हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध

Total Pageviews

Saturday, 22 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १००


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १००

महाराणी जिजाबाई संभाजीराजे भोसले
(मृत्यू -१७ फेब्रुवारी १७७३ ) :-

महाराणी ताराबाईनंतर करवीरकर संभाजीराजांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांनी अठराव्या शतकात जी राजकीय कर्तबगारी दाखविली, तिच्यामुळेच कोल्हापूरचे राज्य टिकले.संभाजीराजे यांना आनंदीबाई, उमाबाई, सकवारबाई, जिजाबाई, सुंदराबाई, दुर्गाबाई व कुसाबाई अशा एकूण सात राण्या होत्या. त्यांपैकी जिजाबाईंशी त्यांचा १७२७ मध्ये विवाह झाला. त्या सुस्वरुप असून हुशार व चाणाक्ष होत्या. त्यामुळे त्या राज्यकारभारात जातीने लक्ष घालीत व त्यांचे राणीवसात वर्चस्व होते आणि संभाजीराजेही त्यांचे ऐकत असत,
त्यांच्या कुशल धुरीणत्वाचे पुरावे तिच्या अनेक पत्रांमधून विखुरले आहेत. २१ नोव्हेंबर १७६३ ला जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग येथील हाताचे व पायाचे ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.छत्रपती संभाजीराजे हयात असतानाही राज्यकारभाराची धुरा बऱ्याच प्रमाणात जिजाबाईंच्या खांद्यावर होती. संभाजीराजे त्यांच्या सल्लामसलतीवर अवलंबून असत, एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर कारभाराची अनेक प्रकरणेही सोपवून देत असत. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक तपाचा काळ हा जिजाबाईंच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा काळ होता. आपापली सत्ताकेंद्रे अबाधित राखणे हा त्या काळाचाच धर्म म्हटला तर जिजाबाईंनी त्या धर्माचे उत्तम पालन केले, असे म्हटले पाहिजे.
संभाजींना कोणत्याच राणीपासून पुत्र-संतती झाली नाही. मरतेसमयी त्यांची राणी कुसाबाई गरोदर होती. तिला कन्या झाली. त्यामुळे जिजाबाईंनी दत्तक मुलगा घेतला. जिजाबाई व छ. संभाजींना पहिला बाजीराव आणि पुढे नानासाहेब पेशवा यांच्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्य यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची कल्पना होती; म्हणून त्यांनी वारणेच्या तहानंतर सबुरीचे धोरण अवलंबिले. नानासाहेब पेशव्यांनी १७४० मध्ये संभाजीं- बरोबर दोन्ही गाद्या शाहूंच्या मृत्यूनंतर एकत्र करण्याचा गुप्त करार केला होता; पण शाहूंच्या मृत्यूनंतर (१७४९) प्रत्यक्षात तो कार्यवाहीत आला नाही; तेव्हा छ. संभाजीराजांनी सातारकडे फौजा वळविल्या होत्या, पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरुन त्यांनी माघार घेतली. कारण मरतेसमयी शाहू महाराजांनी नानासाहेबांना दिलेल्या दोन सनदांमुळे त्यांनी या कराराकडे दुर्लक्ष केले. शिवाय या सनदांत एक महत्त्वाची अट होती, दत्तकाच्या बाबतीत ‘ कोल्हापूरचे करु नये ’, त्यामुळे संभाजींनी १७५०-५१ दरम्यान राज्यकारभारातून लक्ष काढून घेतले असावे; कारण त्यानंतरच्या पत्रव्यवहारांत जिजाबाईंना उद्देशून लिहिलेली पत्रे अधिक आहेत. सदाशिवरावभाऊस लिहिलेल्या एका पत्रात संभाजीराजे म्हणतात, ‘ विनंती पत्री सविस्तर अर्थ लिहीत जाणे. वरकड कित्येक राणीवास वाडा चौथा याजपाशी जे सांगणे ते सांगितले आहे. सविस्तर पत्रे त्या लिहीतील, त्यावरुन कळेल ’.कोल्हापूरचे छत्रपती आणि पेशवे यांचे ताणलेले संबंध जिजाबाईंनी शर्थीने सुधारले आणि डावपेच आखीत राज्यरक्षणाचा हेतू सिद्धीला नेला .
Posted by Vinod Jadhav at 04:24 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९९



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९९
यशवंतराव आणि बाबुराव दाभाडे
त्रिंबकरावास यशवंतराव नांवाचा एक अल्पवयी मुलगा होता. वापाच्या मरणानंतर त्याला सेनापतीची वस्त्रें मिळाल्यावर त्याच्या पालकत्वाचें काम त्याची आई उमाबाई हिजकडे आले; व पिलाजी गायकवाड त्याच्या मुतालकीच्या जागी कायम झाल्यामुळें सेनापतीचें सर्व कामकाज पाहूं लागला. अत:पर पेशवे व दाभाडे यांच्यामध्यें भांडणास जागा राहूं नये म्हणून, शाहूनें गुजराथचा सर्व कारभार दाभाड्याकडे सोंपवून, त्यानें त्या प्रांताच्या वसुलाचा अर्धा हिस्सा पेशव्यांमार्फत सरकारतिजोरित भरणा करावा असें ठरविलें. इतर स्वायामध्यें मिळालेला पैसा मात्र खर्च वजा जातां राजाच्या स्वाधीन करण्यांत यावा असा करार होता ( १७३१). पण हा करार दाभाड्यांनी पुरापुरा कधीच पाळला नाही, असें असतांहि शाहूच्या पश्चात नानासाहेब पेशव्यानें अर्ध्या गुजराथच्य सनदा यशवंतरावाच्या नांवें करून दिल्या ( १७५०).
बाबूराव:— त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर सेनापतीची वस्त्रें शाहूनें यशवंतराव दाभाड्यास दिली. त्याचप्रमाणें यापुढें पेशवे आणि दाभाडे यांच्यामध्यें वितुष्ट राहूं नये म्हणून शाहूनें स्वत: दाभाड्यांच्या गांवी (तळेगांव) येऊन त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव दाभाडे यांची मातोश्री उमाबाई दाभाडे हिची घेतली; व शाहूनें तिची समजूत केली कीं, बाजीराव हा तुझाच पुत्र आहे असें समजून याला तू क्षमा कर आणि यापुढे तुझ्या पुत्रांनी व बाजीरावाने एक चित्ताने राहावे असे कर.
सातार्‍यास परत आल्यावर शाहूने यशवंतराव व बाबुराव दाभाडे व बाजीराव बल्लाळ यांस बोलून यांचेही सख्य करून दिले. यशवंतरावांच्या ठिकाणी बाबुरावांची दृढभक्ती असून शाहूने त्यांस देऊ केलेली सेनाखासखेलीची वस्त्रे त्याने प्रथम नाकारली. परंतु शाहूने अत्यंत आग्रहपूर्वक हि वस्त्रे त्यांसच देऊन शिवाय हत्ती, घोडा, शिरपेच, कंठी वैगरे देऊन त्यांचा मोठा गौरव केला. हा बाबुराव पुढे फार पराक्रमी निघाला व त्याने अनेक पराक्रमाची कृत्ये करून मोठा लौकिक संपादन केला. यशवंतराव हा दुर्व्यसनी व दुर्बळ होता. पुढे शाहूने बाबुरावास सुरतेच्या मोहिमेवर पाठविले; या प्रसंगी बाबुरावाने मोठ्या शिताफीने अगदी थोड्या सैनिकांनीशी सुरतेच्या नबाबास गाठून त्यास अटकेत ठेविले आणि त्याच्या पासून सुरतेच्या अठठावीस महालांपैकी चौदा महालांच्या व चौथाइच्या सनदा छत्रपतींच्या नावे करून घेतल्या. इतक्यात यशवंतरावही मोठे सैन्य घेऊन सुरतेस आला. हे पाहून नवाबाने तहनाम्यातील अटी ताबडतोब पुर्‍या करून दिल्या, व या उभयतां बंधुंस मौल्यवान पोशाख दिला.
यशवंतराव आणि बाबुराव यांनी परत निघतेवेळी, खुद्द सुरतेस आपला एक अंमलदार ठेऊन सुरत अठठाविषीपैकी मिळविलेल्या चौदा महालांचा व खानदेशात जो प्रांत त्यांच्या ताब्यात आला होता त्याचा नित रीतीने बंदोबस्त लावण्याची योजना केली. या सुरतेच्या पराक्रमाबद्दल शाहूने बाबुराव दाभाड्यास सोन्याचा तोडा आणि पाच लाख रुपयांची जहागीर वंशपरंपरेने करू दिली. काही महिन्यांनी गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली. दाभाड्यांचे कोणी माणूस गुजराथेत नाही व सर्व अंमल मुख्यत्याराच्या मार्फत चालला आहे हि संधी पाहून जोरावरखां नबाबी नामक अमदाबादच्या मुसलमान ठाणेदाराने दाभाड्याची ठाणी हळू हळू उठविण्याची खटपट चालवली. हे समजताच यशवंतराव व बाबुराव यांस अमदाबादेच्या स्वारीवर पाठवले. या स्वारी बरोबर उमाबाई हीही होती. दाभाडे आपल्यावर येत आहेत हे पाहून जोरावरने जय्यत तयारी केली. त्याचे बहुतेक सैन्य कडव्या पठानाचे असून चांगले कवायती होते. लाधैस सुरवात होऊन दोन्हीकडील मिळून सुमारे १५०० लोक पडले. अखेर दाभाड्याचा जय होऊन जोरावरचा पूर्ण पराभव झाला. दाभाड्याच्या फौजेने अमदाबादेस आपली ठाणी बसवून सर्वत्र शांतता केली आणि गुजराथेचा सर्व बंदोबस्त आपला विश्वासू नोकर पिलाजी गायकवाड यास सांगून व खुद्द अमदाबादेस अप्पाजी गणेश यास ठेऊन ते परत आले. या पराक्रमाबद्दल खुश होऊन शाहूने सोन्याचे दोन तोडे करून उमाबाईंच्या पायात घातले व तेव्हापासून या घराण्यातील स्त्रियांस पायांत सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार परंपरेने करून दिला. हा अधिकार फक्त छत्रपतींच्या राणीचा असतो.
अहमदाबादेवरील स्वारी हे बाबुरावांच्या आयुष्यातील शेवटचेच कृत्य होय. यानंतर खानदेशातील सत्तेत काही बखेडा झाला म्हणून बाबुराव हा तिकडील बंदोबस्ताकरिता चालता झाला. एकदा त्याची स्वारी मौजे रामेश्वर देवळे येथे असता त्या मुक्कामी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात येऊन त्याला ठार मारण्यात आले. बाबुरावांच्या मृत्यूनंतर दाभाडे घराण्यात नाव घेण्यासारखा कोणीही शूर पुरुष अगर मुत्सद्दी झाला नाही. यांचा वंशज सांप्रत तळेगाव येथे नांदत आहे. [दाभाडे घराण्याची हकीगत; शाहूची बखर; पेशव्याची बखर; राजवाडे खं.३.]
Regards and special thank to - Rahul Bhoite
Posted by Vinod Jadhav at 04:18 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९८

त्रिंबकराव दाभाडे:— खंडेरावाची मुदत संपल्यावर पुढील वर्षाच्या मे महिन्यांत त्याचा मुलगा त्रिंबकराव यास शाहूमहाराजाकडून सेनापतीची वस्त्रें मिळाली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी गुजराथच्या मोहिमेवर त्याची रवानगी झाली. इकडे बाजीराव पेशवे यांस शाहूने माळव्यांत मुलुखगिरीकरितां पाठविलें.

इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा दाभाड्यास देण्यांत आला, व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामहि त्याकडेच सोंपविलें. परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यास मुळीच न रूचून या दोन मराठा सरदारांत कायमचें वैमनस्य आलें. पुढें दोघांनीहि ही गोष्ट शाहूच्या कानांवर घालून त्याची आज्ञा विचारली. शाहूनें आज्ञा केली की, बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव यानें जिंकलेल्या गुजराथेंत ढवळाढवळ करूं नये. यामुळें बाजीराव निरूत्तर झाला. परंतु दाभाड्याच्या मनांत बाजीरावाविषयी मत्सर उत्पन्न झाला असल्यानें त्यानें सैन्याची जमवाजमव करून राज्याचें रक्षण करण्याकरितां आपण जातो असा उद्देश जाहीर करून तो दक्षिणेंत निघाला. कंठाजी व रघूजी कदम बांडे, उदाजी व आनंदराव पवार, चिमणाजी मोघें, वगैरे सरदार त्यास सामील झाले व दक्षिणेंत आल्यावर निजामहि त्यांस येऊन मिळणार होता. त्रिंबकरावानें निजामाशी सख्य केल्याचें बाजीरावानें शाहूस सिद्ध करून दाखविलें. तरीहि पेशव्यानें लढाईला प्रत्य़क्ष सुरूवात होईपर्यंत दाभाड्याशी तहाचें बोलणें सुरू ठेविलें होतें. बाजीरावाजवळ दाभाड्याच्या अर्धे देखील सैन्य जमलें नसतांहि मोठमोठ्या मजला करून त्यानें दाभाड्याच्या सैन्यास गुजराथेंतच डभई व बडोदें यांच्या दरम्यान गांठलें ( १ एप्रिल १७३१), पहिल्याच हल्ल्याबरोबर त्रिंबकरावाच्या सैन्यांतील नवशिक्या सैनिकांनी पळ काढला तरी, त्रिंबकराव मोठ्या शौर्यानें लढत होता. परंतु त्याला अकस्मात् एक गोळी लागून तो ठार झाला. तेव्हां त्याची सर्व फौज पळून गेली. दाभाड्याकडील मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा एक पुत्र वगैरे मंडळी टार होऊन उदाजी पवार व चिमणाजी मोघे हे कैद झाले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड हे जखमी झाले, परंतु ते पळून गेले. अशा रीतीनें बाजीरावाचा जय झाला.
Posted by Vinod Jadhav at 04:05 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९७

दाभाडे:— पुणें जिल्ह्यांत दाभाड्याचें तळेगांव म्हणून एक गांव आहे; तेथें राजाराम छत्रपतीचा सेनापति खंडेराव दाभाडे याचा वंश आहे. खंडेराव हा या गांवचा मूळचा पाटील होता.
खंडेराव दाभाडे

खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यात सेनापती होते.

खंडेराव दाभाडे यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

खंडेराव दाभाडे— दाभाड्यांचा मूळपुरुष येसाजी हा तळेगाव (दाभाडे) (तालुके मावळ जिल्हा पुणे) येथील रहिवासी व मुकदम होता. दाभाडे क्षत्रिय असून यांचें गोत्र शांडिल्य व देवक कळंबाचें आहे. येसाजी हा शिवाजीमहाराजांचा हुजर्‍या होता. महाराज आग्र्यास गेले असतां येसाजीनें इकडे राजकुटुंबाची सेवा केली. येसाजीचा थोरला मुलगा खंडेराव होय. राजाराम छत्रपती हे जिंजीस जातांना येसाजीसह खंडेराव हा त्यांच्याबरोबर गेला होता. जिंजीस राजाराम यांनां संभाजी हा पुत्र झाला, तेव्हां त्यांनीं येसाजीस तळेगांव, इंदुरी, धामणें आणि उरसें हीं गांवें इनाम करून दिलीं. राजाराम हे जिंजीहून परत येत असतां मागें जनान्याच्या बंदोबस्तास येसाजी यास ठेवलें होतें. त्यानें मोठ्या युक्तीनें जनानखाना किल्ल्यांतून काढून अनेक संकटांतून पन्हाळ्यास आल्यावर येसाजी मेला. राजाराम हे जिंजीस जात असतां मोंगल मागें लागला होता. तेव्हा (खंडेरावाचा धाकटा भाऊ) शिवाजी त्याला पाठीवर घेऊन दौड मारली असता त्याची छाती फुटून व रक्ताच्या गुळण्या होऊन तो मेला होता. पन्हाळ्यास आल्यावर छत्रपतींनीं खंडेरावास सेनाधुरंधर हें पद देऊन गुजराथ व बागलाणकडे मुलुखगिरीवर पाठविलें आणि वस्त्रें व पोषाख देऊन निशाण आणि जरीपटका हवालीं केला. शिवाय जुन्नर, पुणें व हरिश्चंद्र या तीन प्रांतांची व अकोले आणि जावळें या महालांची सरपाटिलकी (दर शेंकडा २ रु.) व चाकण परगण्यांतील आणि पारनेर परगण्यांतील १६४ गांवांची सरदेशमुखी दिली. शाहुछत्रपती सुटून आल्यानंतर खंडेराव ताराबाईला सोडून त्यांनां जाऊन मिळाला. मध्यंतरी चंद्रसेनानें खंडेरावास ताराबाईकडे ओढण्याचा प्रयत्‍न केला होता. पुढें १७१७ त खंडेरावास सेनापतीचें पद शाहुछत्रपतीनें दिलें, तें पुढें त्याच्या कुटुंबांत कायम झालें. याच वेळीं दिल्लीच्या बादशहानें दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्ध उठण्यास शाहूमहाराजांस कळविलें असतां, त्यांनी तें काम खंडेरावावर सोंपविलें. त्यानें खानदेश गुजराथवर स्वार्‍या करून हुसेनचा रस्ता अडविला, तेव्हां त्यानें झुल्फिकारबेग यास त्याच्यावर पाठविलें. खंडेरावानें त्याची सारी फौज (झुल्फिकारसुद्धां) अडचणींत गांठून कापून काढली. तेव्हां हुसेननें आपले दिवाण मोहकमसिंग व चंद्रसेन जाधव यांनां रवाना केलें. त्यांची लढाई नगरजवळ झाली व पुढें खंडेरावानें निंबाळकर व सोमवंशी यांच्या मदतीनें मोंगलांचा पुरता मोड केला. यापुढें खंडेरावानें गुजराथ काठेवाडकडे मराठी अंमल बसवावा अशा हुकूम छत्रपतींनीं त्याला केला व श्रावणमासची दक्षिणा आणि कोटिलिंगार्चन विधी सेनापतीनें करावा असें ठरविलें (१७१७) पुढें सय्यद बंधूंच्या मदतीस जी मंडळी दिल्लीस गेली तींत खंडेराव हा सेनापती म्हणून गेला होता (१७१९). दिल्लीहून परत आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांनीं जी सरंजामी पद्धत निर्माण केली, तींत खंडेरावास खानदेश देऊन गुजराथ काबीज केल्यास तीहि जहागीर देऊन टाकूं म्हणून त्याला आश्वासन दिलें. सय्यदांचा हस्तक अलमअल्ली व निजाम यांच्यांत (१७२०) बाळापूरची जी लढाई झाली, तींत सय्यदांच्या विनंतीवरून खंडेरावास लढण्यासाठीं म्हणून छत्रपतींनीं पाठविलें होतें. यानंतर फत्तेसिंग भोसल्यांच्या अधिपत्याखालीं कर्नाटकांत (१७२५-२६) झालेल्या स्वारींत खंडेराव हा हजर होता. बाळाजी विश्वनाथ व खंडेराव यांचें एकमत असे. त्यामुळें बाळाजीपंतांनीं ठरविलेल्या राज्यव्यवस्थेस अमलांत आणण्याचें लष्करी काम खंडेराव करी. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राहून तो खानदेश, वर्‍हाड व गुजराथ या तिन्ही प्रांतावर नजर ठेवी. यापुढें तो वृद्ध झाल्यामुळें त्याचा मुलगा त्रिंबकराव मोहिमेवर निघूं लागला. खंडेरावाने वसई ते सुरतपर्यंतचे कोंकण काबीज केलें होतें. त्याच्याबद्दल `बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते’ असा उल्लेख आहे (शाहु म. बखर). शाहूछत्रपतींची मर्जी त्याच्यावर पुष्कळ होती. तो एकदा पोटशुळानें आजारी पडला असतां महाराजांनीं त्याचा समाचार मुद्दाम घेतला होता. थोरले बाजीराव यांच्या वेळीं खंडेराव वृद्ध झाल्यानें व खुद्द श्रीमंतांनीं सेनानायकाचें काम हातीं घेतल्यानें त्याची विशेषशी हकीकत आढळत नाहीं. कदाचित खंडेराव मत्सरानें अलिप्‍त राहिला असावा. मात्र त्याबद्दल शाहुमहाराजांनीं त्याला समजुतीचीं पत्रें अनेकदां पाठविलीं होतीं. अखेर १७२९ त खंडेराव मूतखड्याच्या विकारानें मरण पावला. इतिहासप्रसिद्ध उमाबाई दाभाडे ही याची बायको होय. याला त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव असे तीन पुत्र होते. [शाहुमहाराज रोजनिशी; शाहु म. बखर; दाभाडे घराण्याचा इतिहास; मराठी रियासत. म. वि. इति. संग्रह. पेशवे दफ्तर. ले. २३].
'सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे' हे खंडेराव दाभाडे यांचे वंशज आहेत
Posted by Vinod Jadhav at 04:04 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९६
पवार घराणे :
पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे. शिंदे व होळकर यांबरोबर पवारांनी उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात तो एका तुकडीचा प्रमुख म्हणून काम करीत होता. शिवाजी—अफजलखान लढाईत त्याने भाग घेतला होता. त्याचे मुलगे बुबाजी व केरोजी. मुसलमानपूर्वकालीन धारच्या प्रसिद्ध परमार घराण्याचे आपण वंशज आहेत, अशी पवारांची भावना होती. त्यामुळे माळव्यामध्ये धारच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात आला तर बरे, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. काही पवार मंडळी माळव्यामध्ये स्वारी—शिकारीस गेल्याचे समजते. बाळाजी विश्वनाथ दिल्लीस गेला, तेव्हा केरोजी पवारही त्याजबरोबर होता .केरोजीच्या पुढील वारसांविषयी माहिती ज्ञात नाही; पण बुबाजीस मात्र काळूजी व संभाजी असे दोन मुलगे होते. त्यांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही; परंतु काळूजीचे मुलगे तुकोजी व जिवाजी आणि संभाजीचे मुलगे उदाजी तुकोजी व रावांचा मुलगा यशवंतराव यांचे अनेक निर्देश पेशवेकालीन कागद पत्रांत आढळतात. हे चारही चुलतभाऊ सामान्यतः पेशव्यांच्या बाजूने लढले; पण कधी पेशव्यांच्या विरुद्ध बाजूनेही लढायांमध्ये भाग घेतलेले दिसतात. १७२० ते १७२९ या नऊ वर्षांच्या कालखंडात या चार भावांनी अनेक वेळा माळव्यावर स्वाऱ्‍या केल्या होत्या आणि त्यांत त्यांनी काही प्रमाणात यशही मिळविले होते, तथापि चिमाजी अप्पा हा शिंदे, होळकर व पवार यांना घेऊन १७२८ च्या शेवटी माळव्यात गेला आणि तेथील मोगल सुभेदार गिरधर बहादुर व त्याचा नातलग दया बहादुर या दोघांनाही त्याने अमझेर येथे झालेल्या घनघोर लढाईत ठार केले आणि माळवा प्रांतावर आधिपत्य मिळविले. नंतर छत्रपती, शिंदे, होळकर आणि पवार यांत माळवा वाटूनही टाकला. गुजरातेत डभई येथे झालेल्या लढाईच्या वेळी (१ एप्रिल १७३१) उदाजी, आनंदराव व मळोजी पवार हे बाजीराव पेशव्याविरूद्ध त्र्यंबकराच दाभाड्याच्या बाजूने लढले. तीत उदाजी पवार याचा पाडाव झाला व आनंदराव पवार पळून गेला; पण पुढे त्याचे पेशव्याशी सख्य झाले. उदाजी पवाराने त्यानंतर फाराशी कर्तबगारी दाखविलेली दिसत नाही. आनंदराव सर्पदंशाने मरण पावला (१७३६). त्याचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आला (१७६१). हे सर्व चालू असताना धार व त्याच्या आसपासचा सर्व प्रदेश आनंदरावास मिळाला आणि देवास व त्याच्या आसपासचा प्रदेश तुकोजी व जिवाजी या दोघांना मिळाला. तुकोजी हा देवासच्या थोरल्या पातीचा संस्थापक असून जिवाजी धाकट्या पातीचा संस्थापक बनला. देवासच्या थोरल्या पातीचे वारस विक्रमसिंह हे दत्तकनात्याने कोल्हापूर संस्थानचे अधिपती झाले (१९४७). इंग्रजी अंमलाच्या आरंभीच्या काळात पवारांनी हिंदू संस्कृतीच्या जीर्णेद्धाराचा आपल्या संस्थानांत प्रयत्न केल्याचे एका प्रकटनावरून कळते.
पहा : धार संस्थान.
संदर्भः १. ओक, शि. का., लेले, का. कृ. धार संस्थानचा इतिहास,
२.भाग, धार. १९३४. २. गुजर, मा. वि. पषार विश्वासराष घरण्याचा इतिहास व ऐतिहासिक कागद-संग्रह, पुणे, १९६०.
३, गुजर, मा. वि. संपा. संस्थान देवास धोरली पाती : पवार घराण्याच्या इतिहासाची साधने, पुणे, १९४०.
Posted by Vinod Jadhav at 03:58 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९५




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९५
जामखंडी आणि तासगाव संस्थान
जामिखडी हे गाव कोल्हापूरपासून ११० कि.मी. अंतरावर तर तासगाव हे सध्या सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण सांगलीपासून २३ कि.मी. अंतरावर. रत्नागिरीजवळचे हरिभट यांच्या मुलांपकी ित्रबक, गोिवद आणि रामचंद्र यांनी मराठय़ांच्या सन्यात विशेष कामगिऱ्या बजावल्यामुळे पेशव्यांनी त्यांना कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून इनामात दिला. हरिभट यांच्या नातवांपकी परशुराम भाऊ हे विशेष पराक्रमी निघाले. त्यांच्या जहागिरींपकी जामिखडी हा एक टापू होता. त्यांचे पुढचे वंशज गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांनी १८११ साली जामिखडीचे राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांच्याशी संरक्षण करार करून ३००० स्वारांची फौज तनात करावयास लावली. १३६० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या संस्थानाला ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटाच्या देखरेखीखाली असलेल्या या संस्थानात जामिखडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके होते. मराठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत होते. शेतीच्या उत्कर्षांसाठी जामिखडीत जनावरांचे प्रदर्शन भरविले जाई. हातमागांचा संस्थानात प्रसार होऊन वस्त्रोद्योगाचा विस्तार झाला होता. जामिखडीच्या पटवर्धन राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी दरबार भरविण्याचा परिपाठ ठेवला होता. गोपाळ रामचंद्र यानंतर रामचंद्र गोपाळ, परशुराम रामचंद्र आणि शंकर परशुराम असे जामिखडी संस्थानचे पुढील राज्यकत्रे झाले. परशुराम रामचंद्र यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्कराचे मानद कॅप्टन म्हणून फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजाविली.
१८२० साली जामखंडी संस्थानातून तासगावचे संस्थान निराळे निघाले. गणपतराव पटवर्धन हे याचे पहिले राजे. १८४८ साली लॉर्ड डलहौसीच्या संस्थाने खालसा करण्याच्या मोहिमेत तासगाव संस्थान खालसा होऊन कंपनी सरकारच्या राज्यात सामील केले गेले.
जामिखडी संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.
Posted by Vinod Jadhav at 03:54 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९४

भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव
(राज्यारोहण १९२२)

यांचा जन्म १८७८ सालीं झाला. त्यांचा सन १९०५ पर्यंतचा काळ प्रथम पुणें हायस्कूल, नंतर म्याट्रिक झाल्यावर डेक्कन कॉलेजांत पाश्चात्य शिक्षण व कायदेशिक्षण संपादन करण्यांत गेला. नंतर त्यांना संस्थानच्या कामकाजाची माहिती होण्याकरितां त्यांचे वडील रावसाहेब यांनीं त्यांनां शिरवळ तालुक्याचें अ. कलेक्टर व अ. जज्जाचे अधिकार दिले. ते अधिकार उत्तम रीतीनें चालवून त्यांनीं संस्थानच्या कामाची व लोकस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली. हिंदुस्थानांत ब-याच ठिकाणीं प्रवास करून त्यांनीं आपल्या ज्ञानांत भर घातली आहे. जगांत चाललेल्या घडामोडीचें सूक्ष्म निरीक्षण करून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं गादीवर येण्यापूर्वींच आंखून ठेविलें होतें. या प्रकारचें निश्चित धोरण असल्यानें राज्यारोहणसमारंभकाळींच (ता. १८ आगष्ट १९२२) प्रजेंत झालेला असंतोष नाहींसा करण्याकरतां व नोकरांनां संतुष्ट करण्याकरितां श्रीमंत बाबासाहेबांनीं घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर, वगैरे किरकोळ जिनसावरील लायसेन्स-फी माफ केली. संस्थानांतील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलें. आणि जमीनसा-यांत सूट, सर्व नोकर लोकांस बोनस वगैरे देणग्या दिल्या. शिवाय सुधागड तालुक्यांत पाली येथें दवाखाना आणि भोर येथें एक वेदशाळा सुरू केली. हे युवराज असतांनाच त्यांनीं भोर येथें श्रीरामक्रीडाभुवन (प्रथमपत्नीचें स्मारक म्हणून) कै. श्री. सौ. गंगूताई पंतसचीव वाचनालय अशा दोन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांनीं प्रातिनिधिक तत्त्वावर राज्याकारभार चालविण्याचें आपलें धोरण जाहीर करून भोरास लोकमतानुवर्ती म्युनिसिपालिटी स्थापन केली व सभाबंदीचा कायदा रद्द करून प्रजेला आपलीं गा-हाणीं मांडण्याचा मार्ग मोकळा करून दिला. नोकरांनां पगारवाढ करून पेन्शन, ग्र्याच्युटी, भत्ता, यांचें नियम केले आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांस सातारा जिल्ह्यांतील संस्थानिकांनीं आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्रमंडळाकरितां निवडून दिलें आहेत. त्याप्रमाणें ते दिल्लीस १९२४ सालीं गेले होते. जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षांची तक्रार असल्यामुळें फारेस्टचौकशीकमेटी व हिरडाचौकशी कमिटी अशा दोन कमिट्या त्यांनीं नेमिल्या आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांचें हल्लींचें द्वितीय कुटुंब सौ. लक्ष्मीबाईसाहेब या सुशिक्षित, सुशील प्रजावत्सल व स्त्रीशिक्षणाभिमानी आहेत. श्रीमंत बाबासाहेब यांनां हल्लीं प्रथम कुटुंबापासून एक व द्वितीयाकुटुंबापासून दोन असे ३ पुत्र आहेत; पहिल्या कुटुंबापासून झालेले युवराज श्री. भाऊसाहेब हे सन १९२४ सालच्या म्याट्रिक परीक्षेंत पास होऊन उच्च शिक्षणाकरितां डेक्कन कॉलेजांत शिकत आहेत.
Posted by Vinod Jadhav at 03:51 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९३

भोर संस्थान :शंकरराव चिमणाजी उर्फ रावसाहेब (१८७१-१९२२)

रावसाहेबांची कारकीर्द सुमारें ५० वर्षें झाली. शंकरराव तापट, करारी, निरलस, बुद्धिमान, व नियमित रहाणीचे असे होते. त्यांचीं दोन लग्नें झालीं. त्यांनीहि अनेक सुधारणा करून संस्थानचा दर्जा वाढविला. सडका, चावड्या, धर्मशाळा, विहिरी ब-याच ठिकाणीं बांधिल्या. शिक्षणखातें निर्माण करून भोर येथें हायस्कूल स्थापन केलें, व संस्थानांत सुमारें ६० प्राथमिक शाळा सुरू केल्या, आणि भोर येथें एक मोफत दवाखाना सुरू केला. रामनवमीचा उत्सव निरंतर चालण्याकरितां रावसाहेबांनीं वार्षिक ३०,००० रूपये उत्पन्नाचे २८ गांव अलग तोडून दिलें. याप्रमाणें प्रत्येक देवस्थानची त्यांनीं स्वतंत्र व्यवस्था करून ठेविली आहे. सन १९०३ मध्यें त्यांनां ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. व पुढें १९११ सालीं आणखी दोन तोफांच्या सलामीचा मान व हिज हायनेस ही पदवी मिळाली. दिल्लीस नरेन्द्रमंडळ स्थापन होईपर्यंत राजमंडळाची जी सभा भरत असे त्या प्रत्येक सभेस रावसाहेबांनां निमंत्रण येत असे व प्रत्येक सभेस हजर रहात असत.

रावसाहेबांची धर्मावर फार श्रद्धा असून त्यांनीं हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व तीर्थयात्रा सहकुटुंब केल्या. काश्मीर, ग्वाल्हेर, बडोदें, कोल्हापूर, म्हैसूर, हैद्राबाद, त्रावणकोर इ. मोठ्या संस्थानिकांच्या निमंत्रणावरून तेथें जाऊन शंकररावांनीं त्या संस्थानिकांचा दृढ परिचय करून घेतला. रावसाहेबांच्या पत्नी कै. श्री. सौ. जिजीसाहेब ह्यांनीं एकट्यानींच व बदरीकेदार व नारायणाची बिकट यात्रा केली. रावसाहेबास प्रथम १८७७ सालीं कन्यारत्न झालें. व दुस-याच वर्षी म्हणजे १८७८ सालीं पुत्ररत्न झालें. त्याचें नांव त्यांनीं रघुनाथराव उर्फ बाबासाहेब ठेविलें. तेच हल्लींचे संस्थानाधिपति आहेत. खर्च करण्यांत रावसाहेबांचा हात अगदीं काटकसरीचा असे. यामुळेंच त्यांनां संस्थानची आर्थिक स्थिति चांगली ठेवतां आली. रावसाहेब सर्व खात्यांतील कामें स्वतः पहात असत. या त्याच्या एकतंत्री कारभाराचा परिणाम असा झाला कीं, नोकराच्या अंगीं जबाबदारीनें काम करण्याची पात्रता उत्पन्न झाली नाहीं. त्यांच्यांत एकतंत्री कारभारामुळें उत्पन्न होणारे दोष शिरले. महायुद्धनंतर नवीन तत्त्वें, नवीन आकांक्षा उदयास येऊन नवीन वातावरण तयार झालें व त्याच्या लाटा संस्थानीं प्रजेवर आदळून जागृति उत्पन्न झालीं, यामुळें रावसाहेबांचीं अखेरचीं २।३ वर्षें फार त्रासांत गेलीं. रावसाहेबांची सर्व कारकीर्द एकतंत्री राज्यकारभारांत गेली असल्यामुळें पालटलेल्या स्थितींत प्रसंगानुरूप धोरण बदलण्याचें जें एक प्रकारचें कौशल्य लागतें तें त्यांच्या अंगीं नव्हतें. प्रजपरिषद निर्माण होऊन राज्य कारभारांत प्रजेचा हात असला पाहिजे, जुलमी कर नाहींसें झाले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या प्रजेकडून होऊं लागल्या. प्रजेंत असंतोष माजत चालला. परंतु रावसाहेबांच्या करारी स्वभावामुळें नवीन मनूस अनुसरून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं बदललें नाहीं. यामुळें असंतोष जास्तच पसरत जाऊन रावसाहेबांनां मनस्वी त्रासहि होऊं लागला. अशा स्थितींतच स. १९२२ सालीं त्यांचें देहावसान झालें. व त्यांचे पुत्र श्रीमंत बाबासाहेब हे राज्यारूढ झालें.
Posted by Vinod Jadhav at 03:49 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९२

भोर संस्थान :चिमणाजी रघुनाथ (१८३६-१८७१)

हा लहान असतां, याच्या आईनें सातारकर प्रतापसिंहाच्या विरूद्ध शहाजीस (प्रतापसिंहाचा भाऊ) मदत केली होती. त्यामुळें शहाजीनें चिमणाजीस नजर वगैरे माफ केली. सातारचें राज्य बुडाल्यावर सचीव इंग्रज सरकारचे मांडलिक झाले. चिमणाजीपंतानें संस्थानची स्थिति बरची सुधारली व संस्थानचें बरेंच कर्ज फेडलें. चिमणाजीस शंकरराव नांवाचा पुत्र स. १८५४ त आला. यावेळीं औरस संतति नसेल तर संस्थानिकास दत्तक घेण्याची परवानगी नव्हती. चिमणाजीपंतानें भोर येथें स. १८६३ मध्यें रामबागच्या ओढ्यास धरण बांधून त्याचें पाणी नळानें गावांत आणलें. त्याचप्रमाणें त्यानें भांबवडीबाग, नवीन राजवाडा, त्याजवळचा बाग, नीरानदीचा मोठा घाट, शहरातील सडक इत्यादि कामें करून भोर शहरास शोभा आणिली व संस्थानांत जागजागीं नवीन इमारती बांधल्या. पोलिसखातें उभारून तालुक्याच्या ठिकाणीं मामलेदार, मुनसफ वगैरेंच्या कचे-या स्थापन केल्या. याच्या कारकीर्दींत शिक्षणकार्यास मात्र आरंभ झाला नाहीं. त्यांनीं रामनवमीच्या उत्सवाची उत्तम शिस्त लावली.
Posted by Vinod Jadhav at 03:48 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९१

भोर संस्थान : रघुनाथ चिमणाजी (१८२७-१८३६)

याच्या कारकीर्दीत सचिवाचा कोंकणांतील पसरलेला कांहीं भाग एकत्र करण्याकरिता १८३० सालीं इंग्रजांनीं सचिवाबरोबर तह करून त्यांच्या मुलुखाचा मोबदला करून दिला. याला पुत्रसंतान नव्हतें म्हणून त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. रघुनाथपंत अज्ञान असतां त्याचें व त्याच्या आईचें भांडण लागलें. तें सातारच्या प्रतापसिंहानें मोडून भवानीबाईस नेमणूक करून दिली. ही बाई अखेरपर्यंत सात-यास होती.
Posted by Vinod Jadhav at 03:47 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९०
भोर संस्थान : चिमणाजी शंकर (१७९८-१८२७)
हे गादीवर आल्यावर थोड्याच दिवसांत त्यांचें व त्यांची सापत्न मातोश्री राधाबाई हिचें वैमनस्य आलें. बाईनें आप्पा निंबाळकराची मदत घेऊन त्याच्या अरबांकडून चिमणाजीस कैदेंत ठेवविलें. चिमणाजी ८।९ महिने कैदेंत होता. बाई बरीच कारस्थानी होती. तिनें पंतावर अनेक संकटें आणलीं. शेवटीं तिनें चालविलेली बंडाळी मोडून पेशव्यांनीं पंतांस कैदेंतून सोडवून बाईला (१८१५ सालीं) रोहिड किल्ल्यावर ठेविलें. तेव्हांपासून पंताचा कारभार सुरळीत चालू झाला. या वेळेपासून पेशवाईअखेर पंत पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा पुण्यासच रहात असे. पेशवाईच्या शेवटीं प्रथम पंत हा रावबाजीबरोबर टेंभुर्णींपर्यंत गेला होता. परंतु पुढें एल्फिन्स्टनचा म्हणण्यावरून आपलें संस्थान कायम ठेवण्यासाठीं पंतानें रावबाजीस सोडून इंग्रजांशीं तह केला. त्यांत पंताची मोंगलाईंतील ५०।६० हजारांची साहोत्राबाब मात्र गमावली गेली. पुढें राधाबाईला दरमहा थोडीशी नेमणूक करून देण्यांत आली. ती माहुलीस जाऊन राहिली. नंतर तिनें तीर्थयात्रा केल्या. तिच्याच पैशांतून भोराजवळील विश्रामघाट (अंबाड खिंड) बांधण्यांत येऊन अन्नसत्र चालू आहे. चिमणाजीपंतास पुत्र नसल्यामुळें त्यानें दत्तक घेऊन त्याचें नांव रघुनाथ ठेविलें. चिमणाजीपंत १८२७ सालीं वारला.
Posted by Vinod Jadhav at 03:40 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८९
भोर संस्थान : शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)
याच्या कारकीर्दीत म्हणण्यासारख्या गोष्टी घडल्या नाहींत. याला पुत्रसंतान नव्हतें. हा १७९८ सालीं वारला. तेव्हां त्याचा दत्तक पुत्र चिमणाजीपंत हा गादीवर आला शंकररावाच्या अंगीं विशेष कर्तबगारी नव्हती; तो जरा भोळसट होता. त्याच्यावर देखरेख ठेवण्याकरितां नाना फडणविसांनीं बाजीराव मोरेश्वर याची योजना केली होती. हा मनुष्य हलकट व क्रूर होता. यानें शंकररावास जवळ जवळ बंदीवासांत ठेविलें होतें. त्याच्या हातून शंकररावाची सुटका महादजी शिंदे यानें केली. बाजीरावानें एकदां शंकरराव कुटुंबासह जेजूरीस असतां त्याचा घात करण्याकरितां मारेकरी पाठविले होते. शंकरराव सखारामबापू बोकीलचा जांवई होय. रामशास्त्री न्यायाधीशाची मुलगी शंकररावाची दुसरी बायको होती.
Posted by Vinod Jadhav at 03:39 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८८
भोर संस्थान :चिमणाजी नारायण (१७३७-१६५७)
नारोपंतास पुत्र नव्हात. त्यानें दत्तक पुत्र घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. आजपर्यंत सचिवांचें राहण्याचें ठिकाण नेरें होतें. तेथील वाडा जळाल्यानें चिमणाजीनें इ. स. १७४० त भोर हें राजधानीचें ठिकाण केलें. पेशव्यांनीं याला तुंगतिकोना देऊन त्याऐवजीं सिंहगड किल्ला घेतला. चिमणाजी पेशव्यांच्या विरूद्ध वागत असे.
सदाशिव चिमणाजी (१७५८-१७८७)
हा चिमणाजीचा औरसपुत्र. यानें संस्थानचा ३० वर्षें उपभोग घेऊन तो १७८७ सालीं निवर्तला. हा निपुत्रिकच होता.
रघुनाथराव चिमणाजी (१७८७-१७९१)
सदाशिवपंत निपुत्रिक वारल्यामुळें त्याचा सख्खा धाकटा भाऊ रघुनाथ चिमणाजी सचीवपदाचा वारस झाला. याचा शंकरराव उर्फ बाबासाहेब नांवाचा पुत्र पुढें गादीवर बसला.
Posted by Vinod Jadhav at 03:37 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८७

भोर संस्थान : नारो शंकर (१७०७-१७३७)

शंकराजीपंत समाधिस्थ झाल्यानंतर शाहूनें त्याचा अज्ञान पुत्र नारोपंत यास सचीवपदाचीं वस्त्रें देऊन हे संस्थान आपल्या बाजूचें करून घेतलें. नारोपंत अल्पवयी असल्यामुळें त्याची मातोश्री येसूबाई व त्याचा मुतालिक हीं दोघें राज्याकारभार चालवूं लागलीं. येसूबाई चांगली कर्ती असून तिचें आपल्या अंमलदारावर वजन होतें. न्यायाच्या कामीं ती कोणाचीहि भीडभाड धरीत नसे. नारोपंताच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडल्या नाहींत. दमाजी थोरातावर शाहूनें याला पाठविलें असतां दमाजीनें याचा पराभव करून याला बंदींत ठेवलें. त्याला पुढें बाळाजी विश्वनाथानें सोडविलें, त्याबद्दल येसूबाईनें बाळाजीस पुणें परगणा व पुरंधर किल्ला दिला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीं असलेल्या बेलसर गांवच्या एका रामोपासक कुळकर्ण्यानें श्रीरामाच्या मूर्ती त्यास चैत्र शु. ८ च्या दिवशीं आणून दिल्या व तेव्हांपासून भोरास रामनवमीचा उत्सव सुरू झाला. नारोपंताच्या वेळीं शाहूनें साहोत्राबाब सचिवास वंशपरंपरा वतनी करून दिली.
Posted by Vinod Jadhav at 00:57 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८६


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८६

भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

इतिहास
संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवरायांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजी राजाच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).
Posted by Vinod Jadhav at 00:56 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८५






हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८५

भोर संस्थान-

मुंबई, पुणें जिल्हा. हें संस्थान उ. अ. १८० ते १८० ४५' व पूर्व रेखांश ७३० १४' ते ७३० १५' यांत होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हें शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे. भोर येथें नीरेस घाट आहे. राजवाडा, भोरेश्वर देवालय, रामबाग बंगला, हायस्कूल या पहाण्यासारख्या इमारती आहेत. राजवाडा भव्य व जुन्या पद्धतीनें बांधलेला आहे. हें शहर लहान पण टुमदार असून येथील हवापाणी चांगलें आहे. पुण्याचा कलेक्टर हा भोर संस्थानचा पोलिटिकल एजंट आहे. या संस्थानचा प्रदेश पुणे, सातारा व कुलाबा या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत; पैकीं विचित्रगड सातारा जिल्ह्यांत; राजगड, प्रचंडगड, व पौनमावळ हे पुणें जिल्ह्यांत; आणि पांचवा सुधागड हा कुलाबा जिल्ह्यांत आहे. सुधागडशिवाय चारी तालुक्यांचा प्रदेश घाटमाथ्यावरीलमावळांत आहे संस्थानांत एकूण ५०२ गांवें आहेत. संस्थानचें क्षे. फ. ९२५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) १३०४१७ आहे. संस्थानचा ३/४ भाग डोंगराळ आहे. ३/४ जमीन तांबडी असून, पाण्याखालीं जमीन फार थोडी आहे. पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो. घाटमाथ्यावरून निघालेल्या मोठ्या नद्या नीरा, मुठा, मुळा, वेळवंडी व गुंजवाणी ह्या आहेत. याशिवाय लहान नद्याहि आहेत. भोरापासून उत्तरेस सुमारें २ मैलांवर वेळवंडी नदीस भाटघर येथें धरणाचें मोठें काम केलेलें आहे. हें प्रथम ९० फूट उंच होतें, तें हल्लीं (१९२६) १५० फूट उंच करण्यांत येत आहे. या धरणाचें पाणी नीरा उत्तर व नीरा दक्षिण या नांवाच्या मोठाल्या कालव्यांतून फार दूरवर दुष्काळी जिल्ह्यांत नेलें आहे. या कामासाठीं संस्थाननें आपली पुष्कळशीं गांवें बुडूं दिलीं आहेत. घांटमाथ्यावर कोठें थंड, कोठें समशीतोष्ण हवा आहे व सुधागड तालुक्यांत उष्ण हवा आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुमारें १० पासून १०० इंचांपर्यंत पडतो व सुधागडकडे १५० पर्यंत पडतो. घांटावर मुख्य धान्यें भात, नागली, वरी, जोंधळा व बाजरी हीं आहेत. सुधागड तालुक्यांत मुख्य पीक भाताचें आहे. जंगलांत साग, हिरडा, जांभूळ, आंबा, फणस ही मुख्य झाडें आहेत. घाटमाथ्यावर सर्वत्र रानडुकरें व थोडे वाघहि आहेत मुख्य लोकवस्ती हिंदूंची आहे. निर्गत माल भात, हिरडा व साग व आयात माल भाताशिवाय सर्व धान्यें व इतर सर्व त-हेचा माल संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें पांच लाखांचें आहे.
किल्ले
संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंग व तिकोना आणि सुधागडांत भोरप व सरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळें हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.
Posted by Vinod Jadhav at 00:53 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८४

भोर संस्थान

भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.

पंतसचिव

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते.[१] पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी

पंतसचिव शंकराजी नारायण (कार्यकाल १६९७ - १७०७)
पंतसचिव नारो शंकर (कार्यकाल १७०७ - १७५७) - शंकरजी नारायण ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी] (कार्यकाल १७३७ - १७५७) - नारो शंकर ह्यांचा पुतण्या
पंतसचिव सदाशिवराव (कार्यकाल १७५७ - १७८७) - चिमणाजी ह्यांचे जेष्ठ पुत्र
पंतसचिव रघुनाथराव (कार्यकाल १७८७ - १७९१) - चिमणाजी ह्यांचे कनिष्ठ पुत्र
पंतसचिव शंकरराव (कार्यकाल १७९१ - १७९८) - रघुनाथराव ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी दुसरे (१७९८ - १८२७) - शंकरराव ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव रघुनाथ चिमणाजी (१८२७ - १८३७)- चिमणाजी दुसरे ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (१८३९ - १८७१) - रघुनाथराव चिमणाजी ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव शंकर चिमणाजी (१८७१ - १९२२) - चिमणाजी रघुनाथ ह्यांची चिरंजीव
पंतसचिव रघुनाथ शंकर भाऊसाहेब पंडित (१९२२ - १९५१) - शेवटचे पंतसचिव

८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.
Posted by Vinod Jadhav at 00:51 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८३

परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी

परशुराम त्रिंबक किन्हईकर (इ.स. १६६० - इ.स. १७१८) हे छत्रपतींचे पंतप्रतिनीधी आणि नंतरच्या औंध संस्थानाचे संस्थापक होते.
कारकीर्द

परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी रामचंद्रपंत अमात्यांच्या कार्यालयात विशाळगडास रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली.

छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला होता. अशा काळात औरंजजेबाच्या ताब्यातला पन्हाळगड पंतांनी १६९२ साली मोठ्या हिकमतीने परत जिंकून घेतला. यानंतर अमात्यांच्या मोलाच्या मार्गदर्शानाखाली पंतांनी मिरजेपासून प्रचितगडापर्यंतचा मुलूख पादाक्रांत केला. त्याबरोबरच भूदरगड आणि चंदनगडासारखे किल्लेदेखील पुन्हा स्वराज्यात आणले.

पुढे औरंगजेबाने १६९९च्या शेवटास सातारच्या किल्ल्याला वेढा घातला असता पुढचे ५ महिने पंतानी ह्या किल्यावरच्या मराठ्यांना रसद पुरवली आणि किल्ला झुंजवण्यास मोलाची मदत केली. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने - राणी ताराबाईंनी - मुघलांविरुद्धचा लढा सुरु ठेवला तेव्हा पंतांचा त्यांना मोठाच आधार होता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना सुभालष्कर, समशेर जंग असे किताब बहाल करण्यात आले.

सातारच्या किल्ल्याप्रमाणेच १७०२ साली पंतांनी विशाळगडदेखील तब्बल ५ महिने झुंजवला पण सरतेशेवटी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. पण ताबा पुढच्या ५ वर्षातच म्हणजे १७०७ साली मुघलांशी निकराची झुंज देऊन परत काबीज केला. त्याचबरोबर सातारा, वसंतगड, पन्हाळगड हे किल्ले परत स्वराज्यात आणले.

१८ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात परशुरामपंत सातारच्या शाहू महाराजांच्या सेवी रुजू झाले. तिथपासून कराड आणि आजूबाजूचा मुलुख हा पंतप्रतिनिधींच्याच ताब्यात होता आणि त्यांचा कारभार कराडच्या भुईकोटातून चाले.

१८१८ साली परशुरामपंतांचे निधन झाले.
पंत प्रतिनिधी

पंत प्रतिनिधी हे पद राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत निर्मीले गेले. छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली जिंजीला असताना प्रल्हाद निरोजी ह्यांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमले. हेच पहिले प्रतिनिधी. त्यांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर १६९४ साली तिमाजी रघुनाथ हणमंते ह्यांची ह्या पदी नेमणूक झाली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१ साली राणी ताराबाईंनी परशुरामपंत त्रिंबक ह्यांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर पंताच्या पुढच्या वंशावळीस पंतप्रतिनिधी असे संबोधले जाऊ लागले.
संदर्भ

पंत प्रतिनिधी बखर
लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील लेख
Posted by Vinod Jadhav at 00:49 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८२
गजेंद्रगड आणि बहिरजी हिंदुराव

गजेंद्रगड- मुंबई, धारवाड जिल्हा. हें बदामीच्या पश्चिमेस २८ मैलावंर एक खेडे आहे. हें पूर्वी मुधोळच्या घोरपड्यांकडे होतें. येथें शिवरायांनी बांधलेला एक किल्ला आहे. येथील उंचगिरी नांवाचा दुसरा किल्ला १६८८ त दौलतराव घोरपडयांनी बांधला. गांवापासून ३ मैलांवर एका खोऱ्यांत यात्रा भरत असते. या खोऱ्यांत शंकराची मूर्ति आहे. लोकसंख्या (१९११) ८३०९.

येथील घोरपडयांनां हिंदुराव ही पदवी आहे. बहिरजी घोरपड्यानें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत गजेंद्रगड व गुत्ती मिळविली. संताजी हा प्रख्यात सेनापति या बहिरजीचा भाऊ होय. संताजीला पुढें कापशी गांव इनाम मिळाल्यानें त्याचे वंशास कापशीकर नांव पडलें व बहिरजी हा गजेंद्रगडास राहिल्यानें त्याच्या वंशास गजेंद्रगडकर म्हणूं लागले. याचा वडील मुलगा हा बावीस वर्षांचा असतांनाच मुसुलमानांबरोबरच्या एका लढाईंत ठार झाला. त्याचा धाकटा भाऊ शिदोजी याला हिंदुराव ममलकतमदार जफ्तनमुल्क फत्तेजंग समशेर बहादूर सेनापति अशी पदवी होती. कोल्हापुरची देवी मुसुलमानांच्या भयामुळें मध्यंतरीं दुसरीकडे ठेविली होती, ती पुन्हां कोल्हापुरच्या राज्याची स्थिरस्थावर होतांच या शिदोजीनें स्थापिली. त्याबद्दल त्याला देवीच्या प्रधानकीचीं वस्त्रें व पांच गांवची सरदेशमुखी इनाम मिळाली. शिदोजी हा पेशव्यांनां अनुसरून वागे. याचे मुरारराव, दौलतराव व भुजंगराव असे तीन पुत्र होते. पैकी भुजंगराव हा २० व्या वर्षी लढाईंत मरण पावला. मुरारराव हा पराक्रमी होता. हा जवळ जवळ स्वतंत्र वागे; याच्या पदरीं कवायती पलटणें असल्यानें त्याचा दरारा निजाम, टिपू व इंग्रज यांस त्या प्रांतीं चांगलाच असे. हा पेशव्यांच्या तर्फेनें तिकडे बंदोबस्त ठेवी. त्यांनीं त्याला सेनापतिपद दिलें होतें. हा बहुधा गुत्तीस राही. वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यानें काबीज केला होता. अनेक कारकीर्दी त्यानें पाहिल्या होत्या. इंग्रजांसहि यानें अडचणींत मदत केली होती. मुराररावाकडे गुत्ती व दौलतरावाकडे गजेंद्रगड अशी वांटणी पेशव्यांनीं करून दिली. मुरारराव शेवटीं टिपूच्या हातीं लागले. त्यानें त्याला शेवटपर्यंत रुप्याची बेडी पायांत घालून कपालदुर्गास कैदेंत ठेविलें होते. टिपूनें गजेंद्रगडहि घेतला. पुढें हरिपंत तात्या टिपूवर चालून आले तेव्हा पेशव्यांच्या मदतीनें दौलतरावानें गजेंद्रगड हस्तगत केला. त्यावेळीं तीन लाखांचा सरंजाम किल्ल्याकडे चालत होता. परशुरामभाऊ पटवर्धन व दौलतराव यांची फार दोस्ती होती. दौलतरावहि शूर होता. निजामाशीं तह झाल्यावेळीं हरिपंततात्यांनीं दौलतरावाची पावणेतीन लक्षांची जहागीर निजामाकडे देऊन दौलतरावास पंचवीस हजारांची जहागीर खर्चास ठेविली. मध्यंतरी थोरल्या माधवरावांनी गलगलें, इंगल वगैरे ५०।६० हजारांची जहागीर यांना दिली होती. रावबाजीच्या वेळीं पुन्हा घोरपड्यांच्या जहागिरीपैकीं कांही गांवे जप्त झालीं. दौलतरावास बहिरजी म्हणून पुत्र होता. त्याचा पुत्र भुजंगराव. बहिराजी याच्या वेळी इंग्रजी झाली. त्यावेळीं गजेंद्रगड संस्थान तेरा हजारांचें होतें. [डफ; कैफियती; बिजापूर ग्याझे. राजवाडे. खं. ७, १०].
Posted by Vinod Jadhav at 00:47 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८१

गु त्ती क र घो र प डे.-

या घराण्याचा मूळ पुरूष सेनापती संताजी घोरपडयाचा भाऊ बहिरजी हिंदुराव हा होय. संताजीच्या खुनानंतर बहिरजी कनारटाकांत आला व त्यानें मौंगलांची नौकरी पत्करून, गजेंद्रगड, गुत्ती वगैरे मुलुख मिळविला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र शिदोजी हा गादीवर बसला. शिदोजीच्या मागून त्याचा पुतण्या यशवंतराव हा गुत्तीचा मालक झाला. हा पुढें मोंगलांकडून निघून पेशव्यांनां मिळाला. हा हैदराच्या स्वा-यांत नेहमी पेशव्यांतर्फे हजर असे. शिदोजीचा मुलगा प्रख्यात मुरारराव ह्यानें त्या भागांत आपलें सामर्थ्य फार वाढवून पुष्कळच प्रांत मिळविला (मुरारराव घोरपडे) पहा. हाहि गुत्तीचा कारभार पाहत असे.पुढें टिपूनें एका लढाईंत मुरारराव व यशवंतराव यांस पकडून कैदेंत ठेविलें.तेव्हां यशवंत रावाचा मुलगा मालोजी हा गुत्तीचा मालक झाला. त्यानंतर दुसरया एका लढाईंत गुत्ती टिपूनें घेऊन आपल्या राज्यास जोडली.त्यामुळें पेशव्यांनीं मालोजीस गुत्ती ऐवजीं सोंडूर (हें टिपूकडून घेऊन) ठाणें दिलें व त्याबरोबरच कंकण वाडी, बेळवती वगैरे तालुके सरंजामादाखल दिले. यानंतर सोंडूर संस्थान स्थापन होऊन त्याचा पइिला पुरूष शिवरात्र घोरपडे हा बनला. पुढें गुत्तीकर घरण्यांतील दुसरा यशवंतराय हा नाना फडणिसांनां कैदेंतून सोडविण्याच्या वेळीं पुढें आला होता. पेशवाइअखेर हा रावबाजी विरूध्द्र इंग्रजांस मिळाला. आणि त्यांच्या तर्फें पेशव्यांर्शी लढला. या त्याच्या मदतीबद्दल ज.वेलस्लीनें त्यास सदतीस हजारांची जहागीर दिली. पुढें दौलराव शिद्यांच्या दरबारींहि हा इंग्रजांतफें काम करीत असे. हा सन १८२१ सालीं पुणें येथें मरण पावला; त्यास मालोजी हा एक पुत्र होता. याचा वंश हल्लीं सोंडूर प्रांतीं नांदत आहे . ( खरे-ऐ. ले. संग्रह; डफ; बाड- कैफियती).
Posted by Vinod Jadhav at 00:46 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ८०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ८०

इचलकरंजी, सं स्था न.नारायणराव बाबासाहेब आणि त्यांचा वंश

नारायणराव बाबासाहेब ज्या वेळी गादीवर बसले त्यावेळी इचलकंरजी संस्थानची स्थिती समाधानकारक नव्हती. करवीरकरांचे व इचलकंरजीकराचें वैमनस्य असल्यामुळे करवीरकर, इचलकरंजीकरांना नेहमी त्रास देत असत. पण पुढे १८२७ मध्ये ब्रिटिश सरकारच्या मध्यस्थीनें या दोन्ही संस्थानात तह घडून आला व इचलकरंजीकरांना पूर्वीचा सर्व मुलुख मिळाला, नारायणराव हें चांगले लढवय्ये होते. त्यानी खडर्याच्या लढाईत पेशवे सरकारला चांगली मदत केली होती. ते द्दढनिश्चयी व धोरणी होते. विपत्तीच्या स्थितीतहि त्यांनी आपल्या कर्तबगारीची पराकाष्टा करुन इचलकंरजी संस्थानाचे रक्षण केले, ही गोष्ट सर्वसमंत आहे. हे सन १८२७ साली वारले. त्यांना दोन मुलगे व पांच मुली अशी एकंदर सात अपत्यें होती.

नारायणरावांच्या मागून त्यांचे जेष्ठ पुत्र व्यंकटराव गादीवर बसले. त्यांना पुत्रसंतान नव्हते. हे इ.स.१८३८त निवर्तले. त्यांच्या मागून त्यांचे धाकटे बंधू केशबराव तात्या हे संस्थानचे मालक झाले. यांच्या अमदानीत, इचलकंरजी संस्थानचा दर्जा खरोखर काय आहे याचा निकाल लागला. इचलकरंजी संस्थान हे करवीरकर छत्रपतीच्या ताब्यांतले आहे असें इंग्रजसरकारने ठरविलें. अशा रीतीने करवीररांचे ताबेदार होऊन राहण्यापेक्षा संस्थानच्या उत्पन्नास रामराम ठोकून काशीस जाण्याचें तात्यासाहेबानी ठरविले. पण सरकारचे त्यावेळचे पोलिटिकल खात्याचे अधिकारी यांनी 'कोल्हापूरकर महारांजाची ताबेदारी नुसती नावांची आहे त्यामुळे महाराजांचा व तुमचा प्रत्यक्ष संबंध येत नाही व तुमचा दर्जाहि कमी होत नाही' असें सांगितल्यावरुन शेवटी तात्यासाहेब पुन्हां संस्थानचा कारभार पाहूं लागले. याचवेळी सरकारकडून असेंहि आश्वासन देण्यांत आले होते की 'इचलकरंजीकर यांस कारणपरत्वें दत्तकाविषयी तजवीज करणे झाल्यास, सरकार त्याचा विचार करील आणि हुकूम देणे तो कोल्हापूर प्रांताची तशीच दक्षिण महाराष्ट्रदेशाची अशा प्रकारची जी वहिवाट असेल तीस अनुसरुन सरकारास वाजवी वाटेल तेच करील केशवराव तात्या हे इ.स.१८५२ मध्यें वारले. त्यांना पुत्रसंतान नसल्यामुळे, तात्यासाहेबाच्या मातोश्री गंगाबाई व पत्नी यशोदाबाई यांनी दत्तक घेण्याबद्दलची परवानगी सरकारकडे मागितली व सरकारच्या परवानगीनें १८५३ साली यशोदाबाईनी, विसाजीपंत हुपरीकर यांचा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव व्यंकटराव ठेवले. पण व्यंकटराव हे एकदोन वर्षातच वारले. आणि पुन्हा दुसरा दत्तक देण्याची पाळी आली. यावेळी सरकारने पुष्कळ अडचणी आणल्या. पण सरतेशेवटी दत्तक घेण्याची परवानगी देण्यात आली. नंतर विश्वनाथराव हुपरीकर (तासगांवकर) यांचा मुलगा दत्तक घेण्यात आला. पण १६।१७ महिनें या दत्तक मुलानें (गोंविदराव आबासाहेबानी) राज्यकारभार पाहिला नाही. तोच त्याचें आकस्मिक देहावसान झाले. पुढे थोडया दिवसानी आबासाहेबाची बायको पद्मावतीबाई यांनी हल्लीचे संस्थानाधिपती नारायणराव बाबासाहेब यांस दत्तक घेतले. याचें प्रवेशपरीक्षेपर्येतचे शिक्षण राजाराम हायस्कुलात होऊन नारायणराव हे १८८८ त प्रवेशपरीक्षा पसार झाले. पुढे त्यानी राजाराम कॉलेजमध्ये व विल्सन कॉलेजमध्ये, एलएल् बी पर्येतच्या अभ्यास केला. १८९२ साली याना संस्थानची अखत्यारी देण्यांत आली. याचा विवाह १८८६ साली झाला. हे विद्यासंपन्न व जिज्ञासू असल्यामुळे संस्थानात चांगल्या सुधारण घडवून आणण्याकडे यांचे नेहमी लक्ष असते. यांना सार्वजनिक कामाची फार हौस आहे. दक्षिणेतील इनामदार व सरदार याच्यातर्फेने हे १४।१५ वर्षे कायदेकौन्सिलमध्ये निवडून आले होते. यांना प्रवासाचा नाद असून त्यांनी जगाच्या निरनिराळया भागांत प्रवास केला आहे. हे स्वभावानें उत्साही असून यांची राहणी अगदी साधी आहे. महायुध्दामध्ये यांनी सरकारास शक्य तितकी मदत केली. यांना पुत्रसंतान नसल्यामुळे यांनी आपल्या पुतण्यास दत्तक घेतले आहे.
Posted by Vinod Jadhav at 00:41 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७९


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७९

इचलकरंजी, सं स्था न.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब

नारायणरावाच्या मागून त्यांचे ज्येष्ठ पुत्र व्यंकटराव यांनी संस्थानचा राज्यकारभार हांकण्याला सुरवात केली. हे शूर असल्याकारणानें, हरिपंत फडके यांच्या गुजराथवरील स्वारीत व इतर अनेक स्वाऱ्यांत त्यांनी प्रामुख्यानें भाग घेतला. पण हे परमुलूखांत स्वारीवर असतांना इचलकरंजी संथानला कोल्हापूरकरांकडून उपद्रव होऊं लागला. करवरिकरांनी इचलकरंजी संस्थानावर स्वारी केली पण शेवटी पेशवे व करवीरकर यांच्या दरम्यान पुरंदर येथे तह होऊन इचलकरंजीकरांचे सर्व गाव त्यांना परत मिळाले. व्यकंटराव हे फार दुव्यर्सनी होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संस्थान अगदी कर्जबाजारी करुन टाकिले. हे १७९५ साली वारले. यांना पुत्रसंतान नसल्यामुळें त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बायको रमाबाई हिनें, पेशव्यांच्या संमतीने नारायणराव बाबासाहेब यांस दत्तक घेतले.
Posted by Vinod Jadhav at 00:40 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७८

इचलकरंजी, सं स्था न.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब. -

इचलकरंजीकरांकडून धारवाड सुभा काढून तो दुस-या मामलेदाराकडे पेशव्यांनीं दिला होता. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्यां अवधींत मामलतीसंबंधीं तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती. सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईंस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्याजबरोबर या खेपेसहि गेले होते. तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सदी व पेशवे यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रूपयांवर तोड झाली. पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस तात्यांस देवाज्त्रा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आल्या.
Posted by Vinod Jadhav at 00:36 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७७

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सरकारची कामगिरी करून दाखवून आपली बढती करून घ्यावी, इकडे तात्यांचें लक्ष नसल्यामुळें त्यांची सरदारी काढून घ्यावी असें श्रीमंतांच्या मनांत आलें; त्यामुळें (सन १७६६) अनुबाई व त्यांचे नातू व्यंकटराव दादा ही पुण्यास गेलीं. तात्यांची कशी तरी समजूत घालून त्यांनीं त्यांसहि बरोबर नेलें. अद्यापि अनुबाईंची भीड पुणें दरबारीं बरीच असल्यामुळें त्यानीं पेशव्यांकडून व्यंकटरावांच्या नावें सरदारी कंरून घेतली व पुन्हां पथकाची उभारणी केली. कडलास, पापरी व बेडग हे गांव इचलकरंजीकरांकडे पथकाच्या सरंजामांत चालत होते ते. या सालच्या डिसेंबरांत पेशव्यांनीं दूर करून तेच गांव त्यांच्या तैनातीस लावून दिलें. पेशवे सरकारांतून एकंदर ११४१० रूपयांची तैनात इचलकरंजीकरांस रोख मिळत होती. तिच्या ऐवजीं त्यांनीं या तीन गांवांचा वसूल तैनातीकडे घेत जावा असें ठरलें.

कोल्हापूरकर जिजाबाईंनीं इचलकरंजीकरांचें सरदेशमुखीचें वतन जप्त केलें होतें तें सोडण्याबद्दल व तिकडे इचलकरंजीकर यांची गांवें, खेडीं, शेतें, कुरणें, बाग, मळे वगैरे आहेत त्यांस उपसर्ग न देण्याविषयीं श्रीमंतांनीं जिजाबाईस पत्रें लिहिलीं. म्हापण गांवास वाडीकर सावंत यांजकडून उपद्रव होत होता तो बंद करण्यांविषयींहि पेशव्यांनीं सावंतांस एक ताकीद पत्र पाठविलें. आपल्या दौलतीचा याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन अनुबाई, तात्या व दादा; परत इचलकरंजीस आलीं. पुढें तात्या ख्यालीखुशालींत व दुव्यसनांत मग्न होऊन इचलकरंजींत आयुष्याचे दिवस घालवू लागले. त्यामुळें (१७६९) धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून पेशव्यांनीं नारो बाबाजी नगरकर यांस सांगितला.

सन १७७० व १७७१ सालीं हैदरअल्लीवर मोहीम सुरू होती. तींत इचलकरंजीकरांची पागा मात्र होती. यावेळीं तात्या बेहोष व व्यंकटराव दादा अल्पवयी असल्यामुळें इचलकरंजीचें पथक मोडल्यासारखेंच झालें होतें. याच सुमारास नारायणराव तात्या हे (१७७० च्या प्रारंभापासून) आजारी पडले होते. तें दुखणें वाढत जाऊन शेवटीं त्याच वर्षी (नोवेंबर १०) त्यांचें देहावसान झालें.
Posted by Vinod Jadhav at 00:35 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७६

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

स.१७६२ त थोरले माधवरावांच्या बाजूस दादासाहेबां विरूध्द अनूबाई होत्या व त्यांचें पथक घेऊन विसाजी नारायण हा दादासाहेबांशीं झालेल्या लढायांत कामगिरीवर हजर होता. नंतर दादासाहेबांनीं मिरज घेतली तेव्हां सामान व पायदळ वगैरे कुमक इचलकरंजीहून पेशव्यांस होत होती. स. १७६३ त मोंगलानें पुणें जाळिलें व पेशव्यांनीं बेदर शहर जाळिलें व अवरंगाबाद व भागानगर या शहरांपासून खंडणी घेतली. त्यावेळीं नारायण तात्या पेशव्यांबरोबर होते. यावेळीं दोन तीन निरनिराळया प्रसंगीं श्रींमंतांनीं तात्यांस स्वतंत्र कामगिरीवर पाठविलें होतें व त्यानीं थोडीबहुत खंडणीहि वसूल करून आणिली होती.

इकडे मोंगल व मराठे यांचें युध्द सुरू असतां कर्नाटकांत हैदरअल्ली फार प्रबळ होऊन त्यानें धारवाडचा सुभा बहुतेक काबीज केला. धारवाडचा सुभा हातचा गेल्यामुळें इचलकरंजीकरांचें फार नुकसान झालें. यापूर्वी याच वर्षी मर्दनगड किल्ला व त्याखालचा मुलूख पोर्तुगीज लोकांनीं त्यांज पासून हिसकावून घेतला होता. ती नुकसानी झाली होतीच. याप्रमाणें हैदरीचें प्राबल्य फार वाढल्यामुळें पेशव्यांनीं १७६४ त त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळीं इचलकरंजीचें पथक नरगुंदास होतें तें या लष्करास येऊन मिळालें होतें.

पुढें १७६४ त धारवाडचा सुभा मोकळा होतांच त्याची मामलत इचलकरंजीकरांस पेशव्यांनीं दिली; कारण त्यांच्या कडे ती पूर्वी बहुत वर्षे होती. व त्यांच्याहि पैसा त्या मामलतींत पुष्कळ गुंतला होता; यावेळीं तात्या इचलकरंजीहून निघून स्वा-या करीत भटकत होते.श्रीमंतांनीं त्यांस धारवाडास बोलावून नेलें व उपदेश केला. परंतु त्यापासून कांहीं निष्पन्न झालें नाहीं.

अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होत्या. ती संधि साधून तात्यांनी परत आल्यावर बराच दंगा केला. प्रथम ते आज-यांस आले. तेथें स्वार व पायदळ मिळून पांच सातशें नवे लोक त्यांनीं चाकरीस ठेविले आणि राणोजी घोरपडे सेनापति यास कांहीं उपद्रव केला. तात्यांचे आजे नारो महादेव यानीं दत्तक कांहीं घेतलेले नरसिंगराव यांचे पुत्र सदाशिव घोरपडे हे रघुनाथराव दादासाहेब यांजवळ होते. त्यांच्या द्वारें दादासाहेबांशीं तात्यांनीं संधान बांधिलें होते. मातोश्रीच्या निसबतीचे जितके लोक आहेत त्यांचें पारिपत्य करावें, सर्व दौलत आपल्या स्वाधीन करून घ्यावी, गोविंद हरि व त्रिंबक हरि पटवर्धन यांशीं कज्या करावा हे त्यांचें बेत होते. तात्यांनीं इचलकरंजीच्या ठाण्यांत प्यादे होते त्यांस वश करून घेतलें व किल्ल्या हिसकांवून घेतल्या. सर्व दौलतींत त्यांचा अंमल बसला. परंतु अनुबाईंची प्रकृती बरी झाली व पेशवेहि कर्नाटकांतून परत
आले. तेव्हां त्यांचे सर्व बेत विरघळून जाऊन त्यांस पुन्हां पूर्वीप्रमाणेंच प्रतिबंधांत रहाणें भाग पडलें
Posted by Vinod Jadhav at 00:28 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७५


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७५

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सन १७५७ च्या प्रारंभीं नानासाहेब व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस आले. स्वारींत अनूबाई नव्हत्या. तात्या धारवाड प्रांतीं फौजेसह होते. त्यांस श्रीमंतांच्या स्वारींत हजर रहाण्याविषयीं अनूबाईनीं लिहून पाठविले. तेव्हां वर सांगितलेल्या वितुष्टाचा प्रकार प्रथम उघडकीस आला. तात्या श्रीमंतीबरोबर स्वारीस गेले नाहींत. अनूबाईंच्या हाती कांहीं सत्ता नसावी, सर्व कारभार आपल्या हातीं असावा, मन मानेल त्याप्रमाणें वागण्यास आपणास कोणाची आडकाठी नसावी ही त्यांची इच्छा आतां उघड रीतीनें दिसू लागली. स्वारी आटोपून श्रीमंत परत पुण्यास गेले तेव्हां अनूबाईचें ह्मणणें पडलें कीं, तात्यांनी आपणाबरोबर पुण्यास श्रीमंतांकडे जाऊन आपल्या सरदारीचे व दौलतीचे लढे उलगडून घ्यावे. परंतु तें त्यांच्या मर्जीस येईना. ते धारवाडाकडे परत आले. मग बाईंनीं धारवाडास जाऊन तात्यांची कांहींशी समजूत काढून त्यांस घेऊन त्या परत इचलकरंजीस आल्या.

तात्यांस तीन अपत्यें होतीं. धोरला मुलगा व धाकटया दोघा मुली. मुलाचें नांव व्यंकटरावदादा व मुलींची नांवें अनुक्रमें बयाबाई व सगुणाबाई अशीं होतीं. पुण्यास भिडे म्हणून सावकार होते त्यांची कन्या व्यंकटरावांस दिली होती. तिचें नांव रमाबाई.

सन १७५९ च्या अखेरीस मराठयांची व मोंगलांची लढाई सुरू झाली. भाऊसाहेब व दादासाहेब बरोबर फौज घेऊन बेदरच्या रोखें चालले व वेळ पडल्यास त्यांस कुमक करितां यावी म्हणून पेशवे खुद्द अहमदनगर तेथें तळ देऊन राहिले. व्यंकटरावाचें लग्न उरकून अनूबाई तेथेंच श्रीमंतांजवळ राहिल्या. पेशव्यांच्या ल्ष्करास मिळण्याकरितां नग राहून निघून तात्या उध्दीर येथें दाखल झाले. परंतु ते तेथें पोंचण्याच्या आधींच मोंगलांचा पूर्ण पराजय झाला होता. पुढें रास्ते व पटवर्धन यांजबरोबर पेशव्यांनी कर्नाटकाच्या स्वारीस त्यांसहि पाठविलें.

त्या वेळीं तात्यांनीं (१७६१ डिसेंबर) कोपळावर स्वारी केली. तिकडे काटकांनीं दंगा करून ठाणीं घेतलीं होतीं. त्यांचें पारिपत्य करून ते गजेंद्रगडास येऊन तेथून बागल कोटाकडे गेले.

या सुमारास अनुबाईचें व तात्यांचें सौरस्य पुन्हां कमी झालें व तंटा मोडण्यासाठीं पुण्यास जाण्याचेंहि त्यानीं साफ नाकारलें. एवढेंच नव्हे तर ते कारभारांत व खासगी वागणुकींतहि अव्यवस्थितपणा करूं लागले. त्यामुळें त्यांस व त्यांच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईंनीं जवळ जवळ नजरकैदेंतच ठेविलें. या सुमारास कडलास येथील देशपांडयांच्या मुलीशीं त्यानीं लग्न केलें असें ऐकण्यांत आहे. नानासाहेब पेशवे यानीं देशस्थाच्या मुलीशीं लग्न लाविलें. हें मामेबंधूचें उदाहरण पाहून तात्यानींहि त्याचप्रमाणें केलें. दुस-या कांहीं गोष्टींत अलीकडे त्यांचें जें बेफामपणाचें वर्तन सुरू होतें त्या वर्तनानें ते राज्यकाराभारासारख्या व सरदारीसारख्या जबाबदारीच्या कामास अगदी नालायख झाले होते. अनूबाई, खुद्द पेशवे, त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस मातोश्री गोपिकाबाई यांनीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस दुर्व्यसनांपासून परावृत्त करावें म्हणून बहुत यत्न केला, धाक घालून पाहिला, निष्ठुरपणानें व कडकपणानें बागवून पाहिलें, पण सर्व व्यर्थ.
Posted by Vinod Jadhav at 00:27 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७४

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सन १७५६ च्या सावनूरच्या मोहिमेंत तात्या व अनूबाई हजर होती. पुढें तात्यांच्या शरीरीं आराम नसल्यामुळें ते परत इचलकरंजीस आले. परंतु सरदार व मुत्सद्दी व फौजेसुध्दां अनुबाई श्रीमंतांच्या स्वारीबरोबर राहिल्या. यावेळीं काबीज केलेला मर्दनगड इचलकरंजीकरांचडेच ठेवावा असें मनांत आणून श्रीमंतांनीं त्यांचेंच लोक किल्ल्यांत ठेविले. नंतर श्रीमंतांनीं पटवर्धन व इचलकरंजीकरांचे कारभारी यांस धारवाड प्रांतीं छावणीस ठेवून त्या प्रांतांची मामलत पटवर्धन, इचलकरंजीकर व विठ्ठल विश्राम या तिघांस सारखी वाटून दिली. पूर्वीचा व हल्लींचा नवीन मिळालेला मुलूख मिळून हा धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांच्या ताब्यांत आला. त्या वेळीं सुभ्याचें क्षेत्र फार मोठें असून त्याखालीं मिश्रीकोट, धारवाड वगैरे तेरा परगणे होते. खुद्द धारवाडचा किल्ला अनूबाईच्या ताब्यांत होता. बाकींची ठाणीं व परगण्यांतील किल्ले अनूबाईंनी आपल्या तर्फेनें त्या त्या परगण्याच्या मामलेदारांच्या ताब्यांत दिले होते. याशिवाय वल्लभगड, पारगड, भीमगड, कलानिधि, खानापूर व चंदगड हीं ठाणीं व कितूर संस्थानांपैकीं बागेवाडी हीं सर्व गेल्या तीन सालांत पेशव्यांनीं इचलकरंजीकरांच्या हवालीं केलीं होतीं. परगणा कंकणवाडी हाहि त्याजकडे पेशव्यांकडून मामलतीनें होता. एवढा हा मोठा धारवाडचा सुभा जो इचलकरंजीकरांकडे दिला होता त्याचा वसूल सरकारांत नियमितपणें यावा म्हणून येसाजीराम व रामचंद्र नारायण हे पेशव्यांच्या तर्फे सुभ्याची वहिवाट करण्यास नेमिले होते व वसुलाबद्दल पेशव्यांस व बंदोबस्ताबद्दल इचलकरंजीकरांस ते जबाबदार होते. रायबागची कमाविशीहि पेशव्यांकडून याच वेळीं तात्यांस मिळाली होती.

तात्या या लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनीं त्यास लहापणींच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. परंतु दुर्दैवानें तात्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यू पावून सर्व कारभार अनूबाईस पहाणें प्राप्त झालें. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे भाऊसाहेब दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. तात्यांस त्यांनीं स्वतंत्रपणें कधीं वागूं दिलें नाहीं. ‘हें लहान पोर याला काय समजतें!’ अशा भावनेंनें अनूबाई त्यास जन्मभर वागवीत गेल्या. तात्या हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येंऊ लागला. संस्थानांतील लबाड लोकांनीं तात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उत्पन्न केलें
Posted by Vinod Jadhav at 00:22 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७३

इचलकरंजी, सं स्था न.
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

यापुढें नारायणरावतात्यांची कारकीर्द येते. ही कारकीर्द पंचवीस वर्षाच्या अवधीची असून तींत इचलकरंजी संस्थानाच्या वैभवाचा कळस झाला म्हटलें तरी चालेल. त्या संस्थानाचें वैभव इतकें वृध्दिंगत होण्यास तात्यांची करामत कारण नसून त्यांच्या मातोश्री अनूबाई यांचेच कर्तृत्व होय. (अनुबाई पहा.) मुलगा संस्थानाचा कारभार व सरदारीचा बोजा सांभाळण्याजोगा होण्यापूर्वीच व्यंकटराव वारले त्यामुळें तीं दोन्ही कामें नीट चालतील अशा तजविणी योजणें अनूबाईंचें कर्तव्य होतें.

नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यामुळें त्यांनीं तात्यांचा पुरस्कार करण्याचें मनावर घेतलें व त्यांच्या वडिलांकडे सरदारी होती तीच त्याजकडे कायम करून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली इतकेंच नव्हें तर इनामें तैनाता देऊन मोठमोठया मामलती सांगून व मुलुखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बोल्या त्यांजवरच सोंपवून त्यांस लाखों रूपये मिळवून दिले. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें सबंध आजरे महाल अनूबाईस इनाम करून दिला.

पूर्वी गोकाकचा देसाई शिवलिंगप्पा म्हणून होता. त्यानें बंडावा केल्यामुळें सावनूरचा नबाब अबदुल मजीदखान यानें त्यावर स्वारी केली. तेव्हां तो देसाई पळून चिकोडीकर देसायाच्या आश्रयास जाऊन राहिला. नबाबानें त्याचें देसगतीचें वतन त्याचाच भाऊ अमीन आप्पा म्हणून होता त्यास दिलें. इकडे चिकोडीकरानें शिवलिंगप्पास दगा करून मारून टाकिलें व त्याचे मुलगे लखमगौडा व शिवरामगौडा म्हणून होते त्यांस कैदेंत ठेविलें. प्रस्तुतच्या प्रसंगीं त्या दोघां मुलांनीं आपली मुक्तता करण्याविषयीं प्रार्थना केली व त्यांनां आश्रय दिला.

यावेळीं पेशवें कर्नाटकांत आले होते व त्यांचा धारवाड काबीज करण्याचा मनसबा ठरला होता. तेथें मोंगलांचा किल्लेदार पृथ्वीसिंग म्हणून होता. त्याजकडे राजकारण करून शिबंदी खर्चाबद्दल त्यास ३५००० रूपये देऊन तारीख १३ रोजीं श्रीमंतांनीं तो किल्ला व त्याखालचा सरंजाम ताब्यांत घेतला व तेथील मामलत तात्यांस दिली. पुन: सन १७५४ च्या कर्नाटकाच्या मोहिमेंत महादजीपंत पुरंदरे व नारायणरावतात्या हेच मुख्य सरदार होते. पुरंदरे व तात्या यांनीं प्रथमच गोकाकचें ठाणें देसायापासून हिसकावून घेऊन माजी देसायाचे दोन मुलगे तात्यांच्या आश्रयास राहिले होते त्यांसच त्यांनीं या वेळीं हें देसगतीचें वतन देऊन गोकाकचें ठाणें आपल्या ताब्यांत ठेविलें. देसायाच्या मुलांनीं यावेळीं कृतज्त्रताबुध्दीनें हुनशाळ हा गांव तात्यांस इनाम दिला. नंतर हें लष्कर श्रीरंगपट्टणापर्यंत जाऊन त्यानें कित्तुर, सोंदें, सावनूर, बिदनूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कनकगिरी या नऊ संस्थानांपासून एकंदर खंडणी ३८७०००० रूपये घेतली. संस्थानिकाशीं खंडणीचा ठराव तात्या यांच्या विद्यमानें होत असे. सन १७५५ च्या मे महिन्यापर्यंत हा मजकूर झाला. नंतर तात्यांनीं पाच हजार फौजेसह धारवाडास छावणीस रहावें याप्रमाणें पेशव्यांचा हुकूम झाल्यावरून पुरंदरे पुण्यास गेले व तात्या धारवाडास राहिले. स्वारीच्या सुरूवातीस गोकाक परगणा तात्यांनीं घेतला होता त्याची मामलत पेशव्यांनी त्यांसच सांगितली.
Posted by Vinod Jadhav at 00:19 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Popular Posts

  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४२
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४२ छत्रपती शिवाजी महाराजांचे निकट लष्करी सरदार त...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १००
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०० महाराणी जिजाबाई संभाजीराजे भोसले (मृत्यू -१७ फेब्र...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९९
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९९ यशवंतराव आणि बाबुराव दाभाडे त्रिंबकरा...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १ शिवभक्तानो आणि शिवप्रेमिनो आजपासून म्हणजे ८ आगस्त  २०१६  ...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९८
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९८ त्रिंबकराव दाभाडे:— खंडेरावाची मुदत संपल्यावर पुढील...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
    जय शिवराय जय जिजाऊ  " हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध " ह्या ब्लोग हिंदुथानात स्थापन झाल...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९४
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९४ भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसच...
  • स्वराज्याचे पांडव भाग १
    स्वराज्याचे पांडव भाग १   ह्या परिस्थितीची कल्पना करा - स्वराज्याला मोगलांच्या अवाढव्य सेनेनी घेरलंय - स्वराज्याच्या छत्र...
  • स्वराज्याचे पांडव भाग ३ संताजी घोरपडे
    स्वराज्याचे पांडव  भाग ३   संताजी घोरपडे   संताजी घोरपडे ह्यांच्याबद्दल लिहायला लागलो तर कित्येक वर्ष अपुरी पडतील. संताजी एक रण...
  • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५
    हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५ शूरवीर मराठा सरदार आनंदराव गोविंदराव गायकवाड_भाग ६  आब...

About Me

My photo
Vinod Jadhav
View my complete profile

Blog Archive

  • ►  2023 (263)
    • ►  October (56)
    • ►  August (95)
    • ►  July (10)
    • ►  April (74)
    • ►  March (28)
  • ►  2020 (9)
    • ►  October (2)
    • ►  March (7)
  • ►  2019 (2)
    • ►  January (2)
  • ►  2018 (104)
    • ►  December (13)
    • ►  November (27)
    • ►  October (41)
    • ►  August (15)
    • ►  June (8)
  • ▼  2016 (103)
    • ▼  October (72)
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
      • हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मरा...
    • ►  September (15)
    • ►  August (16)

Followers

Translate

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments
Simple theme. Powered by Blogger.