Total Pageviews

Saturday 14 March 2020

स्वराज्याचे पांडव भाग ६ परशुराम त्रिंबक कुलकर्णी

स्वराज्याचे पांडव

 भाग ६

 Znalezione obrazy dla zapytania: परशुराम त्रिंबक कुलकर्णी

परशुराम त्रिंबक कुलकर्णी ह्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक कारभारी म्हणून झाली - पण त्यांना खरी आवड होती तलवारीचा पराक्रम गाजवण्याची. रामचंद्रपंतांचे ते एक विश्वासू सोबती होते - कित्येक महत्वाच्या मोहिमा त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. अशाच एका मोहिमेत त्यांनी व्यूहरचनात्मक दृष्टीने अतिशय महत्वाचा असा पन्हाळा किल्ला परत स्वराज्यात आणला. परशुरामपंतांचा विशेष भर असायचा तो परत मिळवलेले किल्ले आणि त्यांच्यावरच्या फौजेला बळकट करण्यावर - ह्यामुळे एकदा परत जिंकून घेतलेला किल्ला भविष्यातल्या गनिमाच्या हल्ल्यांना तोंड देण्यास सज्ज असायचा. मोगल आक्रमण परतवण्यात आणि महाराष्ट्रात स्वराज्य अबाधित ठेवण्यात परशुरामपंतांचा हातभार फार मोलाचा. त्यांचे योगदान आणि कौशल्याची नोंद घेऊन राजाराम महाराजांनी त्यांना प्रतिनिधी पदावर बढती दिली(प्रतिनिधी हे पद अष्टप्रधान मंडळाच्या पेक्षा अधिकारात वरचे होते असे वाटते). पहिले प्रतिनिधी प्रल्हाद निराजी ह्यांच्या निधनानंतर परशुराम त्रिंबक प्रतिनिधीपदी आरूढ झाले आणि महाराणी ताराबाईंच्या काळात सुद्धा हे पद त्यांच्याकडे अबाधित राहिले. परशुरामपंतांची स्वराज्य सेवा थेट पेशवे काळाच्या सुरवातीस म्हणजे १७१८ पर्यंत अखंडित चालू राहिली.


संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्वराज्य गनिमाच्या हातात पडण्याची मोठी दाट शक्यता होती. पण स्वराज्यावर आलेले हे अनिष्ट टळले ते केवळ असंख्य शूर शिवाजीभक्तांमुळे. त्यांचे नेतृत्व केले ते ह्या पांडवांनी - मराठा फौजेला एकत्र बांधून ठेऊन , मोगल आक्रमण रोखून त्यांनी रयतेच्या हालापेष्टा होऊ दिल्या नाहीत. तसेच महाराष्ट्रातला लढा आपल्या अंगावर घेऊन त्यांनी राजाराम महाराजांना मोलाची सेवा दिली. राजे जिंजीला असताना त्यांनी महाराष्ट्रातले स्वराज्य लढवले. दोन्ही आघाड्यांवरची लढाईची देखरेख स्वतः सांभाळणे महाराजांना कठीण गेले असते. ह्या अतिकठीण काळात ज्यांनी स्वतःची पर्वा ना करता लढा दिला आणि स्वराज्य अबाधित राखले त्या सर्व वीरांना इतिहास नेहमीच नमन करेल - आणि ह्या सगळ्या शूरवीरांच्या अग्रभागी होते स्वराज्याचे पांडव !!

स्वराज्याचे पांडव भाग ५ धनाजी जाधव

स्वराज्याचे पांडव

 भाग ५

 धनाजी जाधवZnalezione obrazy dla zapytania: धनाजी जाधव

धनाजी जाधव हे सुद्धा पराक्रम आणि शौर्य ह्यांच्या बाबतीत संताजींच्या तोडीसतोड होते. संताजींच्या तुलनेत त्यांचा स्वभाव थोडा शांत, संयमी होता आणि जिभेत थोडा अधिक गोडवा होता. संताजींबरोबर त्यांची युती ही मोगल सैन्यासाठी महाराष्ट्र आणि दक्षिणेत दोन्ही आघाड्यांवर जणू कर्दनकाळच ठरली. धनाजींचा पराक्रम आणि त्यांनी मोगलांवर बसवलेल्या दहशतीचा एक किस्सा खाफी खान सांगतो - जेव्हा जेव्हा मोगली घोडे पाणी पिण्यास नकार द्यायचे तेव्हा त्यांचे मालक त्यांना "तुम्हाला पाण्यात धनाजीचे प्रतिबिंब दिसलं का काय?" असा सवाल करायचे. राजाराम महाराज आणि संताजीचे संबंध जेव्हा दुरुस्त होण्यापलीकडे बिघडले तेव्हा धनाजींना राजाराम महाराजांनी सरनोबत नियुक्त केले. धनाजींनी स्वराज्याची अथक सेवा राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वात तशीच अखंडित चालू ठेवली

धनाजींच्या नेतृत्वाखाली हळू हळू मराठा सैन्याने गमावलेला प्रदेश व किल्ले परत हस्तगत केले. १७०८ ला धनाजींच्या मृत्यू च्या समयी युद्धाचं पारडं स्वराज्याकडे निर्णायकरित्या झुकले होते. कठीण समयी आपल्या तलवारीचा पराक्रम आणि नेतृत्त्व कौशल्य ह्याच्या जोरावर गनिमांचा पाडाव करून धनाजींनी स्वराज्य अबाधित राखण्यात महत्वाचा वाटा उचलला

स्वराज्याचे पांडव भाग ४ शंकराजी नारायण सचिव

स्वराज्याचे पांडव

 भाग ४

 Znalezione obrazy dla zapytania: शंकराजी नारायण सचिव

शंकराजी नारायण सचिव

 शंकराजी नारायण सचिव हे एक जबरदस्त दूरद्रुष्टि आणि असीम पराक्रम लाभलेलं व्यक्तिमत्व. लढाईचे डावपेच आखण्यात रामचंद्र पंतांना मौल्यवान सल्ला व मदत मिळायची ती शंकराजींची. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला मोगलांनी हस्तगत केलेल्या बऱ्याच प्रदेश आणि किल्ल्यांना पुन्हा जिंकून घ्यायचे डावपेच दोघांनी मिळून आखले होते. १६९० मध्ये शंकराजींनी प्रतापगड, पुरंदर, तोरणा सारखे मोठे किल्ले मोगलांच्या ताब्यातून परत स्वराज्यात आणले. त्यांच्या ह्या यशस्वी मोहिमेमुळे मोगलांची बरीच पीछेहाट झाली आणि महाराष्ट्रात राजाराम राजेंची सत्ता टिकून राहिली. १६९०च्या ऑक्टोबर महिन्याच्या आसपास कधीतरी राजाराम महाराजांनी शंकराजींना सचिव हा किताब बहाल केला - ह्या पदवी बरोबर त्यांना कोकण प्रदेशचा अधिभार सोपण्यात आला. वाईचा सुभा परत स्वराज्यात आल्यावर शंकराजींना त्याचाही कार्यभार देण्यात आला. १६९२ मध्ये एका धाडसी मोहिमे मध्ये त्यांनी राजगड किल्ला परत मोगलांकडून जिंकून स्वराज्यात आणला. कारकीर्दीची सुरुवात कारभारी म्हणून करणाऱ्या शंकराजींची खरी ओळख बनवून दिली त्यांच्या तलवारीच्या पात्यानी. त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि किल्ल्यांवरून त्यांच्या सैन्य संघटन आणि युद्धकौशल्य ह्या गुणांची प्रचिती येते. पुढे शंकराजींनी भोर चे संस्थान स्थापन केले - भोर चा पंतसचिव वाडा अजूनही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. राजाराम महाराजांनंतर शंकराजींनी महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणाचा लढा चालू ठेवला. त्यानंतर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांच्या झगड्यात सापडल्यामुळे शंकराजींनी आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग पत्करला(मृत्यू : भोर नजीक अंबवडे येथे)

स्वराज्याचे पांडव भाग ३ संताजी घोरपडे

स्वराज्याचे पांडव

 भाग ३

 संताजी घोरपडे

Znalezione obrazy dla zapytania: संताजी घोरपडे

 

संताजी घोरपडे ह्यांच्याबद्दल लिहायला लागलो तर कित्येक वर्ष अपुरी पडतील. संताजी एक रणझुंजार सेनापती आणि युद्धाच्या डावपेचात तरबेज असे योद्धा होते. संपूर्ण मोगल छावणीवर त्यांनी दहशत बसवली होती. मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे. संगमेश्वरला संभाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील म्हाळोजी बाबा घोरपडेंना वीरमरण आल्यावर संताजींना सरनोबत नेमण्यात आलं. ह्या पट्टीच्या तालवारबाजाच्या शौर्याला कोणतीच सीमा माहिती नव्हती. गनिमीकाव्यात तरबेज असे संताजी ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिष्य होते. त्यांच्या गनीमीकाव्यांनी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीमुळे मोगल सैन्य संताजींना जाम घाबरून होतं. कुठून येऊन संताजी नावाची वीज आपल्यावर कोसळेल ह्याचा त्यांना भरोसाच राहिला नव्हता. अशाच एका प्रसिद्ध प्रसंगात संताजी ह्यांनी आपले बंधू बहिर्जी आणि विठोजी चव्हाण ह्यांच्यासोबत, लाखो मोगल सैन्यांनी घेरलेल्या औरंगजेबाच्या तंबूवर थेट छापा घातला. केवळ दैव बलवत्तर म्हणून औरंगजेब त्यादिवशी संताजींच्या हाती सापडला नाही.

संताजींच्या नावाचा उदय खऱ्या अर्थानी १६८९ च्या रायगडाच्या वेढ्या नंतर झाला. महाराष्ट्रात सह्याद्री पासून थेट जिंजी पर्यंत धनाजी जाधवांच्या साथीने त्यांनी मोगल सैन्यात हाहाकार माजवला होता. साधारण १९९० पासून १९९५ पर्यंत जुल्फिकार खान, अलिमर्दा खान, कासीमखान किरमाणी आणि खानाजाद खान सारख्या मातब्बर मोगल सरदारांना संतांजींनी आपल्या तलवारीचे पाणी पाजवून पराभूत केले. १६९६ मध्ये जर फितुरीमुळे संताजींचा दुर्दैवी मृत्यू ओढवला नसता तर त्यांच्या पराक्रमाने आणखीन काय इतिहास घडवला असता ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.लवकरच संताजींवर आधारित लेखांची मालिका आपणापर्यंत पोचवण्याचा मनोदय आहे

स्वराज्याचे पांडव भाग २ रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

स्वराज्याचे पांडव

 भाग २

 रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला महाराष्ट्रातील बराचसा प्रदेश आणि किल्ले मोगलांच्या हाती पडले. ह्या कठीण समयी मोगलांच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या लढ्याचे नियोजन व नेतृत्व केले ते रामचंद्र पंत बावडेकर (अमात्य) ह्यांनी. रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते थेट महाराणी ताराबाईंच्या वेळेपर्यंत स्वराज्याची अविरत सेवा केली. राजाराम महाराजांनी जिंजीला जायच्या आधी त्यांना हुकूमतपनाह (सर्वोच्च अधिकार असेलेली व्यक्ती) हा खिताब बहाल केला - ह्या गोष्टी वरूनच त्यांच्या क्षमतेची आणि कर्तृत्वाची कल्पना येते. मोगलांविरुद्धची मोहीम त्यांनी आपल्या विशाळगडाच्या तळावरून यशस्वीपणे चालू ठेवली होती. पहिल्याच मोहिमेत त्यांनी शृंगारपूर , संगमेश्वर आणि पाटण व कराड च्या आसपासचा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश परत जिंकून घेतला. ह्यामुळे आता मराठा फौजेला कठीण समयी गरज पडल्यास एक सुरक्षित आश्रयस्थान मिळाले. राजाराम महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या कालावधीत रामचंद्र पंतांनी मोगलांविरुद्ध शह आणि काटशह चालू ठेवले होते - ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कधीच औरंगजेबाच्या हाती पडला नाही.

रामचंद्र पंतांकडे माणूस निरखून त्याला योग्य पद्धतीने हाताळण्याची कला होती. एखाद्या व्यक्तीतले कौशल्यगुण हेरून त्यांचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे त्यांना चांगलच अवगत होतं. आधी उल्लेख केलेल्या चौघांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकपणे लढा चालू ठेवला. अतिशय खडतर काळात रामचंद्रपंतांनी उपलब्ध मनुष्यबळ व साधनांचा अतिशय प्रभावी उपयोग केला. शंकराजी आणि परशुराम त्रिंबक ह्यांनी मुख्यत्वे मोगलांनी महाराष्ट्रात घेतलेले किल्ले व प्रदेश परत जिंकून घेण्याचे काम केले. संताजी व धनाजी ह्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रात वायुगतीने आणि विजेच्या चपळाईनी मोघल फौजे वर असंख्य हल्ले करून त्यांना परेशान करून सोडलं. नंतर रामचंद्रपंतांनी स्वराज्यच्या ह्या २ रत्नांना महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक व दक्षिण भारतात मोगलांवर हल्ले करण्याची जबाबदारी दिली होती. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नेतृत्वहीन मराठा फौजेला एकजूट बांधून ठेवण्यात रामचंद्र पंतांचा मोठा हातभार होता. स्वराज्याच्या बंद पडलेल्या करवसुलीच्या व्यवस्थेला पुनरुज्जीवन दिल्यामुळे स्वराज्याची महाराष्ट्रात पूर्ण विस्कटलेली घडी पुन्हा थोडी सावरली गेली. मोगलांना फितूर होणाऱ्यांच्या कुटुंबाला रामचंद्र पंत अटकेत ठेवायला लागले - ह्यामुळे फंद-फितुरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. स्वराज्यसाठीचा हा लढा आणि प्रशासकीय कामातला हातभार रामचंद्र पंतांनी महाराणी ताराबाईंच्या कालावधीत हि असाच अखंड चालू ठेवला.

स्वराज्याचे पांडव भाग १

स्वराज्याचे पांडव

भाग १  

ह्या परिस्थितीची कल्पना करा
- स्वराज्याला मोगलांच्या अवाढव्य सेनेनी घेरलंय
- स्वराज्याच्या छत्रपतींना फितुरीने कैद करून, छळ होऊन हौतात्म्य
- स्वराज्याचे सरनोबत छत्रपतींना वाचवण्याच्या प्रयत्नात मारले जातात
- अकस्मात घडलेल्या घटनांमुळे स्वराज्याच्या फौजेत नेतृत्वा अभावी आलेला विस्कळीतपणा
- स्वराज्याच्या राजधानीला गनिमाचा विळखा
- नवअभिषिक्त छत्रपती गनिमा पासून बचाव करत पर्यायी सुरक्षित जागेकडे पळतीवर

१६८९ सालच्या मार्च महिन्यात , संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर , अगदी हाच कठीण प्रसंग महाराष्ट्र वर ओढवला होता


अशा परिस्थितीत अक्ख्या स्वराज्य आणि रयतेला गोंधळ, भीती आणि गनिमाच्या क्रूरतेचा विळखा पडण्याची शक्यता होती. स्वराज्याचे सगळे किल्ले आणि दौलत गनिमाच्या हातात सहज पडतील अशी परिस्थिती उद्भवली होती. तसे झाले असते तर शिवाजी महाराजांची विचारसरणी आणि त्यांनी सुरु केलेली ही क्रांती इथेच संपुष्टात आली असती. स्वराज्यासाठी हा अतिधोक्याचा प्रहर होता.

पण इतिहास साक्ष आहे कि स्वराज्य संपुष्टात तर आले नाहीच परंतु उलटून मोगल साम्राज्याला असा प्रतिकार केला कि १८व्या शतकात मराठा साम्राज्य शिखरा वर पोचले आणि मोगल राजवट केवळ नाममात्र तेवढी राहिली. ह्या अवघड समयी हजारो मराठी शिवाजी-भक्त आपल्या स्वराज्यासाठी असामान्य कर्तृत्व दाखवून लढले आणि त्यांच्या शौर्यामुळे हे शिवस्वराज्य टिकून राहिले. ह्या अगणित मर्द गड्यांपैकी ५ लोकं असे आहेत ज्यांना स्वराज्याचे पांडव म्हणता येईल - रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य), शंकराजी नारायण गंडेकर(सचिव), परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंत प्रतिनिधी) , संताजी घोरपडे (सरनोबत) आणि धनाजी जाधव.

सांभार :आदित्य गोखले

 https://adityagokhale.wixsite.com/kingdomofsahyadrim


जानोजीराजे भोसले(प्रथम)


जानोजीराजे भोसले(प्रथम)
नागपुर कर भोसले मुळ चे कोरेगाव तालुका सातारा मधील देऊर या गाव चे आहेत
राजेरघुजी भोसले यांचे पुञ नागपुर,इ स १७५५ to १७७२ = राजेरघुजी याना ४ पुञ होते-मुधोजी, जानोजी, बिँबाजी आणि साबाजी. जानोजी व साबाजी हे धाकट्या राणीचे आणी मुधोजी व बिँबाजी हे मोठ्या राणीचे पुञ परंतू जानोजीराजे हे सर्व भावंडात मोठे असल्याने रघुजीराजे यांच्या म्रुत्युपुर्वीच "सेनासाहेब सुभा" हे पद व गादिवर बसण्याचा निर्णय दिला.परंतु जानोजीराजे व मुधोजीराजे यांच्यात गादिवरुन वैमनस्य आले त्यामुळे दरबारातील वडिलधार्या व मुत्सद्दी लोकांनी पुढाकार घेउन पेशव्याकडुन जानोजीराजेस "सेनासाहेब सुभा" ची वस्ञे देऊन गादिवर बसवले आणि मुधोजीराजेस "सेनाधुरंधर" हा किताब देऊन समेट घडवुन आणला.
रघुजीराजेनी बंगालवर स्वार्या करुन ओरिसा पर्यँत मुलुख काबीज केला त्यात जानोजीराजे यानी चांगला पराक्रम गाजवला.मराठ्यांतर्फे ओरिसा प्रांतावरील सुभेदार असलेल्या मीर हबीब यास अलवर्दिखानाने ञास दिल्यानंतर त्याचा बंदोबस्त जानोजीराजेनी केला व इ स १७५१ मध्ये भोसल्याना बलसोर बंदरापर्यँत सर्व कटक प्रांत देऊन तह केला,शिवाय बंगाल व बिहार यांच्या चौथाई बद्दल नवाबाने रघुजीराजेना दरसाल १२ लाख रु देण्याचे कबुल केले.
याप्रमाणे जानोजीराजेंच्या कर्तबगारीमुळे ओरिसाप्रांतावर नागपुरकर भोसल्यांचा अधिकार झाला.इ स १७६१ मधिल पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्याचा २३ जुन १७६१ धक्क्याने पुण्यात म्रुत्यु झाला त्यावेळी जानोजीराजेनी बुंदेलखंडात जाऊन बंडाळ्या मोडुन मराठ्यांचा दरारा प्रस्थापीत केला, याचे श्रेय जानोजीराजेकडेच जाते. पानिपतचा पराभव व नानासाहेबाचा म्रुत्यु यामुळे निजामाने ६० हजार फौज घेऊन पुण्यावर चाल करण्यास निघाला त्यावेळी जानोजीराजेना मराठा संघराज्यातुन अलग करण्यासाठी दिवाण विठ्ठल सुंदर तर्फे सातार्याच्या गादिचे अमिष दाखवुन कटकारस्थान केले.पुढे हैदराबादचा निजाम अलिखानाने वर्हाडातिल प्रदेश जिँकण्यास सुरुवात केली.निजामअलीची व जानोजीराजेची गाठ बर्हाणपुर जवळ पडली निजामअलिने इब्राहिम खान गारदीच्या(हाच पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्याकडुन लढला) तोफखान्याच्या मदतीने जानोजीराजेँचा इ स १७५७ मध्ये पराभव केला आणी एलिचपुर येथे तह झाला त्यानुसार वर्हाडातील उत्पन्नापैकी ४५% नागपुरकर भोसल्यानी तर 55% निजामाने घ्यावे असे ठरले.
राघोबादादा व माधवराव पेशवे यांच्या भांडणात जानोजीराजेनी राघोबादादाकडुन बाजु घेतल्यामुळे आणि पुण्यावर १७६३ साली केलेल्या स्वारीचा(यात जानोजी यांच्या रघुजीं कारंडे या सरदाराने मोठा पराक्रम केला होता.) वचपा म्हणून जानोजीराजेना धडा शिकवण्यासाठी माधवराव पेशव्याने इ स १७६८ मध्ये नागपुरवर स्वारी करुन शहराची धुळधाण करुन प्रचंड लुटमार केली.नंतर चंद्रपुरला वेढा दिला.परंतु जानोजीराजे बाहेर असल्याने नजरकैदेत असलेल्या राघोबादादाची सुटका करतील या भितीने वेढा उठवुन त्यांचा पाठलाग करुन तह करण्यास भाग पाडले.या तहास कनकपुरचा तह म्हणतात.
या तहानुसार जानोजीराजेकडुन पेशव्यानी मराठासंघावरील स्वत:चे सर्व अधिकार मान्य करुन घेतले.२४ एप्रिल इ स १७६९ रोजी मेहकर येथे जानोजीराजे व माधवराव पेशवे यांच्या भेटी झाल्या.याच भेटीच्या परतीच्या मार्गावर नळदुर्ग परिसरात जानोजी यांच्या खालावलेल्या प्रकृतीला प्लेगच्या काळात आजाराने येडोळा या गावी गाठले. १६ मे १७७२ साली त्यांच्या जेष्ठ बंधुनी याच गावी भडाग्नि दिला.
जानोजी भोसले (नागपुर) यांची समाधी, यडोळा, उस्मानाबाद.
संदर्भ __ Rajenaresh Jadhavrao