील विजयाने महाबळेश्वर ते रायगडापर्यंतच्या कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
प्रतापगडची लढाई
आदिलशाहच्या ताब्यातील चाळीस किल्ले इ.स.१६५९ पर्यंत छत्रपतींनी जिंकले होते,या कालावधीत त्यांनी मुघलांशी नरमाईचे धोरण ठेवले.शिवरायांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान या सरदारास आदिलशहाने पाठविले. शिवरायांना कैद करून विजापूरात घेऊन येण्याची प्रतिज्ञा करून अफाट सैन्यासह खान स्वराज्यावर चालून आला.स्वराज्यात येताना खान तुळजापूर,पंढरपूर आणि वाटेतील इतर गावातील देवस्थानाची तोडफोड करत, वाईला तळ ठोकून राहिला.
खानाच्या प्रचंड अशा सैन्याशी समोरासमोर लढण्याची ताकद त्यावेळी शिवरायांकडे नव्हती.याच अफझलखानाने शहाजीराजांना कैद करून अपमानास्पदरितीने बेड्या ठोकून विजापुरात नेले होते तर कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा खानामुळे मृत्यू झाला होता.
याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतीं शिवरायांनी खानाचा वध केला होता

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोऱ्यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवरायांनी सुरवातीच्या कालखंडामध्ये तोरणा,सिंहगड,चाकण आदी किल्ले आदिलशहाकडून जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणले.आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवरायांवर हल्ला करण्यास पाठविले शिवाय विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केले.
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला.यावेळी आपल्या मुसद्दीने मुघल बादशाह शाहजहान यास दख्खनच्या सुभेदार,शहजादा मुरादबक्ष याच्यामार्फत पत्र पाठवून शहाजीराजां सहित मुघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजांची सुटका झाली याबदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.
स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
सईबाईना संभाजीराजे हा पुत्र तर सखूबाई,रानूबाई,अंबिकाबाई या मुली होत्या. सोयराबाईंना राजाराम हा पुत्र तर दीपाबाई ही मुलगी होती.सगुनाबाईना राजकुंवर ही मुलगी होती. तर सकवारबाईना कमलाबाई ही मुलगी होती.
छत्रपती शिवरायांनी याच शिवलिंगावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९६
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग
सांभार :www.marathidesha.com

तीनशे वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यसत्तेच्या ताब्यात खितपत पडला होता,या लोकांनी महाराष्ट्रावर आपली राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरी लादून रयतेचा प्रचंड छळ चालविला होता.या कालखंडातील दिल्लीचे मोगल राजे,स्वत:ला हिंदूस्थानाचा अधिपति मानत.मोघलांच्या सत्तेला हिंदूस्थानात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांनी आव्हान दिले आणि आपले स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापिले.हिंदूस्थानातील जे राजे पारतंत्र्यात जगत होते त्यांना छत्रपतींनी स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.त्यामुळेच छत्रपतीं शिवरायांना युगकर्ते ,शककर्ते असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवरायांचा जन्म इ.स.१९ फेब्रुवारी १६३०(फाल्गुन वद्य तृतीया,शके १५५१) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला(संदर्भ:जेधे शकावली).सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते
छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवर याच ठिकाणी झाला

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९५
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
महाराज शककर्ते छत्रपती झाले.जिजाऊ व शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले.राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात इ.स.१७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी जिजाऊंचे निधन झाले.जिजाऊ थोर माता होत्या तसेच त्या सर्व श्रेष्ठ राजनितीतज्ञ,सर्वश्रेष्ठ योध्दा ,सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ अशा सर्व कलानिपूण व्यक्ती होत्या.
थोर समाजसेवक महात्मा फुलेंनी आपल्या पोवाड्यातून जिजाऊंची थोरवी गायली आहे.
कन्या वीर जाधवांची जिने भारत लावले पुत्रा नीट ऎकविले ॥
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले सांगत मुळी कसे झाले॥
क्षेत्रवासी म्हणौन नांव क्षत्रिय धरले क्षेत्री सुखी राहिले॥
अन्य देशिचे दंगेखोर हिमालयी आले होते लपून राहिले॥
पाठी शत्रू भौती झाडी किती उपाशी मेले गोमासा भाजून घाले॥
सर्वदेशी चाल त्यांचे पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिडीले॥
शुद्रा म्हणती तुम्हा ह्रदयी बाण रोवले आज बोधाया फावले॥
गाणे गात ऎका बाळा तुझ्या आजोळी शिकले बोलो नाही मन धरले ॥
शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टानी जिजाऊ विषयी पुढीलप्रमाणे उद्गार काढले,
कादंबिनी जगजीवनदान हेतु:॥
सौदामिनीत्व सकलही विनाशेजाय ॥
आलंबिनी भवति राजगिरे दिदानी॥
जीजा भिदायजयती शहाबकुटूंबिनीसा ॥
राजमाता जिजाऊंची समाधी,पाचाड(रायगड)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९४
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगजेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगजेबने छत्रपतींचा अपमान करून आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा बिकट प्रसंगी खचून न जाता जिजाऊंनी महाराष्ट्रात स्वराज्याचा राज्यकारभार नीट केला.
आग्र्याहून सुटल्यानंतर शिवबांनी मोघलांच्या ताब्यातील किल्ले परत घेण्याचा सपाटा चालविला.शिवरायांचा दरारा संपुर्ण भारतात निर्माण झाला होता.पण त्यांची स्वतंत्र राजा म्हणून ओळख नव्हती.त्यामुळे जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.
इ.स. ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर) रोजी राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने शिवरायांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९३
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स. १४ मे, १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे' निधन, संभाजीराजांच्या लहान वयात झाल्यामुळे त्यांच्या पालनपोषनाची जबाबदारी जिजाऊंनी पार पाडली.पुढे संभाजीराजा इतिहासातील एक थोर,बुध्दिमानी,अजिंक्य पराक्रमी राजा म्हणून उदयास आला.
तिकडे दक्षिणेत आपल्या जनतेची काळजी शहाजीराजे अगदी पुत्रासारखी घेत होते.आपल्या प्रजेची जंगलातील नरभक्षक वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून अशा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे बेंगलोर नजिकच्या होदेगिरीच्या जंगलात गेले होते.वाघाचा पाठलाग करताना घोड्यावरून पडून त्यांचा दुदैवी मृत्यु झाला.ही दुदैवी घटना इ.स.२३ जानेवारी १६६४ रोजी घडली.
अशा दु:खद प्रसंगी पतीविरहाचे दु:ख बाजूला ठेवून जिजाऊंनी स्वराज्याच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले.या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची,स्वराज्यप्राप्तीची,गुलामगिरीतून लोकांना सोडविण्याची प्रबळ प्रेरणा होती.स्वराज्य वाढण्यास हातभार लागावा म्हणून वेगवेगळ्या मराठी सरदारांशी नाते जोडण्यासाठी जिजाऊंनी,शिवरायांची एकूण आठ लग्ने केली.त्यापैकी सईबाई निंबाळकर घराण्यातील,सोयराबाई मोहिते घराण्यातील,पुतळाबाई पालकर घराण्यातील,गुणवंताबाई इंगळे घराण्यातील,सगुणाबाई शिर्के घराण्यातील, काशीबाई जाधव घराण्यातील,लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील तर सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या.
पाचाड(रायगड) येथील जिजाऊंचा वाडा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९२
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
शहाजीराजांनी राजमुद्रा,विश्वासू नोकर सोबत देऊन,स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेचा निर्धार करून बालशिवाजींना व जिजाऊंना पुण्याला इ.स. १६४२ मध्ये आपल्या जहागीरीमध्ये पाठविले.थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजेंसोबत कर्नाटकात राहिले. पुण्यास आल्यानंतर जिजाऊंनी प्रथम लोकांना त्रास देणाऱ्या सावकारांचा,गुंड लोकांचा बंदोबस्त केला.हिंसक जंगली स्वापदांपासून लोकांना मुक्त केले.लोकांमध्ये हळूहळु सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी,पनवडीचा धरणे बांधली.शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून दिले.शेतसारा कमी केला.जिजाऊंची राहणी अत्यंत साधी होती..
कातकरी,कोळी,भिल्ल,कुणबी,मुसलमान,हरिजन अशा विविध जातीधर्मातील मुलांसोबत शिवरांय युध्दाचे खेळ खेळत असत.जहागिरीची वस्त्रे बाजूला ठेवून शिवराय आपल्या संवंगड्यासोबत जेवत असत.त्यामुळे बारा मावळाच्या तरूणांना शिवराय आपल्यातीलच एक वाटू लागले.मावळातील पासलकर, जेधे, मालूसरे, निंबाळकर, मोहिते, महाडिक, शिर्के, कंक, शिळीमकर,महाले,जाधव,जगताप आदि अनेक लोकांना एकत्र आणून बाल शिवबांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला.याकामी त्यांना जिजाऊंचे मागदर्शन मिळाले.
शहाजीराजे दक्षिणेत मराठा राज्य वाढवत होते,तर महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनात शिवबा आपले राज्य वाढवत होते.बेंगलोरहून परत आल्यानंतर शिवरायांनी बारा मावळ(राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर,अंबेडखिंड,खंबाटकीचा घाट येथपर्यंत पुण्याजवळचा मुलूख) खोर्‍यात राहणार्‍या आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन स्वत:ची फौज तयार केली.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी इ.स.२७ एप्रिल १६४५ साली त्यांनी भोरजवळच्या,रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,जन्मस्थानातील आतील बाजू

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९१
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
संभाजीराजेंच्या जन्मानंतर जिजाऊंना चार अपत्ये झाली पण ती जगली नाही.त्यांचे सहावे अपत्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० साली (फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१) सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.गडावर सर्वत्र आनंदी आनंद झाला.गडावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव छत्रपतींना ठेवले गेले.
दरम्यानच्या कालात अंतर्गत कलहामुळे तसेच निजामशाहच्या मृत्युमुळे निजामशाही बुडण्याची भीती निर्माण झाली.अशावेळी निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीराजेंनी निजामशाहची चाकरी पत्करली व बाल निजाम मुर्तझास मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार चालविला.अशावेळी मराठा जनता शहाजीराजेंना आपला राजा म्हणून पाहू लागली.याच कालखंडातील निजामाच्या दरबारातील कारस्थानामुळे तसेच निजामशाह व आदिलशाहच्या यांच्या तहामुळे शहाजीराजेंना निजामशाहीचा कारभार सोडून बेंगलोर येथे जावे लागले.
बेंगलोर मध्ये बालशिवबाच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शहाजीराजेंनी पार पाडली.सन १६३९ ते १६४२ या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी,तलवारबाजी,दांडपट्टा,घोडेस्वारी यात तरबेज झाले.रामायण, महाभारत या ग्रंथाचे जिजाऊंकडून संस्कार झाल्यामुळे,परकीयांविरूद्ध लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.जन्मानंतर इ.स १६४२ पर्यत त्यांचे वास्तव्य शिवनेरी, सिंदखेडराजा, खेड शिवापूर, पुणे जहागीर तसेच बेंगलोर आदि ठिकाणी होते. ·
राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांचे शिल्प,किल्ले शिवनेरी

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १९०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १९०
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
त्याकाळात जिजाऊंच्या व शहाजीराजेंच्या मनात मराठी स्वराज्य स्थापनेचा विचार येत होता.जिजाऊंचे सर्वच बंधू पराक्रमी होते,त्यामुळे बादशाहला त्यांच्यावर नेहमी संशय होता.त्यातुनच विजापुरच्या दरबारामध्ये खंडागळेचा हत्ती उधळण्याचे बनावट कारस्थान घडविले गेले.हत्तीस काबूत आणण्यासाठी दोन पथके नेमली गेली.एकाचे नेतृत्व जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी करत होते तर दुसऱ्याचे नेतृत्व जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे करत होते.या घटनेत जिजाऊंचे चुलत दीर संभाजीराजे यांच्या हातून जिजाऊंचे वडिलबंधू दत्ताजी मारले गेले.त्यामुळे रागाने जिजाऊंच्या वडिलांनी लखूजींनी संभाजीराजेंना ठार केले.शहाजीराजे भोसले लखूजीरावावर चालून गेले.या घटनेत शहाजीराजेंच्या दंडावर तलवारीचा घाव बसला.
या दुदैवी घटनेनंतर जिजाऊंनी आपल्या माहेरच्या लोकाशी संबंध तोडून टाकले.परकीयासाठी असे अनेक मराठा सरदार स्वत:चे रक्त सांडत होते.याच कालावधीत इ.स.१६२१ साली जिजाऊंना पहिला पुत्र झाला,त्याचे नाव त्यांनी आपल्या दिराच्या नावावरून संभाजीराजे असे ठेवले.
जिजाऊंच्या व शहाजीराजेंनी मनात स्वतंत्र मराठी राज्य स्थापण्याचे ठरविले होते.लखुजीराजे व शहाजीराजे एकत्र येऊन स्वतंत्र मराठी राज्य स्थापन करतील या भीतिने निजामशाहने देवगिरीच्या किल्ल्यात इ.स.२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजे यांची हत्या घडवून आणली.या घटनेनंतर शहाजीराजेंनी निजामशाहची वतनदारी सोडून आदिलशाहची वतनदारी स्वीकारली.
राजमाता जिजाऊंचे शिल्प,सिंदखेडराजा(बुलढाणा)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८९
।। राजमाता जिजाबाई ।।
सांभार :http://www.marathidesha.com
जशी चंपकेशी खुले फूल जाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे कीर्तिचा चंबू जंबू द्विपाला ।
करी साऊली माऊली मुलाला ॥
(कवीश्रेष्ठ: जयराम पिंडे,शहाजीराजेंच्या दरबारातील रत्न)
अर्थ :एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते.पण शहाजीराजेंची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती.जिजाऊंच्या कार्याचा,कर्तुत्वाचा गौरव सर्वदूर देशामध्ये व दिशामध्ये पसरला होता.अशा जिजाऊंनी साऊली होऊन आपल्या सुपूत्राला सर्वच प्रकारची सोबत,शिक्षण दिले.आई होऊन शिवबावर सावलीसुध्दा धरली.
राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सिंदखेडराजा (बुलडाणा) येथे झाला.म्हाळसाराणी हे त्यांच्या आईचे नाव तर लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.दत्ताजी,अचलोजी,राघोजी व बहादुरजी हे त्यांचे वडिलबंधू होते.लखुजीराव वेरूळच्या यादव घराण्याचे वंशज होते.
जिजाऊंना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.लखुजीराव जाधव निजामशाहचे वतनदार होते.आपल्या पराक्रमाऩे त्यांनी निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले होते.इ.स.१६१० साली वेरूळ येथे निजामशाहच्या पुढाकाराने जिजाऊंचा विवाह शहाजीराजेंशी झाला.तो काळ मोठा धामधुमीचा होता.भोसले,जाधव,निंबाळकर,महाडिक,सुर्वे,शिर्के असे अनेक मराठा सरदार वतनापायी अदिलशाह,कुतूबशाह,निजामशाह,मोघल यांच्याकडे चाकरी करीत होते.·
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान,सिंदखेडराजा(बुलढाणा)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८८
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!...अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला...उजव्या दंडात घुसला हातातली तलवारं निखळंली...दुसरा तीरं कंठात...दुसरी तलवारं निखळंली...! निशस्त्र झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या ढसाव्या असं यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं राहिली नाही जिथं वारं झाला नाही. रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला. अखेरंचा श्वास फुलंला...डोळे लवले...ओठं हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झाला..."सांगा माझ्या राजाला, हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण! मातीत नाही मेला..."मातीसाठी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक असतात, पण! "मातीसाठी मारणारे फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज ढासळला

Monday 26 November 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८७
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
बघता बघता मुकर्रब खान हाजीरं झाला संगमेश्वरंला आणि मराठ्यांचा पाचशे माणूसमेळं पहिला आणि कडाडला..."यल्गारं...!!!"
......"हर हर महादेव"ची आरोळी घुमली आणि बघता बघता तलवारी खणानू लागल्या. झाडा-पानांवरची पाखरं...फड..फड..फड करत उडाली. अरे! काळोखं थरारला, रात्रं थरारली आणि बघता बघता आक्रोश किंकाळ्यांनी परीसरं दुमदुमून गेला.
शौर्याची लाट!..लाट!..लाट! अवघं तुफान..तुफान झालं. अरे! एक-एक मावळा झुंजत होता शर्तीनं लढतं होता...बस्सं!!! मोघलांचा काताकुट करत होता.
शिवाजीराजे सांगायचे "माझा एक मावळा शंभराला भारी आहे". इथं एक मावळा पाचाशेला भारी पडतं होता. मोघलांना..बस्सं!!! कापत होता...सपासप्प्प्प!!!...मुकर्रब बघत होता पण! मराठ्यांच्या शौर्यापुढं काही..काही चालत नाही. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी इथंला एक-एक गडकोटासारखा झुंजत होता. अरे! स्वतः साठ वर्षाचा "मालोजी" दोन्ही हातात समशेरं घेऊन लढतोय अफाट!..अफाट! ताकदीनं...येईल त्याला सरळं कापतोय. रक्ताच्या चिळकांड्या,,,मांसाचे लद्दे......अरे! खचं प्रेतांचा...! आणि मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला..."इस बूढें को पहलें लगाम डालों" तसं सगळं यौवनी सैन्यं महलोजी बाबांच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्रव्यूव्हात अडकवा तसा मह्लोजी अडकला, दोन्ही हातात समशेरी. याच समयी मोघलांचे एकाचंवेळी वारं झाले, हातातल्या दोन्ही तलवारींनी ते पेलंले. मह्लोजी खाली बसला, साठं वर्षाचं रगदारं शरीरं...रक्तं उफाळल...वीज लखंलखंली सप्प्प्प्प्प..!!! रक्ताच्या चिळकांड्या उडवीत पहिली फरी गारं झाली,,,दुसरी फरी,,,तिसरी फरी...अरे! तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा...ते शौर्य बघितलं आणि मग! मुकर्रबला कळलं ""वाघ"" कसा असतो.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८६
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग
संभाजी राजांना कानोकान खबरं न्हवती, आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडाबाहेरं काढण्यात यश आलं होतं. आता संभाजी गेले होते पन्हाळ्यावरं, पन्हाळ्यावरं होते सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडा" वयं वर्ष ६०, शरीरं थकलं असेलं पण! मनगटातली रग आणि छातीतली धग विझली न्हवती. आल्या आल्या संभाजी राजांनी विचारलं..."मालोजी काका मुकर्रब खानाची कोण हालचाल?" आणि कडाडला मालोजी गावराण बोलीत...
"राजं..! त्यो काय इतूयं,
आम्ही हाय न्हवं,
रेटतू की त्याला...!"
आणि संभाजी म्हणाले..."मालोजी तुमच्या खांद्यावरं तरं सुरक्षित आहे स्वराज्यं"...पण! त्याचं वेळी हेर धावत आला, संभाजींना सांगता झाला..."राजं ! .. राजं ! रायगडला यातीगात खानाचा घेरा पडलाय" आणि काळजाचा ठोका चुकला "रायगड" म्हणजे "राजधानी", महाराणी तिथं आहेत, बाळंराजे तिथं आहेत आणि "स्वराज्यं सिंहासन" तिथं आहे...कुणी डावेनं डाव मांडला? आणि संभाजी राजे निघाले. मह्लोजींना सांगितलं..."लागली गरजं तरं हाकं मारू, लगोलग येउन मिळा आम्हांस!" आणि संभाजी अवघ्या "शंभर" भालायतांसोबत निघाले रायगडाकडं.
पण! तत्पुर्वीचा औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडं आलाय..."तो संभाजी रायरीचा जहागीरंदार शिर्केंशी भांडण केलंय म्हणून तिकडं आलाय, आता नामी संधी आहे". आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजी राजांनी वाटा शोधल्या पण! वाटा सगळ्याच गिरफ़्तारं, जेरबंद मुकर्रबच्या तावडीत. एक वाट होती शिल्लकं, गर्दबिकटं, वहिवाट असलेली, निबिड, काट्या-कुट्याची, किर्र झाडांची, भयाण कडेकपाऱ्यांची, दऱ्या-खोऱ्यांची बिकट..संभाजी राजांनी तिचं वाट निवडली..."" संगमेश्वराची ""

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८५
शहाजीराजेंचा जीवनक्रम
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

साल तारीख महिना ठळक घटना
१५७० मालोजीराजांचा जन्म
१५९४ शहाजीराजेंचा जन्म
१६०० मालोजीराजेंनी शिंगणापूर येथे तलाव बांधला
१६०३ मालोजीराजेंना निजामशहाकडून जहागिरी
१६०६ मालोजीराजेंचा इंदापूर(पुणे) येथे मृत्यु
१६१० शहाजीराजे व जिजाऊंचा विवाह
१६१६ रोशनगावच्या लढाईत निजामाचा सेनानी मलिकंबर पराभूत
१६१९ जिजाऊंच्या पोटी संभाजीराजेंचा जन्म
(छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू)
१६२४ भातवढीच्या लढाईत मलिकंबर विजयी
१६२५ शहाजीराजे आदिलशाहीत
१६२६ शहाजीराजेंचा तुकाबाईंशी विवाह(छत्रपती एंकोजीराजेंच्या मातोश्री)
१६२६ मे १४ निजामाचा सेनानी मलिकंबर याचा मृत्यु
१६२८ फेब्रुवारी ४ शहाजहान मोघल बादशाह झाला
१६३० फेब्रुवारी १९ छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म
१६२८ शहाजीराजे निजामशाहीत परतले
१६२९ जुलै २५ लखुजी जाधवरावांची निजामशाहकडून हत्या
१६३० नोव्हेंबर शहाजीराजे मोघलांकडे
१६३३ मार्च निजामशाहच्या वारसाला गादीवर बसवून
शहाजीराजेंचा कारभार·
१६३६ ऑक्टोबर शहाजीराजेंचा पराभव,शहाजीराजे आदिलशाहीत
१६३८ शहाजीराजेंचे बेंगलोर येथे वास्तव्य
१६४८ जुलै २५ शहाजीराजेंना आदिलशाहकडून जिंजी येथे कैद
१६४९ मे १६ शहाजीराजेंची सुटका
१६५१ गोवळकोंड्याच्या सैन्याचा शहाजीराजेंकडून पराभव
१६६४ ानेवारी २३ शहाजीराजेंचा होदेगिरीच्या जंगलात मृत्यु

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८४
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग
स्वतंत्र मराठा साम्राज्याचा संकल्प पुर्ण
शहाजीराजेंच्या निजामशाह,मोघल व अदिलशाह यांच्याकडे चाकरी केली पण ते आपला स्वाभिमान कधीच विसरले नाहीत.स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्रात धाडिले,सोबत विश्वासू लोक पाठविले.बंगळूरमध्ये असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लष्करी तसेच मुलकी शिक्षण दिले.पुढे स्वराज्य स्थापनेचे त्यांचा संकल्प त्यांचे थोरले पुत्र छत्रपती शिवाजी राजेंनी पुर्ण केला व त्यांनी एक विशाल मराठी राज्य निर्माण केले.तर धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांनी तामीळनाडूतील तंजावर येथे दुसरे स्वतंत्र मराठी राज्य निर्माण केले.
होदेगिरीच्या जंगलातील छत्रपती शहाजीराजे भोसले यांची समाधी

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८३
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

बंगळूरमध्ये असताना स्वराज्याच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आपले धाकटे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे परगण्यात स्वतंत्र कारभार करण्यासाठी पाठविले.राजेंसोबत त्यांनी कान्होजी जेधे,रांझेकर,हणमंते आदि विश्वासू मावळ्यांना पाठविले.छत्रपती शिवरायांना त्यांनी राज्यकारभारासाठीची आवश्यक असणारी राजमुद्राही दिली.
अदिलशाहीत दगा व सुटका
पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राजकारभार चालू केल्यानंतर अदिलशाहचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने दगा करून बाजी घोरपडे, मंबाजी बोसले,बाळाजी हैबतराव,बाजी पवार आदिच्या साहाय्याने शहाजीराजेंना जिंजीजवळ कैद केले व साखळदंडानी बांधून विजापुरच्या दरबारात हजर केले.तो दिवस होता इ.स.२५ जुलै १६४८.छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांनी मुत्सदीपणाने मोघल बादशाह शहाजहानला पत्र पाठवून आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीश्वराची चाकरी करू इच्छितात असे सांगितले व बदल्यात शहाजीराजेंची सुटका करण्यासाठी विजापुरच्या अदिलशाहवर दबाव आणावा असे सांगितले.हा मुत्सद्दीपणा यशस्वी ठरला व शहाजीराजांची दि.१६ मे,इ.स.१६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजेंचा दुदैवी मृत्यु
इ.स.१६६१-इ.स.१६६२ च्या कालावधीत शहाजीराजे महाराष्ट्रात आले.महाराष्ट्रात आल्यावर आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.पण पुढे ते आपल्या जहागिरीमध्ये परतले.माघ शुध्द ५,इ.स.२३ जानेवारी १६६४ मध्ये बंगळूर जवळील होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय वृक्षवेलीमध्ये अडकला व ते घोड्यासहीत खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८२
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

निजामशाहीचा स्वतंत्र कारभार
दिल्लीश्वर शहाजहान व महंमद अदिलशाह यांच्या संयुक्त फौजांनी निजामशाही संपवण्यासाठी आक्रमण केले.अहमदनगरजवळील भातवढीच्या रणांगणात शहाजीराजेंनी वजीर मलीक अंबरच्या मदतीने मोघल व अदिलशाहच्या फौजेचा पराभव केला हा ऐतिहासिक युध्द इ.स १६२४ मध्ये झाले.पण या लढाईत शहाजीराजेंचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
शहाजीराजेंनी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला.अहमदनगर जिल्ह्यातील,संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर त्यांनी निजामशाहच्या मुलाच्या नावाने छत्र धारण केले होते.त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.पण पुढे वजीर मलिक अंबरच्या निजामशहाच्या दरबारातील वागणूकीमुळे त्यांनी अदिलशाहची चाकरी पत्करली.
शहाजीराजेंना अदिलशाहने सरलष्कर हा किताब दिला तसेच त्यांना बंगळूरची जहागिरीही दिली.अदिलशाहच्या चाकरीत असताना शहाजीराजेंनी पुणे परगणा निजामशाहकडून जिंकून घेतला.बंगळूरमध्ये त्यांनी तुकाबाईशी दुसरा विवाह केला.तुकाबाईपासून त्यांना व्यंकोजी(एकोजी)हा पुत्र जाहला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८१
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव
मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
छत्रपती शहाजीराजे भोसले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १८०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८०
।।स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले।।
सांभार : मराठीदेशा .कॉम
भाग

वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.
शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७९
तुळाजी आंग्रे-:
इतिहासातील अद्वितीय पराक्रमी योद्धा …
भाग २ ..
सुवर्णदुर्गाशिवाय मराठ्यांनीं तुळाजीचे आणखी सहा किल्ले इंग्रंजाच्या मदतीनें काबीज केले. नंतर पावसाळा सुरु झाल्यामुळें मोहीम थांबली. पावसाळा संपल्यावर मोहिमेस पुन्हां सुरुवात झाली. आंग्रे दरसाल पेशव्यास कांहीं खंडणी पाठवीत असत. ती तुळाजीनें बंद केल्यामुळें ती मागण्याकरितां पेशव्यांचे वकील मध्यंतरीं तुळाजीकडे गेले असतां त्यानें त्यांचीं नाकें कापून परत पाठविलें होतें, त्यामुळे पेशवे जास्त चिडले. पेशव्यांची फौज खंडोजी माणकराच्या हाताखालीं आंगर्‍याच्या मुलुखांत शिरून त्याचा प्रदेश काबीज करीत चालली. तिनें विजयदुर्ग किल्ल्याशिवाय बाकीचा सर्व प्रदेश काबीज केला. (जाने. १७५६). तेव्हां तुळाजी आंग्रे पंताकडे येऊन तहाच्या खटपटीस लागला. त्यावेळीं (फेब्रु. १७५६) इंग्रजी आरमार विजयदुर्गपुढें येऊन दाखल झालें, त्यावेळीं तुळाजीचें व पेशव्यांचें तहाचें बोलणें चाललें असल्याचें इंग्रज अधिकारी वाटसनला कळलें. परंतु तुळाजीशीं तह करावयाचा नाहीं, असा निश्चय करुन एकदम किल्ला स्वाधीन करण्याविषयीं वाटसननें त्यास निरोप पाठविला व वेळेवर जबाब न आल्यामुळें आणि पेशवेहि जरा कां कूं करीत आहेत असें पाहून ता. १२ रोजीं इंग्रजांनीं किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. चार वाजतां इंग्रजांचे गोळे आंगर्‍यांच्या जहाजांवर पडून त्यांचीं सर्व लढाऊ जहाजें जळून खास झालीं. ता. १३ रोजीं सकाळीं इंग्रजांचे कांहीं लोक जमीनीवर उतरले. पेशव्यांची फौजहि उतरणार होती. तीस उतरूं देऊं नये म्हणून इंग्रजांनीं पुन्हां किल्ल्यावर मारा सुरु केला. कॅप्टन फोर्ड आपले लोक बरोबर घेऊन संध्याकाळीं किल्ल्यांत शिरला; आणि त्यानें वर इंग्रजांचें निशाण लाविलें. तहाची वाटाघाट चालू असतां इंग्रजांनीं किल्ल्यास वेढा दिला म्हणून तो उठविण्याबद्दल रामाजीपंतानें पुष्कळ प्रयत्‍न केले. इंग्रजांस किल्ल्यांत दहा लक्षांचा ऐवज मिळाला. तो त्यांनीं सर्व ''तुम्ही तुळाजीशीं संधान ठेवून करार मोडला अशी'' उलट सबब सांगून एकट्यानींच दडपला. वास्तविक इंग्रज हें मदतीस आले होते व मराठे सांगतील त्याप्रमाणें त्यांनीं वागण्याचें काम होते. असें असतांना किल्ला घेण्यासठीं व मराठे आरमारांत दुफळी जाणून इंग्रजांनीं किल्ला घशांत उतरविला. यानंतर एक महिन्यांत तुळाजीचा सर्व प्रांत व २७ किल्ले दोस्तांनीं घेतले. शेवटीं तुळाजी हा पेशव्यांचा खंडोजी माणकर यांच्या स्वाधीन झाला. त्यास मरेपर्यंत कैदेंत ठेविलें. तुळाजीनें कैदेंत असतांनाच फंदफितुरी करुन पेशव्यांस बराच उपद्रव दिला. नानासाहेबांच्या मृत्युसमयीं तुळाजी दंगा करणार होता. तुळाजीस वंदन, सोलापुर, राजमाची, विसापुर, नगर , चाकण, दौलताबाद वगैरे ठिकाणच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें होतें. अखेर तो वंदन येथें कैदेंतच मेला. कैदेंत त्याच्या पायांत बेडी असे. मात्र त्याचे पत्र व बायका बरोबर असत. पुत्रांनींसुद्धां बंडें वगैरें केलीं. त्या सर्वांच्या पोटगीचा बंदोबस्त पेशव्यांनीं ठेविला होता. तुळाजीचे दोन मुलगे बारा चौदा वर्षानीं कैदेंतून पळून मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास गेले असें म्हणतात. एका इंग्रज व्यापार्‍यानें तुळाजीचें वर्णन पुढीलप्रमाणें केलें आहे. ''तुळाजी निमगोरा, उंच, भव्य देखणा व अत्यंत रुबाबदार होता. त्याला पाहिल्याबरोबर मूर्तिमंत शौर्याची कल्पना मनांत येई. त्याची कृतीहि रुपास साजेशीच होती. कोणतेंहि जहाज त्याच्या तावडींत सांपडलें म्हणजे तें सहसां सुटून जात नसे. इंग्रज व्यापारी त्याच्या त्रासास इतके कंटाळलें कीं, ''देवा कसेंहि करुन यास आमच्या तावडींत आणून दे,'' अशी परमेश्वराची ते करुणा भाकूं लागले. तुळाजीची शक्ति व तयारी परिपूर्ण होती. त्याची बंदरें भरभराठींत असून रयत सुखी होती. तीस हजार फौज त्याजपाशीं जय्यत होती. तोफखान्यावर अनेक कुशल यूरोपीय लोक लष्करी व आरमारी कामें झटून करीत होते. त्याच्या आरमारांत साठांवर जहाजें असून शिवाय हत्ती, दारुगोळा व शस्त्रास्त्रें असंख्य होतीं. (राजवाडे खंड १,२,३,६; शाहुमहाराज चरित्र; धाकटे रामराजेचरित्र; ब्रह्मेंद्रचरित्रः पत्रें यादी; इ.सं. आंगरें हकीगत; कैंफियती; नानासाहेबांची रोजनिशी; फॉरेस्ट-मराठा सिरीज; एडवर्ड ईव्ह-व्हायेज ऑफ इंडिया; डफ.)
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७८
तुळाजी आंग्रे-:
इतिहासातील अद्वितीय पराक्रमी योद्धा …
भाग १
. लेखक श. श्री. पुराणिक लिहितात की, "तुळाजीची कोठेही समाधी नाही पण, सारा विजयदुर्ग हीच तुळाजीची समाधी आहे." तुळाजी आंग्रे- तुळाजी हा कान्होजी आंग्रयाचा रक्षापुत्र (राजवाडे खं. ६ ले. ४५३). त्याच्या आईचें नांव गहिनाबाई. स. १७३४ त हा आपला सावत्र बंधु संभाजी याजबरोबर हबशापासून अंजनवेल काबीज करण्यास गेला. संभाजी दौलतीवर असतां हा त्याचा कारभारी होता. मन १७४० त हिराकोटाजवळ संभाजीच्या व पेशव्यांच्या लोकांत जी झटपट झाली तींत हा जखमी होऊन पेशव्यांचा हातीं सांपडला. पुढें (१७४१ डिसेंबर) संभाजी मरण पावल्यावर याचें व पेशव्याचें सडकून वैर जुंपलें. यानें यमाजी शिवदेवाच्या वशिल्यानें मानाजीविरुद्ध शाहूकडे कारस्थान चालविलें. तेव्हां जो अंजनवेल घेईल त्यास सरखेलीचें पद देऊं अशी शाहूनें अट घातली, त्याप्रमाणें तुळाजीनें स. १७४२ त अंजनवेलचा किल्ला घेतला. त्यावर आंग्रे घराण्यांतील तंटा मिटविण्याकरितां शाहूनें मानाजीस वजारतमाब हा किताब देऊन त्यास कुलाब्याचा अधिकार दिला व तुळाजीस सरखले ही पदवी देऊन सुवर्णदुर्गापासून थेट दक्षिण कोंकणपर्यंतची हद्द वाटून दिली. ही तडजोड तुळाजीस पसंत पडली नाहीं. त्यानें मानाजीचे कबिले अडकवून ठेविल्यामुळें ब्रह्मेंद्रस्वामीनें ते सोडून देण्याविषयीं त्यास एक पत्र लिहिलें. शाहूच्या पश्चात् तर तुळाजीनें वर्तन अनावर झालें.रयतेस छाडाछेड केली. तो सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न भरतां उद्दामपणें वागूं लागल व पेशव्यांस मुळींच जुमानीनासा झाला. ताराबाईचा व पेशव्यांचा तंटा जोरांत असतां तुळाजीनें उचल घेतली; आरमाराच्या जोरानें पेशव्याविरुद्ध वावरणार्‍या तुळाजीसक नुसत्या फौजेच्या बळावर जिंकणें पेशव्यांस शक्य नव्हतें. या कारणास्तव आरमारास प्रतिआरमार आणून तुळाजीशीं युद्ध करण्याचा व्यूह रचला. तुळाजीचा नाश करण्यास इंग्रज टपलेलेच होते. यामुळें पेशव्यांनीं इंगर्जांची मदत मागतांच त्यांनीं ती मोठ्या खुषीनें देऊं केली. यावेळीं रत्‍नागिरी किल्ला बावडेकर अमात्यांचा असून तो तुळाजीनें हस्तगत केला होता, तो व सुवर्णदुर्ग असे दोन किल्ले तुळाजीजवळ पेशव्यानें मागितले. तुळाजी म्हणाला कीं सुईच्या आग्राइतकी मृत्तिका देणार नाहीं. तेव्हां पेशव्यानें ''रामाजी महादेव यांस सांगून, इंग्रज अनुकूल करुन तुळाजीवर मसलतीचा योग मांडिला. सुवर्णदुर्गांत व विजयदुर्गांत वगैरे फितुरांची संधीनें रामाजी महादेव खेळूं लागले.'' तुळाजीविरुद्ध पेशव्यांनीं करवीरकरांशींहि कारस्थान आरंभिलें तेव्हां करवीरकर यांनीं तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारांत दिला (१८ फेब्रुवारी १७५५) . रामाजी महादेवामार्फत इंग्रज व पेशवे यांच्या दरम्यान करार होऊन (१९ मार्च १७५५) इंग्रजांचें आरमार मुंबई बंदर सोडून निघालें (२२ मार्च). दुसर्‍या दिवशीं कमांडर जेम्स यानें राजापुरी बंदराबाहेर आंगर्‍यांच्या १८ जहाजांचा पाठलाग करुन त्यांनां पळवून लाविलें. पुढें पेशव्यांचीं ७ तारवें, १ बातेला व ६० गलबतें इंग्रजांस मिळालीं (ता. २५), ता. २९ ला इंग्रजांचा व आंगर्‍यांचा सामना होऊन, इंग्रज आंगर्‍यांचा पाठलाग करीत जयगडपावेतों जाऊन दुसर्‍या दिवशीं सुवर्णदुर्गास परत आले. त्याच वेळीं रामाजीपंत हा किल्ल्यावर मारा करीत होता. त्यास इंग्रजांनीं मदत केली. किल्ल्यांतील लोकांचाहि मारा कांहीं कमी नव्हता. ता. ३ एप्रिल रोजीं किल्ल्यांतील दारुखाना आग लागून उडाला व यामुळे किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळूं लागले. दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं तहाचें बोलणें लावण्यास किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले. परंतु ते बोलाचालींत वेळ काढून बाहेरच्या मदतीची वाट पहात आहेत अशी शंका येऊन रामाजीपंतानें ता. १२ रोजीं तोफांचा मारा करुन किल्ला घेतला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७७
ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास
लेखक : -पांडुरंग बलकवडे
२७ मार्च हा दिवस ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय पवित्र असतो. कारण २७९ पूर्वी म्हणजेच २७ मार्च १७३७ रोजी सव्वादोनशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या अन्यायकारी गुलामीतून ठाण्याची मुक्तता झाली होती. त्या संघर्षाचा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. इसवी सन १५००च्या सुमारास व्यापाराचे निमित्त करून आलेल्या पोर्तुगीजांनी हळूहळू सत्ता प्राप्त करून प्रजेला गुलाम केले. संपत्ती आणि धर्मांतरासाठी अतोनात अत्याचार केले. छत्रपती शिवराय आणि त्यांच्यानंतर संभाजीराजांनी त्यांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संभाजी राजांच्या पश्‍चात औरंगजेबाच्या आक्रमणाचा फायदा उठवून पोर्तुगीजांनी पुन्हा थैमान घातले होते. त्यांच्या अत्याचाराला कंटाळलेली प्रजा शाहू छत्रपती आणि पेशव्यांकडे सतत गार्‍हाणी घालत होती. बाजीराव पेशव्यांनी आपले धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाणे-वसई भागाला मुक्त करण्याची जबाबदारी सोपविली. गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी फौज मोहिमेवर निघाली. चिमाजी आप्पांनी मराठी सैन्याचे दोन भाग केले होते. शंकररावजी केशव फडक्यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्यदल वसई जिंकावयास तर सुभेदार बलकवडे आणि सुभेदार खंडोजी माणकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-साष्टी जिंकावयास दुसरे सैन्य निघाले होते. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला कंटाळलेला ठाणे-वसई परिसरातील सर्व समाज मराठ्यांच्या फौजेला सर्व प्रकारचे सहकार्य करावयास सिद्ध झाला होता. त्यांचे नेतृत्व मालाडचे अंताजी कावळे तसेच अणजूर गावचे गंगाजी, मुर्हारजी, बुबाजी, शिवाजी, नारायण नाईक, अंजूरकर बंधू करीत होते. पोर्तुगीजांचा ठाणे प्रांताचा सुभेदार होता लुई बहेलो. याच्याच मार्गदर्शनाखाली इंजिनीअर अँद्रो रिबेरो कुतिन्हु याने इ. स. १७३४ च्या सारास ठाणे शहराला भक्कम तटबंदीने बंदिस्त केले होते व त्यात सुसज्ज बालेकिल्ल्याची उभारणी केली होती. यामुळे मराठी सैन्यासमोर मोठे आव्हान होते. २६ मार्च १७३७ च्या रात्री खाडीच्या बाजूकडील पाणबुरूज आणि तटबंदीवर शिड्या लावून अचानक हल्ला केला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण राऊत, हंसा कोळी, बुबाजी नाईक अणजुरकर यांच्या सहाय्याने खाडीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश मिळविला. होनाजी बलकवड्यांनी आपल्या सैन्यासह ठाण्याच्या जमिनीकडील बाजूने हल्ला केला. त्यांच्या बरोबर इतर अणजूरकरबंधू रामाजी महादेव, रामचंद्र हरी होते. तुकनाक, धोंडनाक, गणनाक, फकीर महंद ही स्थानिक मंडळी मोलाची मदत करीत होती. मराठ्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने माघार घेऊन लुई बहेलो याने सर्व फौजेसह कुटूंबकबिल्यासह पलायन केले. रणवाद्ये वाजवीत मराठ्यांनी ठाण्यात प्रवेश केला. अशा पद्धतीने आपल्या पराक्रमाची शर्थ करून सव्वा दोनशे वर्षांच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी ठाणे-साष्टीवर शिवरायांचा भगवा फडकला. या कामगिरीबद्दल चिमाजी आप्पा पेशव्यांनी सर्व पराक्रमी योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. कोणाला सोन्याची कडी, कोणाला सोन्याच्या मोहरा, तर विशेष कामगिरी करणार्‍यांना वतने जमिनी इनाम दिल्या. अशा पद्धतीने मराठ्यांनी एका पाश्‍चात्त्य आधुनिक पोर्तुगीज सत्तेच्या जोखडातून ठाणे-साष्टी मुक्त करून देदीप्यमान इतिहास घडविला. त्याचे स्मरणे करणे यथोचित आहे.
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७६
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग
इकडे नाना फडणीस शिंद्यांच्या भयानें (ज्यावेळीं शिंदे पुण्यास आले तेव्हांच) सातार्‍याकडे निघून गेले होते. तेथून ते मेणवलीस गेल्यानंतर चिमाजीआप्पाचें दत्तविधान झालें (मे २६) व सातारकर महाराजांकडून त्यांनां पेशवाईची वस्त्रेंहि मिळालीं (२ जून); परंतु नानानीं निजाम, इंग्रज, होळकर, भोसले वगैरे मंडळींशीं राजकारण करून चिमाजीआप्पाचें उच्चाटन घडवून आणलें. त्यांनीं आपल्या मुत्सद्देगिरीनें खुद्द दौलतराव शिंद्यांसहि फोडले व त्याच्या तर्फे रावबाजीशीं सूत्र लावून त्यास गादीवर बसविण्याचें (बाजीराव रघुनाथ म्हणून) ठरविलें. या वेळीं रावबाजी जांबगावीं होते. या वर्षी दसर्‍याचा समारंभ फार थाटाचा झाला. चिमाजीआप्पाची स्वारी मोठ्या समारंभानें निघाली होती. पण हें आपलें वैभव १५-२० दिवसांतच नष्ट होणार हे श्रीमंतांच्या ध्यानांतहि आलें नाहीं. शेवटीं २६ ऑक्टोबरच्या रात्रीं या (चिमाजीस गादीवर बसविण्याच्या) सर्व कारस्थानाचा उत्पादक बाळोबातात्या पागनीस व त्याचे साथीदार यांनां दौलतरावांने कैद केलें. पहाटे होळकर व निजामाची फौज शनिवारवाड्यावर चालून आली. तत्पूर्वी रात्रींच एक चूकी झाल्यानें भाऊ व चिमाजीआप्पा निसटले. परशुरामभाऊस पकडण्याची चिठ्ठी परशुरामवैद्य यास जावयाची असतां, चुकून जासुदानें ती भाऊजवळच नेऊन दिली. तेव्हां भाऊ तात्काळ हजार पांचशें स्वार घेऊन व चिमाजीआप्पास आपल्या घोड्यावर घेऊन जुन्नरकडे पळालें. परंतु हजुरातीनें त्यांनां तेथें पकडून भाऊस मांडवगणच्या किल्ल्यांत व चिमाजीआप्पास शिवनेरीस कैदेंत ठेविलें. नंतर ठरल्याप्रमाणें नाना पुण्यास आले व रावबाजी गादीवर बसले (४ दिसेंबर). हें सर्व कारस्थान नानांचेच होतें. पुढें चिमाजी आप्पास शिवनेरीहून पुण्यास आणलें व ते शनीवारवाड्यांतच राहू लागले. तेव्हा रावबाजीनें पुण्यांतील पंडितांनां विचारून त्यांनी सांगितल्यावरून (अशास्त्रीय दत्तविधान झाल्यामुळें) चिमाजीआप्पास सक्षौर प्रायश्चित देवविलें (१७९७ नोव्हेंबर). शिंद्याच्या गृहकलहानें पुण्यास भानगडी चालू झाल्या, त्या सुमारास रावबाजीनें चिमाजीचें लग्न केले (८ जून १७९८). मुलगी आप्पाजीपंत दामले यांची नात होती; तिचें नांव सीताबाई होतें. दुसरी बायको सत्यभामाबाई नांवाची, मंगळवेढेकर मेहेंदळ्यांचीं मुलगी होती; हिचें लग्न १८१२ सालीं झालें. आप्पांचा राज्यकारभारांत फारसा प्रवेश झाल्याचें आढळून येत नाहीं. फक्त स. १७९७ च्या सुमारास गुजराथचा सुभा पेशव्यांनीं यांच्या नांवचा करून दिला होता व यांची मुतालिकी आवा शेलुकरास सांगितली होती. एवढाच उल्लेख आढळतो. पेशवाई नष्ट झाल्यानंतर यांनां इंग्रजानें पेन्शन देऊन काशीस ठेविलें व ते तेथें ९ जून १८३० रोजीं वारलें. यांची पुढील हकीकत आढळत नाहीं. [खरे-खंड, ७, ९, १०; डफ-पु.३; राजवाडे-खंड,४].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७५
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग
हे राघोबादादाचे व आनंदीबाईचे धाकटे औरस पुत्र. यांचा जन्म ता. ३० मार्च १७८४ रोजीं कोपरगांवीं झाला. राघोबादादा वारले तेव्हां चिमणाजीआप्पा यांच्या वेळीं आनंदीबाई चार महिन्यांची गरोदर होती. धाकटे बाजीराव व चिमाजीआप्पा दादासाहेबाच्या पश्चात् बरेच दिवस आनंदवल्लीस राहिले होतें. आप्पांची मुंज ८ मार्च १७८९ रोजीं झाली. खर्ड्याच्या स्वारीच्या वेळेस रावबाजी कांहीं खूळ उत्पन्न करतील म्हणून या दोघा भावांनां आनंदवल्लीहून काढून शिवनेरीस नजरकैदेंत ठेविलें होतें. सवाईमाधवराव वारल्यानंतर मुत्सद्यांच्या व मराठामंडळाच्या आग्रहावरून एखादा गोत्रज यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक बसवावा असें नानांनीं ठरविलें, परंतु पुण्यांतील लोकांनां तें पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें रावबाजी व धाकटा चिमणाजी जिवंत असतां परक्याला दत्तक कां घ्यावें? इकडे रावबाजीनींहि दौलतराव शिंद्यांस सव्वाकोट रु. देण्याचें अमीष दाखवून आपल्यास गादीवर बसविण्यासाठीं त्याची अनुमति मिळविली. तेव्हां नानांनीं पटवर्धन, रास्ते, वगैरे सरदारांच्या सल्ल्यानें चिमणाजीस दत्तक घेण्याचें ठरवून परशुरामभाऊस चिमराजीस आणण्यासाठीं जुन्नरास पाठविलें. चिमणाजी हा यशोदाबाईचा चुलत सासरा होता व धर्मशास्त्राप्रमाणें सुनेस सासरा दत्तक घेतां येत नसे. यात तोड अशी काढिली की, चिमणाजीनें फक्त सरकारकागदोपत्रीं चिमराजी माधवराव म्हणावें व खासगी व धार्मिक व्यवहारांत चिमणाजी रघुनाथ म्हणावें. पुण्याच्या लोकांच्याहि मनांत चिमणाजीसच दत्तक घ्यावें असें होतें. परंतु रावबाजीनें दौलतरावाच्या हिमायतीवर नानांचा हा बेतच मुळांत खोडून टाकला. आपणच बाजीराव रघुनाथ म्हणून पेशवे व्हावयाचें; आपण किंवा चिमाजी दत्तक जावयाचें नाहीं. असें त्यानीं ठरविलें व त्यास परशुरामभाऊहि अनुकूल झाले व नानांनींहि काळवेळ जाणून त्यास रुकार दिला. त्याप्रमाणें भाऊ या मंडळींस घेऊन पुण्यास आले (मार्च १७९६). यावेळीं चिमणाजीआप्पा घोडी भरधांव सोडून भाले फेकण्यांत तरबेज झाला होता. हा रंगानें फार गोरा, चपल व क्रोधिष्ट असे. रावबाजीनें पुण्यास आल्यावर दौलतराव शिंद्यास सव्वाकोट रु. देण्याचें लांबणीवर टाकलें व पुढें पुढें तर ते निव्वळ दौलतरावाच्या सल्ल्यानेंहि चालेनात. तेव्हां शिंद्यानें व परशुरामभाऊनें मसलत करून पेशवाईंचीं वस्त्रें घेण्याच्या निमित्तानें रावबाजींनां पुण्याच्या बाहेर काढून थेऊर येथें त्यांनां प्रथम कच्या प्रतिबंधांत ठेविलें (८ एप्रिल). पुढें देण्याघेण्याचे खटके मोडण्यासाठीं रावबाजी हे शिंद्याच्या गोटांत ता. ९ मे रोजीं रात्रीं गेले असतां शिंद्यानें त्यांनां कायमची नजरकैद केली व त्याच रात्रीं भाऊनें चिमाजीस बळजबरीनें (तो येत नसतांहि त्यास जबरदस्तीनें) पालखीत घालून पुण्याचा रस्ता पकडला; त्यानंतर मुहूर्त पाहून १२ मे रोजी शनिवारवाड्यांत प्रवेश केला (तोपर्यंत रास्त्यांच्या वाड्यांत राहिले होते)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७४
चिमणाजीआप्पा —
भाग
बाजीरावाचें व आप्पाचें शेवटी शेवटीं बिनसलें असावें. ''श्रीमंत (मस्तानीमुळें) विषयलंपट झाले, यामुळें आप्पाशीं अंतर पडून नर्मदातीरीं गेले.'' आप्पानीं १७४० च्या जानेवारींत फिरंग्याचें रेवदंडा नांवाचें (गोवें व दमण या मधील) राहिलेलें एकच ठाणें काबीज केलें. येथून परत आल्यावर आप्पांची प्रकृति वाख्यानें ढासळली. आप्पांची पहिली बायको रखमाबाई, ही त्रिंबकरावमामा पेठेची बहीण होती. हिचाच पुत्र सदाशिवराव भाऊ. भाऊचा जन्म झाल्यानंतर २८ दिवसांनींच ही वारली (३१-८-१७३०) त्यानंतर आप्पानीं अन्नपूर्णाबाई नांवाची दुसरी स्त्री केली (डिसें. १७३१). हिला बयाबाई नांवाची एक मुलगी झाली (नोव्हें. १७४०). आप्पांची प्रकृति एकदां बिघडली ती न सुधारतां अखेर पुणें येथें त्यांचें देहावसान झालें (डिसें. १७४०) त्यावेळीं अन्नपूर्णाबाई ही सती गेली. या और्ध्वदेहिकास ११७५ रु. खर्च झाला. बयाबाई ही गंगाधर नाईक यास दिली (१४ एप्रिल १७४५); ती पुढें १७५९ त वारली. आप्पा हे थोरल्या बाजीरावापेक्षां कांहीं बाबतींत श्रेष्ठ होतें. त्यानीं बाजीरावास त्याच्या दोषांवर पांघरूण घालून शेवटपर्यंत पाठपुरावा केला. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हांच आप्पांस त्यांची मुतालिकी मिळाली होती. आप्पा विचारी, धोरणी, मनमिळाऊ, शूर व नीतिमान होते. वसईच्या किल्ल्यांत सांपडलेल्या फिरंगी सरदाराच्या सुस्वरूप मुलीस त्यांनी सन्मानानें परत पाठविलें ही गोष्ट प्रख्यातच आहे. शाहू व इतर सरदार मंडळी बाजीरावाकडील काम आप्पांच्या मध्यस्तींनें उरकून घेत. बाजीरावाचीं मुलें बहुधा आप्पाजवळच असत. त्यांनां शिक्षणहि आप्पांनींच दिलें होतें. कौटुंबिक व्यवस्थाहि तेच पहात असत. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल आप्पाच लावीत. नानासाहेबांच्या अंगी जो अष्टपैलु मुत्सद्दीपणा आला होता त्यांचे श्रेय आप्पांसच होतें. आप्पानां गुजराथी लोक चिमणराजा म्हणत असत. डफ म्हणतो कीं पोर्तुगीजांवर मिळविलेल्या अनेक विजयांमुळें आप्पांची कीर्ति महाराष्ट्रांत अजरामर झाली. पाश्चात्य राष्ट्रांशीं लढण्याचे वारंवार प्रसंग आल्यानें त्यांचें असें ठाम मत झालें होतें की तोफखाना व कवायती पायदळाशिवाय पाश्चात्यांबरोबर टिकाऊ जय मिळणें नाहीं. [डप. पु.१, २; मराठी रिसायत, मध्यविभाग; नानासाहेब रोजनिशी; पत्रें यादी वगैरें; ब्रह्मेंद्र स्वामीचरित्र: राजवाडे खं. २, ३; शाहू म. ची बखर; पंतप्रधान शकावली, पृ.७].

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७३
चिमणाजीआप्पा —
भाग
फिरंग्यांच्या धार्मिक जुलुमानें कंटाळलेली अंताजी रघुनाथ व अणजूरकर नाईक वगैरे प्रांतस्थ प्रमुख मंडळी मराठ्यांस अनुकूल झाली होती. फिरंग्यांचें आरमार व सैन्य सुसज्जित असतांहि मराठ्यांनीं चिकाटीनें व शौयानें वसईसह त्यांचा वरील सर्व प्रदेश काबीज केला. पुढें (१७३८) फिरंग्यांनीं त्या प्रांतीं असलेल्या शंकराजी केशव, रामचंद्र हरि वगैरे सरदारांवर जय्यत तयारीनिशी मोहिम केली. परंतु या सुमारास मराठे भोपाळच्या मोहिमेंत गुंतल्यानें वसईभागांत त्यांनां फारशी हालचाल करतां आली नाहीं. त्यानंतर १७३८ च्या नोव्हेंबरांत आप्पा वसईच्या स्वारीवर निघाले. सहा महिने या स्वारीचा हंगाम चालू होता. दमण ते दीवपर्यंतचा सर्व किनारा त्यांनीं हस्तगत केला. या भागांत सर्वत्र चकमकी सुरू होत्या व आप्पा या सर्व किनार्‍यावर एकसारखे लढत होते. त्यांनीं प्रथम माहीम सर केले (डिसेंबर). येथें शंभर गलबतें भरून इंग्रज व हबशी यांची मदत फिरंग्यास झाली असतांहि मराठ्यांनीं माहीम काबीज केलें. नंतर केळवें, शिरगांव, डहाणू, अशेरी वगैरे ठाणीं घेतलीं. (जानेवारी १८३९). या सर्वांत तारापूरचें ठाणें मजबूत असल्यानें तेथें शिताफीचा रणसंग्राम झाला. पण अखेर तारापुरचा किल्ला मराठ्यांनीं घेतला. मात्र येथें बाजी भिवराव हा नामांकित सरदार ठार झाला (जाने.). नंतर आप्पानीं वसईवर हल्ला केला. हा वेढा तीन महिने चालू होता. मराठ्यांनी अत्यंत चिकाटीनें युद्ध चालवून हा किल्ला अखेर १३ मे रोजीं फिरंग्यांपासून काबीज केला (वसई पहा). दुसरीकडे वांदरा, वेसावे, धारावी वगैरे ठाणीं आप्पांच्या सरदारांनीं काबीज केलींच होतीं (फेब्रु). वसईच्या मोहिमेचीं खास अप्पानीं ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेलीं पत्रें वाचण्यालायक आहेत. (राजवाडे खं. ३ ले. २७; काव्येतिहास सं. पत्रें यादी ले. ४३९). सारांश या मोहिमेंत फिरंग्यांचा सुमारें पाऊणशें मैल लांबीचा (३४० गावें असलेला) प्रदेश आप्पानीं काबीज केला. त्याशिवाय ८ शहरें, २० किल्ले, २५ लाख किंमतीचा दारूगोळा व जहाजें, तोफा इतकें सामान आप्पानीं हस्तगत केलें. यावेळीं आप्पानें अगर पेशव्यानें वसईस मराठी आरमाराचा एक सुभा स्थापून इंग्रजास पायबंद घालावयास पाहिजे होता, परंतु हें त्या दोघांच्याहि लक्ष्यांत आलें नाहीं. पुढें पेशव्यांचें निजामाशीं युद्ध झालें त्यांत आप्पाहि सामील होतें (१७४०). त्यावेळी मुंगीपैठणचा तह होऊन आप्पा परतले. इतक्यांत आंग्र्यांच्या घरांत कलह माजला व मानाजीनें मदतीस बोलाविल्यावरून आप्पा कोंकणांत गेले व त्यांनीं तेथें संभाजी आंग्र्यांचा पराभव करून त्याला सुवर्णदुर्गास परतविलें (१७४०). इतक्यांत थोरले बाजीराव वारल्यानें आप्पा बरोबर नानासाहेबांस घेऊन, पुण्यास व तेथून सातार्‍यास गेले व त्यांनीं नानासाहेबास पेशवाईचीं वस्त्रें मिळवून दिलीं. (आगष्ट १७४०).